शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
2
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
3
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
4
"विश्वासघातकी बदलणार नाहीत...", निवडणुकीपूर्वी भाजपाला धक्का; NDA तून आणखी एक मित्रपक्ष बाहेर पडला
5
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
6
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
7
बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका घेणार; कर्नाटक सरकारचा निर्णय
8
देशभरात एकाच वेळी लागू होणार SIR, वादविवादादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
9
ट्रम्प टॅरिफमुळे GST मध्ये बदल केला का? अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, "गेल्या दीड वर्षांपासून..."
10
Asia Cup 2025 : टीम इंडिया दुबईत पोहचली; आशियातील किंग होण्यासाठी ICC अकादमीत कसून सराव
11
"हिरोईन मटेरियल तू वाटत नाहीस...", असं म्हणत अभिनेत्रीला मालिकेतून दाखवला बाहेरचा रस्ता
12
उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."
13
Anil Chauhan: चीनसोबतचा सीमावाद हे सर्वांत मोठे आव्हान; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे वक्तव्य
14
यमुनेच्या पुराने अर्धी दिल्ली पाण्यात; नोएडा, गाझियाबादमध्ये स्थिती बिकट
15
अल्काराझ-सिनर जोडीसमोर निभाव लागेना! प्रत्येक वेळी दोघांपैकी एक येतोय जोकोच्या आडवा
16
‘सीसीएमपी’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना दिलासा, होमिओपॅथी डॉक्टर ‘एमएमसी’मध्ये नोंद करू शकणार
17
Viral Video : पोर्शमध्ये आई तर फॉर्च्युनरमध्ये मुलगा, रस्त्यावर लागली भन्नाट रेस! व्हिडीओ बघून व्हाल थक्क
18
घोड्यांचे रक्त पाजून ब्राझीलच्या फॅक्टरीत दररोज तयार केले जातात कोट्यवधी मच्छर; कारण काय?
19
ते ‘ट्रम्प’ आणि हे ‘पिपाण्या’…एवढाच काय तो फरक; भाजपानं उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक कौतुक करताच पंतप्रधान मोदी यांनीही मानले आभार! म्हणाले...

रस्ते अपघातांत रोज ४०० जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2016 04:11 IST

भारतात रोज रस्ते अपघातात किमान ४०० जण मरण पावतात, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिली.

नवी दिल्ली : सदोष बांधणीमुळे भारतात रोज रस्ते अपघातात किमान ४०० जण मरण पावतात, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिली. एकनिष्ठ काम आणि प्रामाणिक प्रयत्न करूनही गेल्या २ वर्षांत फार काही बदल झाला नसल्याची कबुलीही त्यांनी दिली.भारतातील रस्ते अपघाताबाबत २०१५ सालचा अहवाल जारी करताना, केंद्रीय भूपृष्ठवाहतूकमंत्री गडकरी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, ‘या अहवालाने मी फारच व्यथित झालो आहे. भारतात दर तासाला ५७ अपघात होतात आणि त्यात १७ जणांचा मृत्यू होतो. अपघातात मरण पावणाऱ्यांत ५४ टक्के लोक तरुण म्हणजे १५ ते ३४ वयांतील असतात.’‘हा अहवाल पाहून जनता आमच्यावर टीका करेल, तरीही मी हा अहवाल उघड करीत आहे. गेल्या दोन वर्षांत आम्ही निष्ठेने आणि प्रामाणिक प्रयत्न करीत काम केले, पण त्यातून फारसा बदल झाला नाही. यापुढे असे आम्ही होऊ देणार नाही. या अहवालाने आपणास खूपच वेदना होत आहेत,’ असेही गडकरी म्हणाले.अहवाल सादर करताना गडकरी म्हणाले की, ‘मृतांची ही आकडेवारी युद्ध, रोगराई किंवा दहशतवादी कारवायांशी निगडित नाही. केवळ अपघातांतून असे मानवी बळी आम्ही जाऊ देणार नाही. गेल्या दोन वर्षांत याबाबत आम्ही प्रधानमंत्री सडक सुरक्षा योजनेसारख्या उपाययोजना राबविल्या. त्यात रस्त्याच्या बांधणीवर करण्यात येणाऱ्या एकूण खर्चापैकी एक रक्कम सुरक्षेवर खर्च करण्यात येते. ही रक्कम पाच हजार कोटी रुपयांच्या आसपास जाते.’या प्रकाराबद्दल त्यांनी यूपीए सरकारला दोष देण्याचाही प्रयत्न केला. ते म्हणाले की, ‘यूपीएच्या राजवटीत प्रचंड पैसा खर्च करून मोठ्या प्रमाणावर उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग बांधण्यात आले. दिल्ली-गुडगाव पट्ट्यासह महत्त्वाच्या मार्गांवर ही कामे करण्यात आली. त्यातूनही मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत.’ (लोकमत न्यूज नेटवर्क)>2015 मध्ये झालेल्या एकूण रस्ते अपघातांपैकी ७७.१२ टक्के अपघातांना ‘चालकाची चूक’ कारणीभूत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. रस्ते अपघातातील हेच प्रमुख ‘सदोष अभियांत्रिकी’ कारण असल्याचे म्हटले आहे.