शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

१३... पारशिवनी... कापूस

By admin | Updated: February 13, 2015 23:10 IST

(फोटो)

(फोटो)
कापूस मोजणीसाठी शेतकरी ताटकळत
आवक वाढली : संकलन केंद्रावर कापूस उत्पादकांची थट्टा
पारशिवनी : शासनाच्या उदासीन धोरणांमुळे भाव वाढण्याच्या आशेवर असलेल्या कापूस उत्पादकांच्या पदरी शेवटी निराशाच पडली. भाव वाढण्याची शक्यता मावळल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कापूस विक्रीसाठी कापूस संकलन केंद्रांवर आणणे सुरू केले आहे. त्यातच आवक वाढल्याने कापूस मोजण्यासाठी शेतकऱ्यांना संकलन केंद्रावर ताटकळत राहावे लागत आहे. मात्र, समस्या सोडविण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही.
यावर्षी कापसाचे उत्पादन कमी असले तरी तुलनेत भाव वाढले नाही. त्यातच खासगी व्यापारी कापूस खरेदीसंदर्भात कमालीचे उदासीन असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजास्तव सीसीआयच्या (कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया) कापूस संकलन केंद्रावर कापूस विक्रीसाठी न्यावा लागत आहे. यासाठी शासनाने सीसीआयच्या माध्यमातून जिल्ह्यात नागपूर, हिंंगणा, काटोल-नरखेड, पारशिवनी, सावनेर, रामटेक, कळमेश्वर व उमरेड या ठिकाणी संकलन केंद्र सुरू करून कापूस खरेदीला सुरुवात केली.
यंदा प्रतिकूल वातावरणामुळे शेतातील कापूस घरी यायला विलंब झाला. त्यामुळे कापूस बाजारातही उशिरा पोहोचला. सीसीआयने सुरुवातीला प्रति क्विंंटल ४ हजार ५०० रुपये भावाप्रमाणे केवळ १० दिवस कापसाची खरेदी केली. त्यानंतर भाव कोसळल्याने मध्यंतरी काही केंद्र बंदही करण्यात आले होते. नंतर ते पूर्ववत सुरू करण्यात आले. हल्ली बाजारात कापसाची आवक वाढली आहे.
पारशिवनी येथील कापूस संकलन केंद्र दी नरेंद्र जिनिंंग-प्रेसिंंगच्या आवारात सुरू करण्यात आले. तिथे २८ हजार ८६५ क्विंंटल कापसाची खरेदी करण्यात आली. यात शेतकऱ्यांना वेगवेगळा भाव दिला जातो. कापसाचा दर हा कापूस पणन महासंघाचे ग्रेडर ठरवित असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कापसाची प्रत पाहून ४ हजार २०० रुपये, ३ हजार ९५०, ३ हजार ९१० आणि ३ हजार ८५१ रुपये प्रति क्विंंटलप्रमाणे कापूस खरेदी केला जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या ठिकाणी रोज १ हजार ते १ हजार २०० क्विंंटल कापसाची खरेदी केली जात असल्याचे संबंधितांनी सांगितले. (प्रतिनिधी)