शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

2005 पासून झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 707 भारतीयांचा मृत्यू

By admin | Updated: July 16, 2016 15:45 IST

2005 पासून झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 700 निष्पापांनी आपला जीव गमावला असून 3200 लोक जखमी झाले आहेत

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 16 - भारतावर 2005 सालापासून झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी आणि मृत झालेल्यांची आकडेवारी सरकारने जाहीर केली आहे. 2005 पासून झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 700 निष्पापांनी आपला जीव गमावला असून 3200 लोक जखमी झाले आहेत. हथरस येथील माहिती अधिकार कार्यकर्ता गौरव अग्रवाल यांनी आरटीआयद्वारे गृहमंत्रालयाकडून ही माहिती मागवली होती. 
 
पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचादेखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे. 2 जानेवारीला पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 7 सुरक्षा जवान शहीद झाले होते. तर एका नागरिकाने आपला जीव गमावला होता. 37 लोक या हल्ल्यात जखमी झाले होते.
 
आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईलाही 2005 पासून 2 दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा लागला आहे. 11 जुलै 2006मध्ये लोकल ट्रेनमध्ये ब्लास्ट करण्यात आले होते. ज्यामध्ये 187 लोकांनी आपला जीव गमावला, तर 817 जण जखमी झाले होते. यानंतर लगेचच दोन वर्षात मुंबईवर भारतातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. 26 नोव्हेंबर 2008 मध्ये समुद्रामार्गे भारतात दाखल झालेल्या दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरलं  होतं. या हल्ल्यात एकूण 175 जणांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये 9 दहशतवाद्यांचा देखील समावेश आहे. 291 लोक या हल्ल्यात जखमी झाले होते. 
 
दिल्लीलादेखील दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा लागला आहे. 29 ऑक्टोबर 2005 मध्ये पहाडगंज, सरोजिनी नगर आणि डीटीसी बसमध्ये सिरिअल ब्लास्ट करण्यात आले. या स्फोटात 50 जण मृत्यूमुखी पडले तर 105 जण जखमी झाले होते. 2008 मध्ये झालेल्या स्फोटात 23 जणांचा मृत्यू झाला तर 156 जण जखमी झाले होते.