शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

अभाविप नेता ते उपराष्ट्रपती... 

By अोंकार करंबेळकर | Updated: August 5, 2017 20:13 IST

जेपींच्या संपर्कात आल्यानंतर नायडू यांचे संपुर्ण आयुष्यच बदलून गेले. हाच काळ त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट म्हणून ओळखला गेला. त्यानंतर 1975 साली लागू झालेल्या आणीबाणीविरोधातही नायडू सक्रीय राहिले. मिसा कायद्यांतर्गत त्यांना कारागृहातही जावे लागले.

ठळक मुद्देअटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळामध्ये व्यंकय्या नायडू यांनी ग्रामविकास मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली.2016 साली माहिती आणि प्रसारण खात्याचे कॅबिनेट मंत्री बनले.

नवी दिल्ली, दि. 5- नवनिर्वाचित उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा प्रवास विद्यार्थी नेता, आमदार, खासदार, भाजपाचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री ते आता उपराष्ट्रपती असा झालेला आहे. 68 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी तेलुगू, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये भारतभर भाषणे देऊन उत्तम वक्ता म्हणूनही नाव कमावेलेले आहे.

    व्यंकय्या नायडू यांचा जन्म आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील चवतपालेम येथे झाला. नेल्लोरमध्ये शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी विशाखापट्टणम येथे विधी शाखेतील पदवी घेण्यासाठी महाविद्यालयामध्ये प्रवेश केला. महाविद्यालयात शिक्षण घेतानाच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले, त्यानंतर त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत प्रवेश केला आणि विद्यार्थी नेता म्हणून प्रसिद्ध झाले.विद्यार्थी संघटनेचे ते अध्यक्षही बनले.

1972 साली झालेल्या जय आंध्रा चळवळीत त्यांनी सहभाग घेतला होता.  1974 साली जयप्रकाश नारायण यांच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेमध्ये सहभागी झाल्यानंतर ते छात्र संघर्ष समितीचे काम करु लागले. जेपींच्या संपर्कात आल्यानंतर नायडू यांचे संपुर्ण आयुष्यच बदलून गेले. हाच काळ त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट म्हणून ओळखला गेला. त्यानंतर 1975 साली लागू झालेल्या आणीबाणीविरोधातही नायडू सक्रीय राहिले. मिसा कायद्यांतर्गत त्यांना कारागृहातही जावे लागले.

 1978 आणि 1983 अशा दोन टर्म्स ते आंध्र प्रदेश विधानसभेत उदयगिरी मतदारसंघातून निवडून गेले. याच काळामध्ये ते भारतीय जनता पार्टीमध्येही विविध पदांवरती काम करत होते. कार्यकर्त्यापासून सुरुवात झालेली त्यांची पक्षांतर्गत कारकिर्द चांगलीच समृद्ध होत गेली. आंध्र प्रदेश भाजपाचे सरचिटणिस, प्रदेशाध्यक्षपदही त्यांनी भूषविले. 1980-85 या पाच वर्षांमध्ये ते आंध्र विधानसभेत भाजपाचे गटनेतेही होते. 1998 साली त्यांना पक्षाने कर्नाटकातून राज्यसभेवर पाठवले, ते सलग तीन टर्म्स राज्यसभेत कर्नाटकमधून नियुक्त होत गेले. 2016 साली राजस्थानमधून ते राज्यसभेवर निवडून गेले. त्यांनी भाजपामध्ये पक्षप्रवक्ता, राष्ट्रीय सरचिटणीस या पदांवरतीही काम केले. 2002 ते 2004 या कालावधीमध्ये ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमले गेले. जनकृष्णमुर्ती, बंगारु लक्ष्मण यांच्या नंतर भाजपाच्या अध्यक्षस्थानी बसणारे आणि दक्षिणेतून येणारे ते तिसरे व्यक्ती बनले.

केंद्रीय मंत्रिमंडळामध्येही चमकदार कामगिरीअटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळामध्ये व्यंकय्या नायडू यांनी ग्रामविकास मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली. रालोआ सरकारची महत्वाकांक्षी योजना प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची कल्पना त्यांनीच मांडली होती. रालोआचे दुसरे सरकार 2014 साली सत्तेमध्ये आल्यावर त्यांच्याकडे नागरी विकास आणि गृहनिर्माण आणि संसदीय कामकाज मंत्रायलयाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर 2016 साली माहिती आणि प्रसारण खात्याचे कॅबिनेट मंत्री बनले.