शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
2
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
3
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
4
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
5
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
6
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
7
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
9
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
10
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
11
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
12
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
13
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
14
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
15
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
16
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला, दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलून 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' करा, उच्च न्यायालयात याचिका
18
भाच्याच्या प्रेमासाठी पतीची हत्या करुन शेजाऱ्यांना पाठवलं जेलमध्ये, सत्य समजताच हादरले पोलीस
19
3 दिवसांत सर केली हिमालयाची 5 शिखरे, CISFच्या महिला अधिकाऱ्याची ऐतिहासिक कमगिरी
20
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा

कार्बनचा स्तर ३५ टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य

By admin | Updated: October 4, 2015 02:51 IST

संपूर्ण जग वातावरण बदलाच्या संकटावर मात करण्याच्या चिंतेने ग्रासले असताना हरितगृहातून होणारे वायुउत्सर्जन विशेषत: कार्बनचे प्रमाण ३५ टक्क्यांनी कमी करण्यासाठी भारत कटिबद्ध

नवी दिल्ली : संपूर्ण जग वातावरण बदलाच्या संकटावर मात करण्याच्या चिंतेने ग्रासले असताना हरितगृहातून होणारे वायुउत्सर्जन विशेषत: कार्बनचे प्रमाण ३५ टक्क्यांनी कमी करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याची घोषणा केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी केली. पॅरिस येथे होऊ घातलेल्या वातावरण बदल परिषदेपूर्वी भारताने या महत्त्वाकांक्षी योजनेला बळकटी दिली आहे.२००५ ते २०३० या काळात ३५ टक्के कार्बन कपातीचे उद्दिष्ट ठेवताना भारताने स्वेच्छेने घोषित केलेल्या क्षमतेत ७५ टक्क्यांनी वाढ केली आहे.येथे पत्रपरिषदेत या योजनेची घोषणा करताना जावडेकर म्हणाले की, भारताने स्वेच्छेने निर्धारित केलेले योगदानाचे लक्ष्य म्हणजे ‘आयएनडीसी’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असून, त्यामागे सर्वांना न्याय देण्याची भूमिका आहे. व्यापक, प्रगतीशील आणि सातत्यपूर्ण विकासाला प्रोत्साहन देतानाच आपण २०२०पर्यंत कार्बन उत्सर्जनाचा स्तर २० टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य ठेवले होते. २०३०पर्यंत कार्बनचे प्रमाण ३३ ते ३५ टक्क्यांनी कमी केले जाणार असून, कपातीचे लक्ष्य जवळपास ७५ टक्क्यांनी वाढविण्यात आले आहे. (वृत्तसंस्था) काय आहेत योजनेची वैशिष्ट्ये२०३०पर्यंत बिगर जीवाश्म ऊर्जेचा वाटा वाढून ४० टक्के करण्याचे उद्दिष्ट.अतिरिक्त जंगलांचा विकास करीत २.५ ते ३ अब्ज टन कार्बन डायआॅक्साईडच्या बरोबरीने कार्बन सिंक तयार करणे. त्यामुळे ३.५९ अब्ज टन कमी कार्बन उत्सर्जित होईल.भारताच्या वातावरण बदल कृती योजनेसाठी २.५ अब्ज अमेरिकन डॉलरचा खर्च अपेक्षित.३० नोव्हेंबर ते ११ डिसेंबर या काळात पॅरिस येथे होणाऱ्या वातावरण बदल परिषदेसाठी सर्व देशांना आयएनडीसी घोषित करणे अनिवार्य.