शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

'आदर्श ग्राम योजनेचा' मोदींच्या हस्ते शुभारंभ, मात्र शिवसेना खासदार अनुपस्थित

By admin | Updated: October 11, 2014 13:21 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्वाकांक्षी 'खासदार आदर्श ग्राम योजने'चा शनिवारी शुभारंभ केला, मात्र शिवसेनेचे खासदार या कार्यक्रमास अनुपस्थित होते.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्वाकांक्षी ' खासदार आदर्श ग्राम योजने'चा आज (शनिवार) शुभारंभ केला, मात्र या कार्यक्रमास शिवसेनेचा एकही खासदार उपस्थित नव्हता. शिवसेना-भाजपाची गेल्या २५ वर्षांपासून असलेली युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसत असून सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसनेचे खासदार आदर्श ग्राम योजनेच्या कार्यक्रमात उपस्थित राहतील का याबद्दल उत्सुकता होती, मात्र एकही खासदाराने या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. 
लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जन्मदिनी राजधानी दिल्लीतील विज्ञान भवन येथे या योजनेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्गाटन झाले. १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणादरम्यान पंतप्रधानांनी या योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत प्रत्येक खासदाराला गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करायचा आहे. ही योजना ३ टप्प्यांत राबवण्यात येईल. अल्प काळातील कामे तीन महिन्यांत पूर्ण करावी लागतील. तर मध्यम मुदत एक वर्ष व दीर्घ मुदत एका वर्षापेक्षा जास्त देण्यात आली आहे. त्या कालावधीत गावांची कामे पूर्ण करावी लागतील. खुद्द पंतप्रधानही त्यांच्या वारणासी मतदारसंघातील ककरिया गाव दत्तक घेऊन विकास करणार आहेत.
गावाचा विकास झाला तरच देशाचा विकास शक्य आहे असे सांगत पंतप्रधानांनी या योजनेची आवश्यकता स्पष्ट केली. मात्र खासदारांना आपले स्वत:चे वा सासुरवाडीचे गाव दत्तक घता येणार नाह, असा टोलाही पंतप्रधानांनी यावेळी लगावला.