शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

अफजल गुरु कार्यक्रम, जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षाला अटक

By admin | Updated: February 12, 2016 16:37 IST

अफझल गुरुच्या स्मरणार्थ कार्यक्रम आयोजित केल्या प्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हय्या कुमार याला अटक केली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - संसदेवरील हल्ल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर फासावर लटकवण्यात आलेल्या अफजल गुरुच्या स्मरणार्थ कार्यक्रम आयोजित केल्या प्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हय्या कुमार याला अटक केली. 
 
भाजप प्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हा मुद्दा लावून धरला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी दिल्लीतील इंडिया गेट येथेही निदर्शन केली. पोलिसांनी तेथून आंदोलकांना ताब्यात घेतले. 
 
देशद्रोह आणि गुन्ह्याचा कट रचणे या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी कन्हय्या कुमारला अटक केली आहे. साध्यावेशातील दोन पोलिस जेएनयूच्या कॅम्पसमध्ये आले. त्यांनी तेथून कन्हय्या कुमारला आधी चौकशीसाठी ताब्यात घेतले नंतर त्याला अटक केल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 
संसदेवर हल्ला केल्याबद्दल फाशी देण्यात आलेला अफजल गुरू याच्या फाशीच्या निर्णयाचा निषेध करत अफजल गुरूच्या स्मरणार्थ एक कार्यक्रम आयोजित करून देशविरोधी घोषणा देणा-या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील अज्ञात विद्यार्थ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कार्यक्रमाविरोधात भाजप खासदार महेश गिरी यांनी वसंत कुंज पोलिस स्थानकात तक्रार दाखल इंडियन पीनल कोडअंतर्गत कलम १२४ अ (देशद्रोह) आणि १२० ब लावून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
या कार्यक्रमासाठी विद्यापीठ प्रशासनाने परवानगी नाकारली होती, भारतीय विद्यार्थी परिषद आणि अन्य संघटनांनी या कार्यक्रमाला आक्षेप घेतला होता. मात्र असं असतानाही विद्यार्थ्यांनी त्यांना न जुमानता मंगळवारी हा कार्यक्रम घेतला.
अफजल गुरूला फाशी दिल्याच्या निर्णयावर नाराजी दर्शवत सरकार व देशाविरोधात घोषणाही देण्यात आल्या. त्यानंतर हे प्रकरण खूप तापले, या प्रश्नावरून सुरू झालेले आंदोलन गुरुवारीही सुरूच होते. अखेर या विद्यार्थ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 
 
राष्ट्रविरोधी वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत - राजनाथ सिंह
दरम्यान जेेएनयूच्या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा देणा-या विद्यार्थ्यांवर कडक योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. देशविरोधी घोषणा देत देशाच्या एकतेला आव्हान देण्याचा प्रयत्न करणा-यांनी कधीच माफ केले जाणार नाही असे सांगत सरकार कोणत्याही देशविरोधी कारवाया खपवून घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
 
तर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनीही याप्रकाराबाबत नाराजी दर्शवली असून देशाचा कोणताही नागरिक भारतमातेचा अपमान सहन करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.