शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

२०... भिष्णूर... पाऊस

By admin | Updated: February 21, 2015 00:49 IST

भिष्णूर परिसरात गारपीट

भिष्णूर परिसरात गारपीट
पिकांचे नुकसान : शेतकरी संकटात
नरखेड : तालुक्यातील भिष्णूर परिसरात शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. दरम्यान, या परिसरात गारपीट झाल्याने संत्रा, गहू, हरभरा व आंब्याच्या बहाराचे नुकसान झाले आहे.
यावर्षी खरीप पिकांनी प्रतिकूल वातावरणामुळे शेतकऱ्यांना धोका दिल्याने शेतकऱ्यांनी रबी पिकांवर आशा केंद्रीत केल्या होत्या. त्यातच शुक्रवारी दुपारी भिष्णूर, थाटूरवाडा, खुशालपूर, नायगाव (धोटे), विवरा या शिवारात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यातच बोराच्या आकाराची गारपीट झाल्याने या शिवारातील गहू, हरभरा, संत्र्याचा अंबिया बहार, कपाशी, तूर या पिकांसह आंब्याच्या बहाराचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शासनाने योग्य नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य सतीश रेवतकर, सरपंच प्रभा काचेवार, योगेश कळंभे, प्रदीप नासरे, जिजा रेवतकर, अनुसया नासरे, वेणू रेवतकर, दिनेश कडू, अमोल तिवारी, मोहन निंबाळकर, चिंटू धोटे, बाबू खरपकर, किशोर ठाकरे, ओमप्रकाश काळमेघ यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, तालुक्यातील लोहारीसावंगा, जलालखेडा, खैरगाव, खरसोली या परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. काटोल व कळमेश्वर तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, कुठेही पावसाच्या सरी कोसळल्याची नोंद नाही.
***