शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

लोकमत आपल्या दारी जोड १

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

नागरिकांच्या प्रतिक्रिया

नागरिकांच्या प्रतिक्रिया
ॲड. सुमतीलाल बलदोटा-माणिक चौकातील कारंजे अनेक वर्षापासून बंद आहे. तेथेच सेनापती बापट यांचा पुतळा आहे, त्याची स्वच्छता होत नाही. पाणी कमी दाबाने येते. स्वच्छता कर्मचारी कधीतरी येतात. नागरिक स्वत:च साफसफाई करतात. रस्त्यांवर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. पथदिवे अधून-मधून बंद असतात.
............
शिरीष बापट- बाहेरगावाहून येणारी वाहने रस्त्यावरच पार्क केली जातात. त्यामुळे वाहतूक समस्या निर्माण झाली आहे. परिसरात मोठमोठी हॉस्पिटल आहेत, पार्किंगची सोय नसल्याने तेथे येणारे रुग्ण रस्त्यावर वाहने लावतात. रस्ते आहेत, मात्र त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.
.........
अविनाश बेडेकर- पाणी नियमित व भरपूर येते. स्वच्छता कर्मचारीही येतात. मात्र प्रभागातील रस्त्यांवर खूप खड्डे झाले आहेत. नगरसेवकांनी प्रत्येक गल्लीत जाऊन समस्या जाणून घेतल्या पाहिजे. बार्शीकर तसेच करत. रस्त्यावर पडलेले खड्डे हीच मोठी समस्या आहे.
........
रुख्मिणी भिमण- ड्रेनेज व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी महापालिकेने वर्षापूर्वी रस्ता खोदून ठेवला. अजूनही तो दुरूस्त केलेला नाही. खोदाईपूर्वी रस्ता चांगला होता. नगरसेवक व महापालिकेने हे काम त्वरित केले पाहिजे. खडबडीत रस्त्यांवरून चालताना ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास होतो.
............
दर्शना मुळे - अत्यंत कमी दाबाने येते. त्यामुळे काही घरांना पाणीच मिळत नाही. बेडेकर यांच्या घराशेजारच्या बोळीतील रस्ता खोदून ठेवला आहे. रस्ता दुरूस्त कधी होणार? पाणी हीच खरी समस्या आहे. कर वसुली करणार्‍या महापालिकेने नागरिकांना पायाभूत सुविधा पुरविल्या पाहिजेत.
...........
सुशीला तांदूळवाडकर- पाणी नियमित येते. स्वच्छताही होते. पथदिवे रात्री बंद असतात. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्ते नव्याने डांबरीकरण झाले पाहिजेत.
/..............
किशोर डागवाले, नगरसेवक- गत २५ वर्षापासून नगरसेवक आहे. प्रभागात नव्याने समाविष्ट झालेल्या तांबटकर गल्ली, पापय्या गल्ली परिसरात विकास कामे झालेली नाहीत. मात्र १० लाखाचा नगरसेवक निधी, ५० लाखाचा सभापती असतानाचा निधी, १२ लाख आमदार निधी, २० लाख खासदार निधीतून विविध विकास कामे प्रस्तावित केली आहेत. दोन वर्षात प्रभागात एकही समस्या राहणार नाही. मंगल कार्यालये व हॉस्पिटलची पार्किंग सुरू करा अशी मागणी अनेकदा केली, मात्र महापालिका प्रशासन कठोर,बेधडक कारवाई करत नाही. त्यामुळे वाहतूक समस्या निर्माण होते. प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे प्रभागात विकास कामे सुरू नाहीत.