शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
2
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
3
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
4
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
5
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
6
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
8
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
9
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
10
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींच्या भूमिकेत कोण दिसणार? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "आम्हाला..."
11
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
12
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
13
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
14
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
15
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
16
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
17
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
18
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
19
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
20
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा

अबब, साडेसात हजार उमेदवारांचे अर्ज

By admin | Updated: September 29, 2014 07:18 IST

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील २८८ मतदारसंघातून सुमारे ७ हजार ६६६ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील २८८ मतदारसंघातून सुमारे ७ हजार ६६६ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सर्वच प्रमुख पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूकीला सामारे जाण्याचा निर्णय घेतल्याने उमेदवारांची संख्या वाढली आहे.विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा शनिवारी पूर्ण झाला. अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवस असल्यामुळे सगळीकडे उमेदवारांची झुंबड उडाली होती. रात्री उशिरापर्यंत निवडणूक आयोगाचे अधिकारी राज्यभरातील आकडेवारी एकत्रित करण्याच्या कामात व्यस्त होते. नांदेड दक्षिणमधून सर्वाधिक ९१ अर्ज प्राप्त झाले असून नांदेड उत्तरमध्येही ८० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पृथ्वीराज चव्हाणांच्या कराड दक्षिणमध्ये २६ जणांनी तर अजित पवारांच्या बारामतीत २४ जणांनी अर्ज सादर केले. गुहागर, कुडाळ आणि माहिम मतदारसंघांमध्ये सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी ९ जणांनी अर्ज सादर केले. अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू असून २९ तारखेला वैध अर्जांची घोषणा आयोगाकडून करण्यात येईल. तर १ आॅक्टोबरपर्यंत उमेदवारांना आपला अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर २८८ मतदारसंघातील लढतींचे चित्र स्पष्ट होईल. राज्यभरातील तब्बल ९० हजार ४०३ मतदान केंद्रावर त्यासाठी १५ आॅक्टोबर रोजी मतदान होईल. १९ आॅक्टोबर रोजी मतमोजणी असेल. (प्रतिनिधी)