शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
3
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
4
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
5
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
6
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
7
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
8
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
9
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
10
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
11
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
12
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
13
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
14
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
15
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
16
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
18
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
19
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
20
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न

आयआयटी, एनआयटीमधून ४,४०० विद्यार्थ्यांची गळती

By admin | Updated: August 6, 2015 02:09 IST

गेल्या तीन वर्षांत आयआयटी आणि एनआयटीमधून ४,४०० विद्यार्थी बाहेर पडले. त्यामागे शैक्षणिक ताणासह विविध कारणे होती, अशी चिंता वाढविणारी

नवी दिल्ली : गेल्या तीन वर्षांत आयआयटी आणि एनआयटीमधून ४,४०० विद्यार्थी बाहेर पडले. त्यामागे शैक्षणिक ताणासह विविध कारणे होती, अशी चिंता वाढविणारी माहिती मंगळवारी अधिकृतपणे समोर आली आहे. ही माहिती देतानाच सरकारने योग्य त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत, असे मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.२०१२-१३ आणि २०१४-१५ या दोन वर्षांत विविध आयआयटींमधून २,०६०, तर तीन वर्षांच्या काळात राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थांमधून (एनआयटी) २,३५२ विद्यार्थी बाहेर पडले. विविध संस्था किंवा महाविद्यालयांमध्ये प्रवेश, वैयक्तिक आणि वैद्यकीय गरज, पदव्युत्तर शिक्षण घेताना नोकरी लागणे तसेच शैक्षणिक ताण न झेपणे यासारखी विविध कारणे त्यामागे आहेत, असे त्या लेखी उत्तरात म्हणाल्या. आयआयटी रुरकीमधून सर्वाधिक २२८, त्यापाठोपाठ आयआयटी खरगपूर (२०९) आणि आयआयटी दिल्ली (१६९) विद्यार्थी बाहेर पडले. आयआयटी रुरकीमधील ७३ विद्यार्थ्यांना गेल्या महिन्यात बडतर्फ करण्यात आल्याबाबत त्या म्हणाल्या, की या निर्णयाला आव्हान देण्यात आले असता न्यायालयाने सदर संस्थेचा निर्णय योग्य ठरविला आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची शैक्षणिक कामगिरी नव्हती. या विद्यार्थ्यांनी पुन्हा योग्य दर्जा मिळविला तरच त्यांना पुन्हा प्रवेश दिला जाईल.दोन अपहृत प्रोफेसर्सना परत आणण्याची मागणी१लिबियात अपहरण झालेल्या दोन भारतीय प्रोफेसर्सना मायदेशी परत आणण्याची मागणी तेलगू देसमचे के. राममोहन नायडू यांनी शून्य तासाला लोकसभेत मुद्दा उपस्थित करताना केली. आंध्र प्रदेशमधील प्रो. गोपाल आणि त्यांचे तेलंगणामधील सहकारी अद्यापही अपहृतांच्या तावडीत आहेत. अन्य दोन प्राध्यापकांची मात्र सुटका करण्यात आली आहे.२ इराकमध्ये ३९ भारतीयांचे अपहरण झाल्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले होते. त्याच धर्तीवर प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांनी ३ जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन ‘राष्ट्रीय महिला साक्षरता दिवस’ म्हणून साजरा करण्याची मागणी केली. ३खासदार आणि माजी खासदारांच्या वाहनांसाठी देशभरात टोल आकारला जाऊ नये, अशी मागणी अण्णा द्रमुकचे सी. गोपालकृष्णन यांनी केली. राज्य सरकारच्या जाहिरातींमध्ये मुख्यमंत्र्यांचा फोटो वापरण्याला मुभा दिली जावी, असे याच पक्षाचे खा. पी. आर. सेंथीलनाथन यांनी म्हटले.