शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

देशात २.८ कोटी खटले प्रलंबित

By admin | Updated: January 16, 2017 04:56 IST

देशात जिल्हा न्यायालयांत २.८ कोटी खटले प्रलंबित असून या न्यायालयांत पाच हजार न्यायाधीशांच्या जागा रिक्त आहेत.

नवी दिल्ली : देशात जिल्हा न्यायालयांत २.८ कोटी खटले प्रलंबित असून या न्यायालयांत पाच हजार न्यायाधीशांच्या जागा रिक्त आहेत. आता १५ हजारांहून अधिक न्यायाधीशांची नियुक्ती करून या संकटातून बाहेर पडता येईल अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या दोन अहवालांत करण्यात आली आहे. ‘इंडियन ज्युडिशिअरी अ‍ॅन्युअल रिपोर्ट २०१५-२०१६’ व ‘सबआॅर्डिनेट कोर्टस आॅफ इंडिया : अ रिपोर्ट आॅन अ‍ॅक्सेस टू जस्टीस २०१६’ या अहवालांत सूचना आहेत. देशातील जिल्हा न्यायालयांत एक जुलै २०१५ ते ३० जून २०१६ या कालावधीत दिवाणी आणि फौजदारी मिळून दोन कोटी ८१ लाख २५ हजार ६६ खटले प्रलंबित आहेत, असे अहवालात म्हटले आहे. याच कालावधीत एक कोटी ८९ लाख चार हजार २२२ खटले निकालीही निघाले आहेत. दुय्यम न्यायालयांमध्ये न्यायाधीशांची कमी संख्या हेच खटले प्रलंबित राहण्यामागील अनेक कारणांपैकी एक मुख्य कारण आहे व तो काळजीचाही विषय आहे. दुय्यम न्यायालयांसाठी २१ हजार ३२४ जागा मंजूर असून ४ हजार ९५४ न्यायाधीशांच्या जागा भरायच्या आहेत. याविषयी केलेला अभ्यास आणि भविष्यात वाढणाऱ्या खटल्यांचा विचार करून सध्याची न्यायाधीशांची संख्या ही त्या तुलनेत अपुरी आहे. अतिरिक्त न्यायालयीन मनुष्यबळ आणि पूरक कर्मचारी वर्ग तसेच पायाभूत सुविधा असेल, तरच ही परिस्थिती हाताळता येईल, असे हा जिल्हा न्यायालयांवरील अहवाल म्हणतो. वरिष्ठ न्यायालयांतील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या व पायाभूत सुविधांच्या प्रश्नावरून कार्यकारी सत्ता आणि न्यायपालिका यांच्यात सुरू असलेला संघर्ष पाहता सरकारला या प्रश्नाला हाताळण्यात अपयश आल्याचे तीव्र शेरे अहवालात आले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क) >21324 जागा दुय्यम न्यायालयांसाठी मंजूर >4954 न्यायाधीशांच्या जागा भरायच्या आहेत