शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

2005 पासून झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 707 भारतीयांचा मृत्यू

By admin | Updated: July 16, 2016 15:45 IST

2005 पासून झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 700 निष्पापांनी आपला जीव गमावला असून 3200 लोक जखमी झाले आहेत

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 16 - भारतावर 2005 सालापासून झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी आणि मृत झालेल्यांची आकडेवारी सरकारने जाहीर केली आहे. 2005 पासून झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 700 निष्पापांनी आपला जीव गमावला असून 3200 लोक जखमी झाले आहेत. हथरस येथील माहिती अधिकार कार्यकर्ता गौरव अग्रवाल यांनी आरटीआयद्वारे गृहमंत्रालयाकडून ही माहिती मागवली होती. 
 
पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचादेखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे. 2 जानेवारीला पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 7 सुरक्षा जवान शहीद झाले होते. तर एका नागरिकाने आपला जीव गमावला होता. 37 लोक या हल्ल्यात जखमी झाले होते.
 
आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईलाही 2005 पासून 2 दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा लागला आहे. 11 जुलै 2006मध्ये लोकल ट्रेनमध्ये ब्लास्ट करण्यात आले होते. ज्यामध्ये 187 लोकांनी आपला जीव गमावला, तर 817 जण जखमी झाले होते. यानंतर लगेचच दोन वर्षात मुंबईवर भारतातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. 26 नोव्हेंबर 2008 मध्ये समुद्रामार्गे भारतात दाखल झालेल्या दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरलं  होतं. या हल्ल्यात एकूण 175 जणांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये 9 दहशतवाद्यांचा देखील समावेश आहे. 291 लोक या हल्ल्यात जखमी झाले होते. 
 
दिल्लीलादेखील दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा लागला आहे. 29 ऑक्टोबर 2005 मध्ये पहाडगंज, सरोजिनी नगर आणि डीटीसी बसमध्ये सिरिअल ब्लास्ट करण्यात आले. या स्फोटात 50 जण मृत्यूमुखी पडले तर 105 जण जखमी झाले होते. 2008 मध्ये झालेल्या स्फोटात 23 जणांचा मृत्यू झाला तर 156 जण जखमी झाले होते.