शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

कार्बनचा स्तर ३५ टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य

By admin | Updated: October 4, 2015 02:51 IST

संपूर्ण जग वातावरण बदलाच्या संकटावर मात करण्याच्या चिंतेने ग्रासले असताना हरितगृहातून होणारे वायुउत्सर्जन विशेषत: कार्बनचे प्रमाण ३५ टक्क्यांनी कमी करण्यासाठी भारत कटिबद्ध

नवी दिल्ली : संपूर्ण जग वातावरण बदलाच्या संकटावर मात करण्याच्या चिंतेने ग्रासले असताना हरितगृहातून होणारे वायुउत्सर्जन विशेषत: कार्बनचे प्रमाण ३५ टक्क्यांनी कमी करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याची घोषणा केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी केली. पॅरिस येथे होऊ घातलेल्या वातावरण बदल परिषदेपूर्वी भारताने या महत्त्वाकांक्षी योजनेला बळकटी दिली आहे.२००५ ते २०३० या काळात ३५ टक्के कार्बन कपातीचे उद्दिष्ट ठेवताना भारताने स्वेच्छेने घोषित केलेल्या क्षमतेत ७५ टक्क्यांनी वाढ केली आहे.येथे पत्रपरिषदेत या योजनेची घोषणा करताना जावडेकर म्हणाले की, भारताने स्वेच्छेने निर्धारित केलेले योगदानाचे लक्ष्य म्हणजे ‘आयएनडीसी’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असून, त्यामागे सर्वांना न्याय देण्याची भूमिका आहे. व्यापक, प्रगतीशील आणि सातत्यपूर्ण विकासाला प्रोत्साहन देतानाच आपण २०२०पर्यंत कार्बन उत्सर्जनाचा स्तर २० टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य ठेवले होते. २०३०पर्यंत कार्बनचे प्रमाण ३३ ते ३५ टक्क्यांनी कमी केले जाणार असून, कपातीचे लक्ष्य जवळपास ७५ टक्क्यांनी वाढविण्यात आले आहे. (वृत्तसंस्था) काय आहेत योजनेची वैशिष्ट्ये२०३०पर्यंत बिगर जीवाश्म ऊर्जेचा वाटा वाढून ४० टक्के करण्याचे उद्दिष्ट.अतिरिक्त जंगलांचा विकास करीत २.५ ते ३ अब्ज टन कार्बन डायआॅक्साईडच्या बरोबरीने कार्बन सिंक तयार करणे. त्यामुळे ३.५९ अब्ज टन कमी कार्बन उत्सर्जित होईल.भारताच्या वातावरण बदल कृती योजनेसाठी २.५ अब्ज अमेरिकन डॉलरचा खर्च अपेक्षित.३० नोव्हेंबर ते ११ डिसेंबर या काळात पॅरिस येथे होणाऱ्या वातावरण बदल परिषदेसाठी सर्व देशांना आयएनडीसी घोषित करणे अनिवार्य.