शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

बारवरील पोलीस छाप्यानंतर पत्रकाराचा गूढ मृत्यू

By admin | Updated: July 18, 2015 01:12 IST

दोघे जखमी : वृत्तांकन केल्याच्या रागातून झाला हल्ला

दोघे जखमी : वृत्तांकन केल्याच्या रागातून झाला हल्ला
भाईंदर : पोलीस चौकीला लागून असलेल्या एका बारवर पोलिसांनी गुरुवारी रात्री टाकलेल्या छाप्याचे वृत्तांकन करण्यास गेलेल्या तीन पत्रकारांवर बारचालकासह सुमारे २० ते ३० कर्मचार्‍यांनी प्राणघातक हल्ला केला. यात दोन जण गंभीर जखमी झाले असून, तिसर्‍याने पोलीस चौकीचा आसरा घेतल्याने तो बचावला. तर, चौकीपासूनच काही अंतरावर चौथ्या पत्रकाराचा मृतदेह शुक्रवारी पहाटे आढळला.
व्हाइट हाउस बारवर पोलिसांनी छापा टाकल्याची माहिती स्थानिक पत्रकार संतोष मिश्रा यांना मिळाली. त्यानुसार मिश्रासह पत्रकार शशी शर्मा आणि अनिल नोटीयाल हे वृत्तांकनासाठी तेथे गेले. पोलीस बारबालांना ताब्यात घेत असताना हे तिघे वृत्तांकन करीत होते. हे पाहून बारचालक गणेश कामत याने दारूने भरलेला ग्लास मिश्रा यांना फेकून मारला. त्यानंतर बारमधील इतर कर्मचार्‍यांनी त्या तिघांवर हल्लाबोल केला. मिश्राने जीव वाचविण्यासाठी काशिमीराच्या दिशेने तर शर्माने मीरा रोडच्या दिशेने पळ काढला. नोटीयालने लगतच्या चौकीचा आसरा घेतल्याने तो बारवाल्यांच्या तावडीतून बचावला.
जखमी अवस्थेत शर्मा याने मीरा रोड पोलीस ठाणे गाठून उपअधीक्षक सुहास बावचे यांना घटनेची माहिती दिली. मिश्राचा संपर्क होत नसल्याने बावचे यांनी पत्रकार राघवेंद्र दुबे याला संपर्क साधून पोलीस ठाण्यात बोलवले. दुबे पहाटे ५च्या सुमारास काही पत्रकारांसह घटनेच्या ठिकाणी गेला. तेथून दुबे एकटा पोलीस चौकीच्या दिशेने निघाल्यानंतर पहाटे ५.३० वा.च्या सुमारास त्याचा मृतदेह त्याच परिसरात आढळला. त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस जोरदार प्रहार करून त्याची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून बारचालक कामत, त्याचा ड्रायव्हर राजू, कर्मचारी शरद, मुकेश, दिनेश व इतर ६ ते ७ जणांसह १४ बारबालांना ताब्यात घेतले आहे. (प्रतिनिधी)