शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
3
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
4
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
5
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
6
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
7
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
8
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
9
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
10
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
11
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
12
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
13
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
14
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
17
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
20
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना

नोटबंदीबाबत 'आम आदमी' आमच्यासोबतच

By admin | Updated: November 18, 2016 18:59 IST

पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयावरून आम आदमी पक्ष सरकारवर टीका करत असला तरी देशातील खरा आम आदमी निर्णयावर नाराज नाही आहे.

 ऑनलाइन लोकमत

बंगळुरू, दि. 18 -  पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयावरून आम आदमी पक्ष  सरकारवर टीका करत असला तरी देशातील खरा आम आदमी निर्णयावर नाराज नाही आहे. तो आमच्यासोबतच आहे, असे केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज सांगितले. 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या नोटबंदीच्या निर्णयाविरोधात आम आदमी पक्षाने जोरदार आघाडी उघडली आहे. या प्रश्नावरून ते दररोज सरकावर नवनवे आरोप करत आहेत. त्याला प्रत्युत्तर देताना व्यंकय्या नायडू यांनी हा टोला लगावला. "2014 च्या निवडणुकीत भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा होता. त्यामुळे सत्ता मिळाल्यावर सरकारने त्याविरोधात पावले उचलण्यास सुरुवात केली. त्यामुळे हा निर्णय काही अचानक घेतलेला नाही. नोटबंदीच्या सर्जरीची देशाला आवश्यकता होती. त्यामुळे हा निर्णय घेतला गेला," असे नायडू म्हणाले. 
यावेळी परदेशातील काळा पैसा, तसेच सरकारकडून अंबानी, अदानीसारख्या उद्योजकांना मिळत असलेल्या झुकत्या मापाबाबतही ते बोलले. "परदेशात ठेवण्यात आलेला काळा पैसा हा मोदी सरकारच्या काळात ठेवण्यात आलेला नाही. तर तो त्याआधीच्या काळातील आहे. तसेच अंबानी, अदानी हे उद्योजक मोदींच्या कार्यकाळात उदयास आलेले नाहीत. तर हे उद्योजक ही याआधीच्या सरकारांची देणगी आहे." अशी माहिती त्यांनी दिली. नोटबंदीच्या निर्णयावरून विरोधी पक्ष राजकारण तापवत असतानाच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. त्यामुळे नायडू यांनी समाधान व्यक्त केले.