शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

बचत गट चालविणार्‍या संस्था अधीक्षिकेचे अपहरण? पाच जणांनी अपहरण केल्याचा आरोप : तीन दिवसानंतर आढळल्या जखमी अवस्थेत

By admin | Updated: March 4, 2016 22:37 IST

जळगाव: बचत गटाच्या महिलांच्या रकमेवरून आरोप-प्रत्यारोपामुळे चर्चेत आलेल्या येथील बहिणाबाई सातपुडा आदिवासी बहुउद्देशीय संस्थेच्या अधीक्षिका सविता भालेराव यांचे मंगळवारी पाच तरुण व दोन महिलांनी अपहरण करून तीन दिवस पारोळ्याच्या जंगलात डांबून ठेवल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला आहे. त्यांना जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, खुद्द भालेराव यांनीच हा प्रकार पत्रकार व पोलिसांना सांगितला.

जळगाव: बचत गटाच्या महिलांच्या रकमेवरून आरोप-प्रत्यारोपामुळे चर्चेत आलेल्या येथील बहिणाबाई सातपुडा आदिवासी बहुउद्देशीय संस्थेच्या अधीक्षिका सविता भालेराव यांचे मंगळवारी पाच तरुण व दोन महिलांनी अपहरण करून तीन दिवस पारोळ्याच्या जंगलात डांबून ठेवल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला आहे. त्यांना जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, खुद्द भालेराव यांनीच हा प्रकार पत्रकार व पोलिसांना सांगितला.
भालेराव यांच्या म्हणण्यानुसार त्या मंगळवारी दुपारी त्यांच्या नाटेकर नावाच्या महिला सहकार्‍यांना घेऊन कारने काव्यरत्नावली चौकातील एका बॅँकेत संस्थेचे पैसे भरण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी हे पाच तरुण आपला पाठलाग करीत असल्याचा संशय त्यांना आला. बॅँकेत गेल्यानंतर कारमध्ये शिक्का विसरल्याने त्यांनी नाटेकर यांना तो शिक्का घेण्यासाठी पाठविले. त्या येण्याच्या आत भालेराव तोंडाला स्कार्फ बांधून बॅँकेतून बाहेर पडल्या. एका रिक्षाला हात दिला. तेव्हा त्याच रिक्षातून आलेल्या तरुणांनी ओढून तोंडाला प˜ी बांधली. नंतर बेशुध्द केले. शुध्दीवर आल्या तेव्हा त्या पारोळ्याच्या जंगलात होत्या.दोन दिवस तेथे त्यांनी बेदम मारहाण केली. गुरुवारी पहाटे कारमधून मुंबईला घेऊन जाण्याच्या तयारीत असताना एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात असताना खाली शुध्द आली. तेथे आरडाओरड केली असता त्यांनी डोक्यात रॉड टाकून चालत्या कारमधून फेकून दिले व तेथून पळ काढला.
पारोळ्यात घेतली मदत
पहाटे पाच वाजेच्या दरम्यान पारोळ्यातील लक्ष्मणदादा कॉलनीत भेटलेले कल्पना खैरनार व राहुल खैरनार यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांनी ही माहिती पोलिसांना कळविली. त्यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
सरला पाटील यांच्यावर आरोप
रामेश्वर कॉलनीतील सरला मनोज पाटील व संस्था अध्यक्ष सलीम पिंजारी, सविता भालेराव यांच्यात बचत गटाच्या महिलांकडून घेण्यात आलेल्या पैशांच्याबाबतीत वाद आहेत. जिल्हा पेठ व शहर पोलीस स्टेशनला तक्रारीही झाल्या होत्या. यातून भालेराव यांना संस्थेच्या कार्यालयात एकदा मारहाणही झाली होती. अपहरणकर्त्या तरुणांना आपण सरला पाटील यांच्यासोबत बर्‍याच वेळा पाहिले आहे,त्यामुळे त्यांनीच हा कट रचला आहे, असा आरोप सविता भालेराव यांनी केला. रामानंद नगरचे पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले, गुन्हे शोध पथकाचे प्रदीप चौधरी व शरद पाटील यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन भालेराव यांचा जबाब नोंदविला आहे.