शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
3
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
4
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
5
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
6
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
7
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
8
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
9
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
10
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
11
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
12
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
13
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
14
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
15
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
16
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
17
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
18
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
19
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
20
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग

बुलंदशहर सामुहिक बलात्कार प्रकरणात १५ संशयित ताब्यात...

By admin | Updated: July 31, 2016 19:18 IST

महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणात १५ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून मुख्य आरोपीची ओळख पटली आहे.

ऑनलाइन लोकमतबुलंदशहर, दि. ३१ : महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणात १५ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून मुख्य आरोपीची ओळख पटली आहे. दिल्ली-कानपूर राष्ट्रीय महामार्गावरील बुलंदशहर वळण रस्त्यावर अत्याचाराची घटना शुक्रवारी रात्री घडली. दरोडेखोरांनी महिला व मुलीला त्यांच्या कारमधून ओढून नेले होते.

अखिलेश यादव यांनी बुलंदशहरच्या उप पोलीस अधीक्षकांना या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी २४ तासांची मुदत दिली आहे. त्याशिवाय त्या भागातील पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले. बुलंदशहरचे उप पोलीस अधीक्षक वैभव कृष्णा म्हणाले की गुन्हेगारांना पकडण्यासाठी विशेष कृती दलाच्या १५ तुकड्या कामाला लावण्यात आल्या असून बुलंदशहर, मेरठ व इतर जिल्ह्यांत तसेच राज्यातही छापे टाकण्यात येत आहेत. १५ संशयितांना पकडण्यात आले असून मुख्य आरोपीची ओळख पटली आहे. तो भटक्या जमातीचा असून गुन्हेगारीत सक्रिय आहे.

अत्याचार झालेले कुटुंब नोएडाहून शहाजहानपूरला कारने निघाले होते. दरोडेखोरांच्या टोळीने त्यांच्यावर दबा धरून हल्ला केला. महिला व तिच्या १३ वर्षांच्या मुलीला बाहेर ओढले व जवळच्या शेतात नेले व तेथे त्यांच्यावर बलात्कार केला. कारमधील पुरुषांना दोरीने बांधून टाकण्यात आले होते. त्यांनी रोख रक्कम, दागिने व मोबाईल फोन्सही लुटले. कुटुंबातील एकाने पळून जाण्यात यश मिळवून घटना पोलिसांना कळविली. या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याबद्दल कोतवाली देहातचे ठाणे अमलदार रामसेन यांना या प्रकरणातून दूर करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर विरोधकांनी जोरदार हल्ला करून उत्तर प्रदेश म्हणजे गुंडांचे राज्य असल्याचे व प्रशासन कोलमडून पडल्याचे म्हटले. या घटनेची गंभीर दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने म्हटले आहे की पीडितांची व अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी उत्तर प्रदेशला आम्ही सदस्य पाठविला आहे. परंतु अशा प्रकरणांत राज्य प्रशासनाकडून फारसे सहकार्य मिळत नसल्याची तक्रार आयोगाने केली आहे.

भाजप, बसपा आणि काँग्रेसने समाजवादी पक्षाच्या सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी केली. केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी यादव सरकारवर टीका करताना हे कधी संपणार असा प्रश्न विचारला आहे. बसपचे नेते सुधींद्र भदोरिया यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे म्हटले.