शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया पुढील महिन्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 06:15 IST

एअर इंडियाच्या विक्रीसाठी पुढील महिन्यात केंद्र सरकार निविदा मागविण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विक्रीसाठी पुढील महिन्यात केंद्र सरकार निविदा मागविण्याची शक्यता आहे. या विमान कंपनीतील आपला संपूर्ण हिस्सा विकण्याचे सरकारने ठरविले आहे. त्या प्रकारे या निविदा मागविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

गेल्या वर्षीच केंद्र सरकारने एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यासाठी निविदाही मागविण्यात आल्या होत्या, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे यावेळी ही संपूर्ण विमान कंपनीच विकण्यासाठी निविदा मागविण्याचे सरकारने निश्चित केले आहे. ज्यांना विमान कंपनीच्या खरेदीत रस आहे, त्यांच्याकडून तसे प्राथमिक स्वारस्यपत्र मागविण्यासाठी पुढील महिन्यात प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

निर्गुंतवणुकीच्या प्रस्तावाला प्रतिसाद न मिळाल्याने आपला एअर इंडियातील संपूर्ण हिस्सा विकण्याचे ठरवितानाच केंद्र सरकारने त्यासाठीच्या काही अटी शिथिल करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार, जी कंपनी एअर इंडिया विकत घेईल, तिला या विमान कंपनीचे नाव बदलण्याचाही अधिकार राहील, असे आधीच सरकारने ठरविले आहे. एअर इंडियाकडे देशा-विदेशांत अनेक मालमत्ता आहेत. त्याही सरकार विकणार का, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, ही कंपनी विकण्याबाबत एअर इंडियाच्या व्यवस्थापनाने अलीकडेच कर्मचारी संघटनांशी चर्चा केली होती.

कर्ज आणि तोटा

एअर इंडियावर५८ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. याशिवाय एअर इंडियाचा तोटा काही कोटींमध्ये आहे. विमानांना लागणाºया इंधनाची रक्कम तेल कंपन्यांना देण्यासाठीही एअर इंडियाकडे पैसे नसतात, असे अनेकदा दिसून आले आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया