आक्सा बीचवर ४ तरुणांचे प्राण वाचले!
By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST
आक्सा बीचवर ४ तरुणांचे प्राण वाचले!
आक्सा बीचवर ४ तरुणांचे प्राण वाचले!
आक्सा बीचवर ४ तरुणांचे प्राण वाचले!मालाड : आक्सा बीचवर शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बुडणार्या चार तरुणांना अग्निशमन दलाच्या जीवरक्षकांनी सुखरुप बाहेर काढले. संचित तिवारी, कमलेश यादव, किर्ती पाठक, रजनीश ठाकूर अशी त्यांची नावे आहेत.अंधेरी(पूर्व)येथील पूनम नगर मधील इमारत क्रमांक २२६ मध्ये वास्तव्यास असलेले हे चार तरुण आपल्या मित्रांसोबत येथे आले होते. समुद्रात पोहताना तरुणांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. आणि ते ऐन ओहोटीला शंभर मीटर आत पाण्यात बुडू लागले. या घटनेची माहिती मिळताच पालिकेचे समीर कोळी, सचिन मुळीक, मोहन एरंडे, प्रवीण चव्हाण, नथुराम सूर्यवंशी, जयेश कोळी, प्रीतम कोळी, गणपती कोळेकर, निवृत्त जीवरक्षक रजनीकांत माशेलकर यांच्यासह नागरी सुरक्षा दलाचे विनोद जयस्वाल, चंदन कोळी, राहूल रणदिवे, नंदकुमार मिश्रा यांनी या बुडणार्या तरुणांचे प्राण वाचविले................................