शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

अभाविप नेता ते उपराष्ट्रपती... 

By अोंकार करंबेळकर | Updated: August 5, 2017 20:13 IST

जेपींच्या संपर्कात आल्यानंतर नायडू यांचे संपुर्ण आयुष्यच बदलून गेले. हाच काळ त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट म्हणून ओळखला गेला. त्यानंतर 1975 साली लागू झालेल्या आणीबाणीविरोधातही नायडू सक्रीय राहिले. मिसा कायद्यांतर्गत त्यांना कारागृहातही जावे लागले.

ठळक मुद्देअटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळामध्ये व्यंकय्या नायडू यांनी ग्रामविकास मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली.2016 साली माहिती आणि प्रसारण खात्याचे कॅबिनेट मंत्री बनले.

नवी दिल्ली, दि. 5- नवनिर्वाचित उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा प्रवास विद्यार्थी नेता, आमदार, खासदार, भाजपाचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री ते आता उपराष्ट्रपती असा झालेला आहे. 68 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी तेलुगू, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये भारतभर भाषणे देऊन उत्तम वक्ता म्हणूनही नाव कमावेलेले आहे.

    व्यंकय्या नायडू यांचा जन्म आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील चवतपालेम येथे झाला. नेल्लोरमध्ये शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी विशाखापट्टणम येथे विधी शाखेतील पदवी घेण्यासाठी महाविद्यालयामध्ये प्रवेश केला. महाविद्यालयात शिक्षण घेतानाच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले, त्यानंतर त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत प्रवेश केला आणि विद्यार्थी नेता म्हणून प्रसिद्ध झाले.विद्यार्थी संघटनेचे ते अध्यक्षही बनले.

1972 साली झालेल्या जय आंध्रा चळवळीत त्यांनी सहभाग घेतला होता.  1974 साली जयप्रकाश नारायण यांच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेमध्ये सहभागी झाल्यानंतर ते छात्र संघर्ष समितीचे काम करु लागले. जेपींच्या संपर्कात आल्यानंतर नायडू यांचे संपुर्ण आयुष्यच बदलून गेले. हाच काळ त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट म्हणून ओळखला गेला. त्यानंतर 1975 साली लागू झालेल्या आणीबाणीविरोधातही नायडू सक्रीय राहिले. मिसा कायद्यांतर्गत त्यांना कारागृहातही जावे लागले.

 1978 आणि 1983 अशा दोन टर्म्स ते आंध्र प्रदेश विधानसभेत उदयगिरी मतदारसंघातून निवडून गेले. याच काळामध्ये ते भारतीय जनता पार्टीमध्येही विविध पदांवरती काम करत होते. कार्यकर्त्यापासून सुरुवात झालेली त्यांची पक्षांतर्गत कारकिर्द चांगलीच समृद्ध होत गेली. आंध्र प्रदेश भाजपाचे सरचिटणिस, प्रदेशाध्यक्षपदही त्यांनी भूषविले. 1980-85 या पाच वर्षांमध्ये ते आंध्र विधानसभेत भाजपाचे गटनेतेही होते. 1998 साली त्यांना पक्षाने कर्नाटकातून राज्यसभेवर पाठवले, ते सलग तीन टर्म्स राज्यसभेत कर्नाटकमधून नियुक्त होत गेले. 2016 साली राजस्थानमधून ते राज्यसभेवर निवडून गेले. त्यांनी भाजपामध्ये पक्षप्रवक्ता, राष्ट्रीय सरचिटणीस या पदांवरतीही काम केले. 2002 ते 2004 या कालावधीमध्ये ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमले गेले. जनकृष्णमुर्ती, बंगारु लक्ष्मण यांच्या नंतर भाजपाच्या अध्यक्षस्थानी बसणारे आणि दक्षिणेतून येणारे ते तिसरे व्यक्ती बनले.

केंद्रीय मंत्रिमंडळामध्येही चमकदार कामगिरीअटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळामध्ये व्यंकय्या नायडू यांनी ग्रामविकास मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली. रालोआ सरकारची महत्वाकांक्षी योजना प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची कल्पना त्यांनीच मांडली होती. रालोआचे दुसरे सरकार 2014 साली सत्तेमध्ये आल्यावर त्यांच्याकडे नागरी विकास आणि गृहनिर्माण आणि संसदीय कामकाज मंत्रायलयाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर 2016 साली माहिती आणि प्रसारण खात्याचे कॅबिनेट मंत्री बनले.