शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

बुलंदशहर सामुहिक बलात्कार प्रकरणात १५ संशयित ताब्यात...

By admin | Updated: July 31, 2016 19:18 IST

महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणात १५ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून मुख्य आरोपीची ओळख पटली आहे.

ऑनलाइन लोकमतबुलंदशहर, दि. ३१ : महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणात १५ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून मुख्य आरोपीची ओळख पटली आहे. दिल्ली-कानपूर राष्ट्रीय महामार्गावरील बुलंदशहर वळण रस्त्यावर अत्याचाराची घटना शुक्रवारी रात्री घडली. दरोडेखोरांनी महिला व मुलीला त्यांच्या कारमधून ओढून नेले होते.

अखिलेश यादव यांनी बुलंदशहरच्या उप पोलीस अधीक्षकांना या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी २४ तासांची मुदत दिली आहे. त्याशिवाय त्या भागातील पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले. बुलंदशहरचे उप पोलीस अधीक्षक वैभव कृष्णा म्हणाले की गुन्हेगारांना पकडण्यासाठी विशेष कृती दलाच्या १५ तुकड्या कामाला लावण्यात आल्या असून बुलंदशहर, मेरठ व इतर जिल्ह्यांत तसेच राज्यातही छापे टाकण्यात येत आहेत. १५ संशयितांना पकडण्यात आले असून मुख्य आरोपीची ओळख पटली आहे. तो भटक्या जमातीचा असून गुन्हेगारीत सक्रिय आहे.

अत्याचार झालेले कुटुंब नोएडाहून शहाजहानपूरला कारने निघाले होते. दरोडेखोरांच्या टोळीने त्यांच्यावर दबा धरून हल्ला केला. महिला व तिच्या १३ वर्षांच्या मुलीला बाहेर ओढले व जवळच्या शेतात नेले व तेथे त्यांच्यावर बलात्कार केला. कारमधील पुरुषांना दोरीने बांधून टाकण्यात आले होते. त्यांनी रोख रक्कम, दागिने व मोबाईल फोन्सही लुटले. कुटुंबातील एकाने पळून जाण्यात यश मिळवून घटना पोलिसांना कळविली. या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याबद्दल कोतवाली देहातचे ठाणे अमलदार रामसेन यांना या प्रकरणातून दूर करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर विरोधकांनी जोरदार हल्ला करून उत्तर प्रदेश म्हणजे गुंडांचे राज्य असल्याचे व प्रशासन कोलमडून पडल्याचे म्हटले. या घटनेची गंभीर दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने म्हटले आहे की पीडितांची व अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी उत्तर प्रदेशला आम्ही सदस्य पाठविला आहे. परंतु अशा प्रकरणांत राज्य प्रशासनाकडून फारसे सहकार्य मिळत नसल्याची तक्रार आयोगाने केली आहे.

भाजप, बसपा आणि काँग्रेसने समाजवादी पक्षाच्या सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी केली. केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी यादव सरकारवर टीका करताना हे कधी संपणार असा प्रश्न विचारला आहे. बसपचे नेते सुधींद्र भदोरिया यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे म्हटले.