शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

'आदर्श ग्राम योजनेचा' मोदींच्या हस्ते शुभारंभ, मात्र शिवसेना खासदार अनुपस्थित

By admin | Updated: October 11, 2014 13:21 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्वाकांक्षी 'खासदार आदर्श ग्राम योजने'चा शनिवारी शुभारंभ केला, मात्र शिवसेनेचे खासदार या कार्यक्रमास अनुपस्थित होते.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्वाकांक्षी ' खासदार आदर्श ग्राम योजने'चा आज (शनिवार) शुभारंभ केला, मात्र या कार्यक्रमास शिवसेनेचा एकही खासदार उपस्थित नव्हता. शिवसेना-भाजपाची गेल्या २५ वर्षांपासून असलेली युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसत असून सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसनेचे खासदार आदर्श ग्राम योजनेच्या कार्यक्रमात उपस्थित राहतील का याबद्दल उत्सुकता होती, मात्र एकही खासदाराने या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. 
लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जन्मदिनी राजधानी दिल्लीतील विज्ञान भवन येथे या योजनेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्गाटन झाले. १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणादरम्यान पंतप्रधानांनी या योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत प्रत्येक खासदाराला गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करायचा आहे. ही योजना ३ टप्प्यांत राबवण्यात येईल. अल्प काळातील कामे तीन महिन्यांत पूर्ण करावी लागतील. तर मध्यम मुदत एक वर्ष व दीर्घ मुदत एका वर्षापेक्षा जास्त देण्यात आली आहे. त्या कालावधीत गावांची कामे पूर्ण करावी लागतील. खुद्द पंतप्रधानही त्यांच्या वारणासी मतदारसंघातील ककरिया गाव दत्तक घेऊन विकास करणार आहेत.
गावाचा विकास झाला तरच देशाचा विकास शक्य आहे असे सांगत पंतप्रधानांनी या योजनेची आवश्यकता स्पष्ट केली. मात्र खासदारांना आपले स्वत:चे वा सासुरवाडीचे गाव दत्तक घता येणार नाह, असा टोलाही पंतप्रधानांनी यावेळी लगावला.