शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
3
कोण आहे बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
4
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
5
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
6
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
7
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
8
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता
9
हिरो डॉग! मालकाला वाचवण्यासाठी जळते डायनामाइट तोंडात धरले अन्..; Video पाहून भावूक झाले लोक
10
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
11
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
12
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
13
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
14
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
15
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
16
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
17
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
18
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
19
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
20
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट

५३ पतसंस्थांचे अद्याप लेखापरिक्षणच नाही २६ पतसंस्थावर प्रशासक : १४ मालमत्तांवर शासनाकडून ९ कोटी ३० लाखांचे बोजे

By admin | Updated: November 20, 2015 23:54 IST

(ग्रामीणसाठी/हॅलोवर घेतली आहे)

(ग्रामीणसाठी/हॅलोवर घेतली आहे)
विलास बारी
जळगाव : अडचणीत असलेल्या नागरी व ग्रामीण पतसंस्थांना बाहेर काढण्यासाठी सहकार विभागातर्फे व्यापक प्रमाणात मोहिम राबविण्यात आली. मात्र अडचणीतील १७८ पतसंस्थापैकी आजही तब्बल ५४ पतसंस्थांचे लेखापरिक्षण बाकी असल्याची धक्कादायक स्थिती आहे. अडचणीतील पतसंस्थामधील कामकाजात सुधारणा करण्यासाठी २६ संस्थांवर प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे.
लेखापरिक्षणावर दिला भर
जिल्ह्यातील अडचणीत असणार्‍या पतसंस्थांच्या वर्षवार लेखापरीक्षणावर भर देण्यात आला. जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ या कार्यालयातील प्राप्त माहितीनुसार अडचणीतील १७८ पतसंस्थांपैकी १६७ पतसंस्थांच्या लेखापरिक्षणावर जोर देण्यात आला. २०१२ मध्ये १४५ संस्थांचे लेखापरिक्षण करण्यात आले. यावर्षी २२ संस्थाचे लेखापरिक्षण बाकी होते. २०१३ मध्ये १२० संस्थांचे लेखापरिक्षण झाले मात्र ४७ पतसंस्थांचे लेखापरिक्षण करता आले नाही. २०१४ अखेर केवळ ११४ संस्थांचे लेखापरिक्षण करण्यात आले. यावर्षी तब्बल ५३ पतसंस्थांचे लेखापरिक्षण बाकी होते.
१९ पतसंस्थांचे रेकॉर्डच नाही
अडचणीतील या पतसंस्थांचे शासकीय लेखा परीक्षकाकडे लेखा परिक्षण सोपविण्यात आले. मात्र तब्बल १९ संस्थांकडे रेकॉर्डच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यात एक संस्था ही अवसायनातील आहे. शासकीय लेखापरीक्षकांकडे लेखापरीक्षणासाठी दिलेल्या १५ तर सनदी लेखापरीक्षकाकडे दिलेल्या १९ पतसंस्थांचे लेखापरिक्षण बाकी आहे.
१८ कोटी रुपयांची रक्कम गेली परत
ठेवीदारांचा ठेवीसाठी वाढता तगादा लक्षात घेऊन विधवा, परित्यक्ता, दारिद्रयरेषेखालील, सेवानिवृत्त तसेच ५० हजार मर्यादेपर्यंत ठेवी असलेल्या ठेवीदारांना दहा हजार रुपयांपर्यत ठेवी परत देण्यासाठी ९७ कोटी ९४ लाख रुपयांच्या अर्थसहाय्याची मागणी शासनाकडे करण्यात आली. त्यापैकी शासनाकडून ९७ कोटी ९४ लाखांचे अर्थसहाय्य प्राप्त झाले. या रकमेतून ९९ हजार १८६ ठेवीदारांना ७९ कोटी ९४ लाखांची रक्कम धनादेशाद्वारे वाटप करण्यात आली. त्यापैकी १७ कोटी ८८ लाखांचा निधी वाटप न केल्यामुळे ते शासनाकडे वर्ग करण्यात आले.