शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते अपघातांत रोज ४०० जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2016 04:11 IST

भारतात रोज रस्ते अपघातात किमान ४०० जण मरण पावतात, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिली.

नवी दिल्ली : सदोष बांधणीमुळे भारतात रोज रस्ते अपघातात किमान ४०० जण मरण पावतात, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिली. एकनिष्ठ काम आणि प्रामाणिक प्रयत्न करूनही गेल्या २ वर्षांत फार काही बदल झाला नसल्याची कबुलीही त्यांनी दिली.भारतातील रस्ते अपघाताबाबत २०१५ सालचा अहवाल जारी करताना, केंद्रीय भूपृष्ठवाहतूकमंत्री गडकरी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, ‘या अहवालाने मी फारच व्यथित झालो आहे. भारतात दर तासाला ५७ अपघात होतात आणि त्यात १७ जणांचा मृत्यू होतो. अपघातात मरण पावणाऱ्यांत ५४ टक्के लोक तरुण म्हणजे १५ ते ३४ वयांतील असतात.’‘हा अहवाल पाहून जनता आमच्यावर टीका करेल, तरीही मी हा अहवाल उघड करीत आहे. गेल्या दोन वर्षांत आम्ही निष्ठेने आणि प्रामाणिक प्रयत्न करीत काम केले, पण त्यातून फारसा बदल झाला नाही. यापुढे असे आम्ही होऊ देणार नाही. या अहवालाने आपणास खूपच वेदना होत आहेत,’ असेही गडकरी म्हणाले.अहवाल सादर करताना गडकरी म्हणाले की, ‘मृतांची ही आकडेवारी युद्ध, रोगराई किंवा दहशतवादी कारवायांशी निगडित नाही. केवळ अपघातांतून असे मानवी बळी आम्ही जाऊ देणार नाही. गेल्या दोन वर्षांत याबाबत आम्ही प्रधानमंत्री सडक सुरक्षा योजनेसारख्या उपाययोजना राबविल्या. त्यात रस्त्याच्या बांधणीवर करण्यात येणाऱ्या एकूण खर्चापैकी एक रक्कम सुरक्षेवर खर्च करण्यात येते. ही रक्कम पाच हजार कोटी रुपयांच्या आसपास जाते.’या प्रकाराबद्दल त्यांनी यूपीए सरकारला दोष देण्याचाही प्रयत्न केला. ते म्हणाले की, ‘यूपीएच्या राजवटीत प्रचंड पैसा खर्च करून मोठ्या प्रमाणावर उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग बांधण्यात आले. दिल्ली-गुडगाव पट्ट्यासह महत्त्वाच्या मार्गांवर ही कामे करण्यात आली. त्यातूनही मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत.’ (लोकमत न्यूज नेटवर्क)>2015 मध्ये झालेल्या एकूण रस्ते अपघातांपैकी ७७.१२ टक्के अपघातांना ‘चालकाची चूक’ कारणीभूत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. रस्ते अपघातातील हेच प्रमुख ‘सदोष अभियांत्रिकी’ कारण असल्याचे म्हटले आहे.