शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

बुलंदशहर सामुहिक बलात्कार प्रकरणात १५ संशयित ताब्यात...

By admin | Updated: July 31, 2016 19:18 IST

महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणात १५ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून मुख्य आरोपीची ओळख पटली आहे.

ऑनलाइन लोकमतबुलंदशहर, दि. ३१ : महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणात १५ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून मुख्य आरोपीची ओळख पटली आहे. दिल्ली-कानपूर राष्ट्रीय महामार्गावरील बुलंदशहर वळण रस्त्यावर अत्याचाराची घटना शुक्रवारी रात्री घडली. दरोडेखोरांनी महिला व मुलीला त्यांच्या कारमधून ओढून नेले होते.

अखिलेश यादव यांनी बुलंदशहरच्या उप पोलीस अधीक्षकांना या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी २४ तासांची मुदत दिली आहे. त्याशिवाय त्या भागातील पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले. बुलंदशहरचे उप पोलीस अधीक्षक वैभव कृष्णा म्हणाले की गुन्हेगारांना पकडण्यासाठी विशेष कृती दलाच्या १५ तुकड्या कामाला लावण्यात आल्या असून बुलंदशहर, मेरठ व इतर जिल्ह्यांत तसेच राज्यातही छापे टाकण्यात येत आहेत. १५ संशयितांना पकडण्यात आले असून मुख्य आरोपीची ओळख पटली आहे. तो भटक्या जमातीचा असून गुन्हेगारीत सक्रिय आहे.

अत्याचार झालेले कुटुंब नोएडाहून शहाजहानपूरला कारने निघाले होते. दरोडेखोरांच्या टोळीने त्यांच्यावर दबा धरून हल्ला केला. महिला व तिच्या १३ वर्षांच्या मुलीला बाहेर ओढले व जवळच्या शेतात नेले व तेथे त्यांच्यावर बलात्कार केला. कारमधील पुरुषांना दोरीने बांधून टाकण्यात आले होते. त्यांनी रोख रक्कम, दागिने व मोबाईल फोन्सही लुटले. कुटुंबातील एकाने पळून जाण्यात यश मिळवून घटना पोलिसांना कळविली. या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याबद्दल कोतवाली देहातचे ठाणे अमलदार रामसेन यांना या प्रकरणातून दूर करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर विरोधकांनी जोरदार हल्ला करून उत्तर प्रदेश म्हणजे गुंडांचे राज्य असल्याचे व प्रशासन कोलमडून पडल्याचे म्हटले. या घटनेची गंभीर दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने म्हटले आहे की पीडितांची व अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी उत्तर प्रदेशला आम्ही सदस्य पाठविला आहे. परंतु अशा प्रकरणांत राज्य प्रशासनाकडून फारसे सहकार्य मिळत नसल्याची तक्रार आयोगाने केली आहे.

भाजप, बसपा आणि काँग्रेसने समाजवादी पक्षाच्या सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी केली. केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी यादव सरकारवर टीका करताना हे कधी संपणार असा प्रश्न विचारला आहे. बसपचे नेते सुधींद्र भदोरिया यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे म्हटले.