शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
3
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
4
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
5
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
6
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
7
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
8
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
9
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
10
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
11
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
12
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
13
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
14
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
15
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
16
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
17
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
18
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
19
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
20
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  

२५ वाहनांचा अपघात

By admin | Updated: February 11, 2016 03:36 IST

हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यात दिल्ली-अंबाला राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी २५ वाहने एकमेकांवर आदळल्याने झालेल्या विचित्र अपघातात एकाच कुटुंबातील चार सदस्यांसह

चंदीगड : हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यात दिल्ली-अंबाला राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी २५ वाहने एकमेकांवर आदळल्याने झालेल्या विचित्र अपघातात एकाच कुटुंबातील चार सदस्यांसह ५ जण ठार, तर १५ जखमी झाले. जिल्ह्यातील निलोखेडी गावाजवळ हा अपघात झाला, असे कर्नालचे पोलीस अधीक्षक पंकज नैन यांनी सांगितले. सकाळी दाट धुक्यांमुळे समोरचे न दिसल्याने एक कार उभ्या ट्रकवर जाऊन आदळली. त्यानंतर त्या कारच्या मागून येणारी इतर वाहने एकापाठोपाठ एक समोरच्या वाहनांवर आदळत गेली. ट्रकच्या धडकेने तीन मुली ठारराय बरेली : ट्रकच्या धडकेने तीन किशोरवयीन मुली ठार झाल्या. येथील लालगंज कोतवाली भागात बुधवारी घडला. पोलीस भरतीसाठी पूजा, ज्योती (दोघीही १८) आणि पूनम (१६) धावण्याचा सराव करीत असताना ही दुर्घटना घडली. (वृत्तसंस्था)एकाच कुटुंबातील ४या अपघातात पाचजण मृत्युमुखी पडले असून त्यापैकी चौघे उत्तर प्रदेशातील एकाच कुटुंबातील आहेत. लग्नासाठी ते पंजाबला जात होते. गंभीर जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, महामार्ग स्वच्छ केल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. दोन ट्रक्समध्ये रिक्षा येऊन सात जण ठार बहरामपूर (पश्चिम बंगाल) : दोन ट्रक्समध्ये व्हॅन रिक्षा चेंदली जाऊन सात जण ठार तर चार जण जखमी झाले. ही दुर्घटना मुर्शिदाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग ३४ वरील आयहोरन येथे बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली. हे दोन्ही ट्रक्स अतिशय वेगात असताना ही ११ प्रवाशांना घेऊन निघालेली व्हॅन रिक्षा त्यांच्यामध्ये सापडली.सर्व जखमींना जांगीरपूर उपविभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर दोन्ही ट्रक्सचे चालक फरार झाले.कालव्यात पडलेल्या सहाही जवानांना पाणबुड्यांनी वाचविलेगाझियाबाद : कालव्यात पडलेल्या ट्रकमधील सहाही जवानांना स्थानिक पाणबुड्यांनी त्यांना वाचविले. हे जवान मेरठ लष्करी छावणीतील होते व दिल्लीला निघाले होते. त्यांना घेऊन जाणारा ट्रक येथील मुरादनगर भागातील गंगा कालव्यात पडला. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात सकाळी साडेसातच्या सुमारास घडला.