शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
2
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

५३ पतसंस्थांचे अद्याप लेखापरिक्षणच नाही २६ पतसंस्थावर प्रशासक : १४ मालमत्तांवर शासनाकडून ९ कोटी ३० लाखांचे बोजे

By admin | Updated: November 20, 2015 23:54 IST

(ग्रामीणसाठी/हॅलोवर घेतली आहे)

(ग्रामीणसाठी/हॅलोवर घेतली आहे)
विलास बारी
जळगाव : अडचणीत असलेल्या नागरी व ग्रामीण पतसंस्थांना बाहेर काढण्यासाठी सहकार विभागातर्फे व्यापक प्रमाणात मोहिम राबविण्यात आली. मात्र अडचणीतील १७८ पतसंस्थापैकी आजही तब्बल ५४ पतसंस्थांचे लेखापरिक्षण बाकी असल्याची धक्कादायक स्थिती आहे. अडचणीतील पतसंस्थामधील कामकाजात सुधारणा करण्यासाठी २६ संस्थांवर प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे.
लेखापरिक्षणावर दिला भर
जिल्ह्यातील अडचणीत असणार्‍या पतसंस्थांच्या वर्षवार लेखापरीक्षणावर भर देण्यात आला. जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ या कार्यालयातील प्राप्त माहितीनुसार अडचणीतील १७८ पतसंस्थांपैकी १६७ पतसंस्थांच्या लेखापरिक्षणावर जोर देण्यात आला. २०१२ मध्ये १४५ संस्थांचे लेखापरिक्षण करण्यात आले. यावर्षी २२ संस्थाचे लेखापरिक्षण बाकी होते. २०१३ मध्ये १२० संस्थांचे लेखापरिक्षण झाले मात्र ४७ पतसंस्थांचे लेखापरिक्षण करता आले नाही. २०१४ अखेर केवळ ११४ संस्थांचे लेखापरिक्षण करण्यात आले. यावर्षी तब्बल ५३ पतसंस्थांचे लेखापरिक्षण बाकी होते.
१९ पतसंस्थांचे रेकॉर्डच नाही
अडचणीतील या पतसंस्थांचे शासकीय लेखा परीक्षकाकडे लेखा परिक्षण सोपविण्यात आले. मात्र तब्बल १९ संस्थांकडे रेकॉर्डच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यात एक संस्था ही अवसायनातील आहे. शासकीय लेखापरीक्षकांकडे लेखापरीक्षणासाठी दिलेल्या १५ तर सनदी लेखापरीक्षकाकडे दिलेल्या १९ पतसंस्थांचे लेखापरिक्षण बाकी आहे.
१८ कोटी रुपयांची रक्कम गेली परत
ठेवीदारांचा ठेवीसाठी वाढता तगादा लक्षात घेऊन विधवा, परित्यक्ता, दारिद्रयरेषेखालील, सेवानिवृत्त तसेच ५० हजार मर्यादेपर्यंत ठेवी असलेल्या ठेवीदारांना दहा हजार रुपयांपर्यत ठेवी परत देण्यासाठी ९७ कोटी ९४ लाख रुपयांच्या अर्थसहाय्याची मागणी शासनाकडे करण्यात आली. त्यापैकी शासनाकडून ९७ कोटी ९४ लाखांचे अर्थसहाय्य प्राप्त झाले. या रकमेतून ९९ हजार १८६ ठेवीदारांना ७९ कोटी ९४ लाखांची रक्कम धनादेशाद्वारे वाटप करण्यात आली. त्यापैकी १७ कोटी ८८ लाखांचा निधी वाटप न केल्यामुळे ते शासनाकडे वर्ग करण्यात आले.