शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नोटबंदीबाबत 'आम आदमी' आमच्यासोबतच

By admin | Updated: November 18, 2016 18:59 IST

पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयावरून आम आदमी पक्ष सरकारवर टीका करत असला तरी देशातील खरा आम आदमी निर्णयावर नाराज नाही आहे.

 ऑनलाइन लोकमत

बंगळुरू, दि. 18 -  पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयावरून आम आदमी पक्ष  सरकारवर टीका करत असला तरी देशातील खरा आम आदमी निर्णयावर नाराज नाही आहे. तो आमच्यासोबतच आहे, असे केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज सांगितले. 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या नोटबंदीच्या निर्णयाविरोधात आम आदमी पक्षाने जोरदार आघाडी उघडली आहे. या प्रश्नावरून ते दररोज सरकावर नवनवे आरोप करत आहेत. त्याला प्रत्युत्तर देताना व्यंकय्या नायडू यांनी हा टोला लगावला. "2014 च्या निवडणुकीत भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा होता. त्यामुळे सत्ता मिळाल्यावर सरकारने त्याविरोधात पावले उचलण्यास सुरुवात केली. त्यामुळे हा निर्णय काही अचानक घेतलेला नाही. नोटबंदीच्या सर्जरीची देशाला आवश्यकता होती. त्यामुळे हा निर्णय घेतला गेला," असे नायडू म्हणाले. 
यावेळी परदेशातील काळा पैसा, तसेच सरकारकडून अंबानी, अदानीसारख्या उद्योजकांना मिळत असलेल्या झुकत्या मापाबाबतही ते बोलले. "परदेशात ठेवण्यात आलेला काळा पैसा हा मोदी सरकारच्या काळात ठेवण्यात आलेला नाही. तर तो त्याआधीच्या काळातील आहे. तसेच अंबानी, अदानी हे उद्योजक मोदींच्या कार्यकाळात उदयास आलेले नाहीत. तर हे उद्योजक ही याआधीच्या सरकारांची देणगी आहे." अशी माहिती त्यांनी दिली. नोटबंदीच्या निर्णयावरून विरोधी पक्ष राजकारण तापवत असतानाच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. त्यामुळे नायडू यांनी समाधान व्यक्त केले.