शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

देशात २.८ कोटी खटले प्रलंबित

By admin | Updated: January 16, 2017 04:56 IST

देशात जिल्हा न्यायालयांत २.८ कोटी खटले प्रलंबित असून या न्यायालयांत पाच हजार न्यायाधीशांच्या जागा रिक्त आहेत.

नवी दिल्ली : देशात जिल्हा न्यायालयांत २.८ कोटी खटले प्रलंबित असून या न्यायालयांत पाच हजार न्यायाधीशांच्या जागा रिक्त आहेत. आता १५ हजारांहून अधिक न्यायाधीशांची नियुक्ती करून या संकटातून बाहेर पडता येईल अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या दोन अहवालांत करण्यात आली आहे. ‘इंडियन ज्युडिशिअरी अ‍ॅन्युअल रिपोर्ट २०१५-२०१६’ व ‘सबआॅर्डिनेट कोर्टस आॅफ इंडिया : अ रिपोर्ट आॅन अ‍ॅक्सेस टू जस्टीस २०१६’ या अहवालांत सूचना आहेत. देशातील जिल्हा न्यायालयांत एक जुलै २०१५ ते ३० जून २०१६ या कालावधीत दिवाणी आणि फौजदारी मिळून दोन कोटी ८१ लाख २५ हजार ६६ खटले प्रलंबित आहेत, असे अहवालात म्हटले आहे. याच कालावधीत एक कोटी ८९ लाख चार हजार २२२ खटले निकालीही निघाले आहेत. दुय्यम न्यायालयांमध्ये न्यायाधीशांची कमी संख्या हेच खटले प्रलंबित राहण्यामागील अनेक कारणांपैकी एक मुख्य कारण आहे व तो काळजीचाही विषय आहे. दुय्यम न्यायालयांसाठी २१ हजार ३२४ जागा मंजूर असून ४ हजार ९५४ न्यायाधीशांच्या जागा भरायच्या आहेत. याविषयी केलेला अभ्यास आणि भविष्यात वाढणाऱ्या खटल्यांचा विचार करून सध्याची न्यायाधीशांची संख्या ही त्या तुलनेत अपुरी आहे. अतिरिक्त न्यायालयीन मनुष्यबळ आणि पूरक कर्मचारी वर्ग तसेच पायाभूत सुविधा असेल, तरच ही परिस्थिती हाताळता येईल, असे हा जिल्हा न्यायालयांवरील अहवाल म्हणतो. वरिष्ठ न्यायालयांतील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या व पायाभूत सुविधांच्या प्रश्नावरून कार्यकारी सत्ता आणि न्यायपालिका यांच्यात सुरू असलेला संघर्ष पाहता सरकारला या प्रश्नाला हाताळण्यात अपयश आल्याचे तीव्र शेरे अहवालात आले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क) >21324 जागा दुय्यम न्यायालयांसाठी मंजूर >4954 न्यायाधीशांच्या जागा भरायच्या आहेत