शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

मोदींच्या गळाभेटीनंतर पाकिस्तानची मुजोरी वाढली

By admin | Updated: July 23, 2014 04:20 IST

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून पाकिस्तानने भारत-पाक सीमेवर तब्बल 19 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

19 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन : सरकारने नांगी टाकल्याची टीका
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून पाकिस्तानने भारत-पाक सीमेवर तब्बल 19 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. राज्यसभेत संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनीच ही माहिती दिल्यानंतर काँग्रेसने सरकारच्या दुर्बलतेचा मुद्दा उपस्थित केला. सरकारने पाकिस्तानच्या शस्त्रसंधी उल्लंघनापुढे नांगी का टाकली आहे, असा खडा सवाल विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी सरकारला विचारला आहे. पंतप्रधानपदी आरूढ होण्यापूर्वी नरेंद्र मोदी तत्कालीन संपुआ सरकारवर दुर्बल असल्याचा आरोप करीत होते, याचा संदर्भ देत आझाद यांनी सरकारला धारेवर धरले. 
  दिल्लीतील शपथविधी समारंभाला नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान यांना सन्मानाने बोलाविले होते. त्यांच्याशी झालेल्या चर्चेत सीमेवरील शांततेच्या मुद्दय़ावर भरही दिला होता. पण या गळाभेटीनंतरही पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या सरहद्दीवर 19 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. किंबहुना ही चर्चा सुरू असतानाच पाकिस्तानने नव्याने आगळीक केल्याचे व त्यात एक भारतीय जवान शहीद झाल्याचे वृत्त येऊन थडकले. 
 
आम्ही कोणापुढे झुकलेलो नाही; आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले त्या प्रत्येक वेळी भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
- अरुण जेटली, 
संरक्षणमंत्री
 
च्राजकुमार धूत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना जेटली यांनी सांगितले की, शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांचा मुद्दा ठरावीक प्रक्रियेनुसार हॉटलाइन 
व्यवस्था, फ्लॅग मिटिंग आदींच्या माध्यमाने पाकिस्तानपुढे उपस्थित 
केला जात असतो.
च्27 मे रोजी मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या 
भेटीतही सीमेवरील शस्त्रसंधीवर 
भर दिला होता. 
 
च्जम्मू- जम्मू जिल्ह्याच्या अखनूर सेक्टरमध्ये मंगळवारी नियंत्रण रेषेवर घुसखोरी करीत असलेल्या दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला. 
च्दुस:या एका घटनेत कठुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडताना एका घुसखोरास कंठस्नान घातले. 
च्अखनूर तहसीलच्या पल्लनवाला सेक्टरमधील चकला चौकीजवळ दहशतवाद्यांच्या एका गटाने भारतात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर उडालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला. 
 
19 प्रत्यक्षात  26 मे ते 17 जुलै या कालावधीत 19 वेळा पाकिस्तानने शस्त्रसंधीचा भंग केला आहे. 
 
54 या वर्षी 17 जुलैर्पयत जम्मू-काश्मीरची नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधी उल्लंघनाच्या 54 घटना घडल्या आहेत.  
 
पाकने जुलै महिन्यात 
भारतीय सैन्यावर गोळीबार केला. 1, 12 आणि 16 जुलै रोजी पाकने जम्मू सीमेवर गोळीबार केला; तर 17 जुलै रोजी अरनिया भागातील पीतळ पोस्टवर हल्ला चढविला. 
 
200वेळा पाकने गेल्या वर्षभरात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून, त्यात भारताचे 12 जवान शहीद झाले तर 14 जखमी झाले.