शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

ऐन दिवाळीत पाण्यासाठी पायपीट

By admin | Updated: November 15, 2015 21:13 IST

ग्रामस्थांचे हाल : दोन-दोन नळ-पाणीपुरवठा योजना असून फायदा नाही

ग्रामस्थांचे हाल : दोन-दोन नळ-पाणीपुरवठा योजना असून फायदा नाही
पाईट : दोन-दोन नळ-पाणीपुरवठा योजना शिवाय भामाआसखेड धरण उशाला तरीही कोरड घशाला अशी अवस्था पाईट येथील ग्रामस्थांची झाली आहे. ऐनदिवाळीमध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागली आहे.
पाईट येथे नियोजनाचा अभाव आणि वीज वितरण कंपनीकडून पुरेशा दाबाने मिळत नसलेली वीज यामुळे येथील ग्रामस्थांचे पाण्यासाठी मोठे हाल झाले आहेत.
पाईटकरांची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रथम सन २००९-१० मध्ये ६३ लाख रुपयांच्या इंडो-जर्मन नळ-पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेमधून सुरुवातीस पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत होता. परंतु विहीर ते पाण्याची टाकी हे अंतर ५ किमी असून सुरुवातीस ६ तास पाण्याची टाकी भरण्यास लागत असलेला वेळ लाईनमधील दुर्लक्षित पाण्यामुळे व लाईन काही लोकांनी घेतलेल्या जोडमुळे आता आठ तासांतही भरत नसल्याने खरी समस्या निर्माण झाली आहे. खरे तर ग्रामपंचायतीने या समस्येकडे लक्ष दिले असते, तरीही ग्रामस्थांना योग्य दाबाने पाणी मिळाले असते.
या योजनेवर खरे तर या योजनेच्या दुरुस्तीवर लक्ष द्यावयाची गरज असताना ८ महिन्यांपूर्वी २९ लाख रुपयांची दुसरी योजना करून पाण्याची समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु ही योजना असून नसल्यासारखी झाली असून या योजनेमधून फक्त वापरण्यासाठी पाणी आणण्याचा उद्देशही सफल झाला नाही. एक वर्षानंतरही या योजनेचे अजून वीजजोड ग्रामपंचायतीने घेतला नसल्याने या योजनेचा काहीही उपयोग झाला नसल्याचे उघड होत आहे.
चौकट
अद्याप तक्रार नाही आली
८ महिन्यांच्या आतच या योजनेने काही पाईप जमीन सपाटीकरणामध्ये तुटले असल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे. तसेच लवकरच दुरुस्त करून ती लाईन पूर्ववत करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे सांगण्यात येत असले तरीही याबाबत तक्रार मात्र केली नसल्याचे ग्रामसेवकाने सांगितले आहे. यामध्ये सर्वात मोठे दुर्दैव असे, की कोणीही येवो पाईटकरांच्या पिण्याच्या पाण्याचा शाप असल्याची भावना ग्रामस्थांची झाली असून ऐन सणासुदीत ग्रामस्थांवर पाण्यासाठी धावपळ करायला लागते ती लागतेच.
याबाबत गेल्या १० तारखेपासून वीजवितरणकडून लोडशेडिंग बंद असले तरी मध्ये मध्ये ट्रीप होत असलेल्या लाईनमुळेही थोडाफार परिणाम होत आहे. याबाबत ग्रामसेवक सुरेश घनवट यांनी पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी बसविण्यात आलेल्या यंत्रणा व्यवस्थित न बसविल्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होण्यास अडचण येत असून एक ज्यादा कर्मचारी लावून तो लवकरच सुरळीत करण्यात येईल, असे सांगितले.
कोट
१० तारखेपासून लोडशेडिंग बंद असून नळ-पाणीपुरवठा असलेल्या फिडरला काल थ्री फेज लाईन नसतानाही ४ तास वीजपुरवठा सोडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही ग्रामपंचायतीस हवे ते सहकार्य वीजमंडळ करेल.
- आर. असोले, उपअभियंता, वितरण कंपनी