शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पुन्हा पाणी संघर्ष, कावेरी पाणी वाटपावरुन तामिळनाडूत रेले रोको

By admin | Updated: October 17, 2016 16:17 IST

जलव्यवस्थापन मंडळाची स्थापना करावी, या मागणीसाठी तामिळनाडूमधील शेतकरी संघटनांनी चेन्नई आणि थंजावूरमध्ये रेले रोको आंदोलनाला सुरुवात केली आहे.

ऑनलाइन लोकमत

चेन्नई दि. 17 - तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा पाणीसंघर्ष सुरू झाला आहे. जलव्यवस्थापन मंडळाची स्थापना करावी, या मागणीसाठी तामिळनाडूमधील शेतकरी संघटनांनी चेन्नई आणि थंजावूरमध्ये रेले रोको आंदोलनाला सुरुवात केली आहे. कावेरी जलव्यवस्थापन मंडळ स्थापन करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने देऊनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर, शेतक-यांनी 48 तासांसाठी  रेले रोको आंदोलन पुकारले आहे. शेतक-यांच्या या आंदोलनाला डीएमकेने पाठिंबा दर्शवला असून पक्षाचे नेतेही यात सहभागी झाले आहेत.डीएमकेचे एमके स्टॅलिन देखील चेन्नईतील पेरंबूर येथे आंदोलनात सहभाग झाले होते. दरम्यान, कर्नाटक आणि तामिळनाडूतील परिस्थिती गंभीर असल्याचा अहवाल सुप्रीम कोर्टाच्या समितीने सादर केला आहे. 
 
'कर्नाटकातील जवळपास 42 तालुक्यांना दुष्काळाचा फटका बसतो आहे. दुष्काळामुळे मंड्या जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. पाण्याअभावी शेतकरी आणि मच्छिमारांसमोर बेरोजगारी आणि आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. तर तामिळनाडूमध्ये जनावरांसाठीदेखील पाणी नाही. तसेच संबंधित राज्यांनी सिंचनाच्या व्यवस्थापनेसाठी शेतीसाठी पाण्याचे समसमान वाटप करण्याची गरज आहे', असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दरम्यान, तामिळनाडूला कावेरीतून पाणी सोडण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने कर्नाटकाला दिलेले असतानाही पाणी सोडणार नाही असे सांगत कर्नाटक सरकारने विरोध दर्शवला आहे. गेल्या महिन्याभरापासून पाणी संघर्षावरुन तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये हिंसक आंदोलने सुरू आहेत.