शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

रेल्वे स्टेशनवर 1 रुपयात मिळणार 300 मिली पाणी

By admin | Updated: June 6, 2016 16:59 IST

रेल्वे प्रवाशांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे यासाठी रेल्वे स्थानकांवर 'वॉटर पॉईंट' स्टॉल उभारण्यात आले असून फक्त 1 रुपयात 300 मिली पाणी देण्याची सोय केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 06 - तुम्ही रेल्वे स्थानकावर आहात आणि तुम्हाला प्रचंड तहान लागली आहे, समोर पाणपोई आहे मात्र त्याची अस्वच्छता पाहून तुम्ही नाक मुरडता आणि मनात नसतानाही 10 ते 20 रुपये देऊन बाटलीबंद पाणी खरेदी करता...हा अनुभव सर्वच रेल्वे प्रवाशांना एकदा तरी आलेला असतोच. मात्र रेल्वेने प्रवाशांसाठी आता फक्त 1 रुपयात 300 मिली पाणी देण्याची सोय केली आहे. 
 
 
रेल्वे प्रवाशांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे यासाठी रेल्वे स्थानकांवर 'वॉटर पॉईंट' स्टॉल उभे करण्यात येणार आहेत. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने (आयआरसीटीसी) याची जबाबदारी घेतली आहे. या माध्यमातून रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना कमी दरात स्वच्छ पाणी मिळणार आहे. महत्वाचं म्हणजे प्रवाशांना देण्यात येणा-या पाण्याची आरओ मेकॅनिझमच्या (पाणी स्वच्छ करण्याचं तंत्र) सात टप्प्यांमध्ये चाचणी करण्यात आली असून पुर्णपण जंतूमुक्त असणार आहे.
 
हे मशिन एटीएमप्रमाणे असणार - 
हे मशीन एटीएम मशिनप्रमाणे असणार असून यामध्ये पैसे टाकल्यानंतर पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. या मशीनमध्ये दोन पर्याय असून एकामध्ये केवळ पाणी उपलब्ध होईल. पण जर तुमच्याकडे पाणी भरुन घेण्यासाठी काही साधन नसेल तर दुसर्‍या पर्यायामधून बाटलीबंद पाणी विकत घेऊ शकता. 300 मिली पाण्यासाठी प्रवाशांना 1 रुपया, अर्धा लिटर पाण्यासाठी 3 रुपये, एक लीटर पाण्यासाठी 5 रुपये, 2 लीटर पाण्यासाठी 8 रुपये आणि 5 लीटर पाण्यासाठी प्रवाशांना 20 रुपये मोजावे लागणार आहेत. 
सध्या ही सेवा दिल्लीमधील आनंद विहार रेल्वे स्थानकावर आणि कानपूर रेल्वे स्थानकावर पुरवली जात आहे.  रेल्वे मंत्रालयाने इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडकडे (आयआरसीटीसी) या मशीन बसविण्याची जबाबदारी सोपवली आहे.  प्रवाशांची तहान भागवण्यासाठी रेल्वे स्थानकांवर पाणपोई उभारण्यात आल्या आहेत. मात्र या पाणपोईंची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी पाणपोई असल्या तरी त्याला नळ नसणे, अस्वच्छता अशा गोष्टींमुळे रेल्वे प्रवासी दहा ते वीस रुपये खर्च करुन बाटलीबंद पाणी खरेदी करतात. 
 
 
मुंबईमध्ये देखील रेल्वे स्थानकांवर या वॉटर मशिन्स बसवण्यात येणार आहेत. आयआरसीटीसी बोरिवली आणि खार स्थानकात हाय-टेक वॉटर एटीएम मशीन बसवणार आहे. या मशीनची चाचणी झाल्यानंतर त्या रेल्वे स्थानकांवर बसवण्यात येतील. यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण मुंबई विभागात या मशीन बसवण्यात येणार आहेत.