शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

2005 पासून झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 707 भारतीयांचा मृत्यू

By admin | Updated: July 16, 2016 15:45 IST

2005 पासून झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 700 निष्पापांनी आपला जीव गमावला असून 3200 लोक जखमी झाले आहेत

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 16 - भारतावर 2005 सालापासून झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी आणि मृत झालेल्यांची आकडेवारी सरकारने जाहीर केली आहे. 2005 पासून झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 700 निष्पापांनी आपला जीव गमावला असून 3200 लोक जखमी झाले आहेत. हथरस येथील माहिती अधिकार कार्यकर्ता गौरव अग्रवाल यांनी आरटीआयद्वारे गृहमंत्रालयाकडून ही माहिती मागवली होती. 
 
पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचादेखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे. 2 जानेवारीला पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 7 सुरक्षा जवान शहीद झाले होते. तर एका नागरिकाने आपला जीव गमावला होता. 37 लोक या हल्ल्यात जखमी झाले होते.
 
आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईलाही 2005 पासून 2 दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा लागला आहे. 11 जुलै 2006मध्ये लोकल ट्रेनमध्ये ब्लास्ट करण्यात आले होते. ज्यामध्ये 187 लोकांनी आपला जीव गमावला, तर 817 जण जखमी झाले होते. यानंतर लगेचच दोन वर्षात मुंबईवर भारतातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. 26 नोव्हेंबर 2008 मध्ये समुद्रामार्गे भारतात दाखल झालेल्या दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरलं  होतं. या हल्ल्यात एकूण 175 जणांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये 9 दहशतवाद्यांचा देखील समावेश आहे. 291 लोक या हल्ल्यात जखमी झाले होते. 
 
दिल्लीलादेखील दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा लागला आहे. 29 ऑक्टोबर 2005 मध्ये पहाडगंज, सरोजिनी नगर आणि डीटीसी बसमध्ये सिरिअल ब्लास्ट करण्यात आले. या स्फोटात 50 जण मृत्यूमुखी पडले तर 105 जण जखमी झाले होते. 2008 मध्ये झालेल्या स्फोटात 23 जणांचा मृत्यू झाला तर 156 जण जखमी झाले होते.