शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

गरीब मुलींच्या विवाहाला २०४ कोटी

By admin | Updated: September 23, 2016 01:26 IST

तामिळनाडूतील जयललिता सरकारने गरीब मुलींच्या विवाहाला साहाय्य करण्यासाठी ‘तालिकू तंगम’ (पवित्र मंगळसूत्रासाठी सोने) ही २०४ कोटी रुपयांची योजना सुरू केली.

चेन्नई : तामिळनाडूतील जयललिता सरकारने गरीब मुलींच्या विवाहाला साहाय्य करण्यासाठी ‘तालिकू तंगम’ (पवित्र मंगळसूत्रासाठी सोने) ही २०४ कोटी रुपयांची योजना सुरू केली. चालू आर्थिक वर्षात या योजनेसाठी २०४ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून, याचा १२ हजार ५०० महिलांना लाभ होणार असल्याचे सरकारने गुरुवारी सांगितले. या योजनेंतर्गत गरीब आई-वडील, विधवा आणि इतरांच्या मुलींना लग्नासाठी सोने आणि इतर स्वरूपाचे साहाय्य करण्यात येते. लाभार्थी मुलगी दहावी उत्तीर्ण असेल, तर तिला २५ हजार रुपये आणि पदवीपूर्व शिक्षण किंवा पदविकाधारक असल्यास तिला ५० हजार रुपयांचे साहाय्य करण्याचीही यात तरतूद आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. सत्ताधारी अण्णा द्रमुकने २०११ च्या निवडणुकीदरम्यान गरीब मुलींच्या विवाहासाठी चार ग्रॅम सोने देण्याचे, तर गेल्या निवडणुकीदरम्यान ते वाढवून ८ गॅ्रम करण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन पूर्ण करीत, मुख्यमंत्री जयललिता यांनी बुधवारी ही वाढीव योजना सुरू केली आणि पाच लाभार्थ्यांना प्रत्येकी ८ ग्र्रॅम वजनाचे नाणे दिले. हे लाभार्थी त्यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या डॉ. राधाकृष्णनगरसह कांचीपुरम येथील रहिवासी आहेत. (वृत्तसंस्था)