शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा पाणी संघर्ष, कावेरी पाणी वाटपावरुन तामिळनाडूत रेले रोको

By admin | Updated: October 17, 2016 16:17 IST

जलव्यवस्थापन मंडळाची स्थापना करावी, या मागणीसाठी तामिळनाडूमधील शेतकरी संघटनांनी चेन्नई आणि थंजावूरमध्ये रेले रोको आंदोलनाला सुरुवात केली आहे.

ऑनलाइन लोकमत

चेन्नई दि. 17 - तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा पाणीसंघर्ष सुरू झाला आहे. जलव्यवस्थापन मंडळाची स्थापना करावी, या मागणीसाठी तामिळनाडूमधील शेतकरी संघटनांनी चेन्नई आणि थंजावूरमध्ये रेले रोको आंदोलनाला सुरुवात केली आहे. कावेरी जलव्यवस्थापन मंडळ स्थापन करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने देऊनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर, शेतक-यांनी 48 तासांसाठी  रेले रोको आंदोलन पुकारले आहे. शेतक-यांच्या या आंदोलनाला डीएमकेने पाठिंबा दर्शवला असून पक्षाचे नेतेही यात सहभागी झाले आहेत.डीएमकेचे एमके स्टॅलिन देखील चेन्नईतील पेरंबूर येथे आंदोलनात सहभाग झाले होते. दरम्यान, कर्नाटक आणि तामिळनाडूतील परिस्थिती गंभीर असल्याचा अहवाल सुप्रीम कोर्टाच्या समितीने सादर केला आहे. 
 
'कर्नाटकातील जवळपास 42 तालुक्यांना दुष्काळाचा फटका बसतो आहे. दुष्काळामुळे मंड्या जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. पाण्याअभावी शेतकरी आणि मच्छिमारांसमोर बेरोजगारी आणि आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. तर तामिळनाडूमध्ये जनावरांसाठीदेखील पाणी नाही. तसेच संबंधित राज्यांनी सिंचनाच्या व्यवस्थापनेसाठी शेतीसाठी पाण्याचे समसमान वाटप करण्याची गरज आहे', असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दरम्यान, तामिळनाडूला कावेरीतून पाणी सोडण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने कर्नाटकाला दिलेले असतानाही पाणी सोडणार नाही असे सांगत कर्नाटक सरकारने विरोध दर्शवला आहे. गेल्या महिन्याभरापासून पाणी संघर्षावरुन तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये हिंसक आंदोलने सुरू आहेत.