शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

१३... पारशिवनी... कापूस

By admin | Updated: February 13, 2015 23:10 IST

(फोटो)

(फोटो)
कापूस मोजणीसाठी शेतकरी ताटकळत
आवक वाढली : संकलन केंद्रावर कापूस उत्पादकांची थट्टा
पारशिवनी : शासनाच्या उदासीन धोरणांमुळे भाव वाढण्याच्या आशेवर असलेल्या कापूस उत्पादकांच्या पदरी शेवटी निराशाच पडली. भाव वाढण्याची शक्यता मावळल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कापूस विक्रीसाठी कापूस संकलन केंद्रांवर आणणे सुरू केले आहे. त्यातच आवक वाढल्याने कापूस मोजण्यासाठी शेतकऱ्यांना संकलन केंद्रावर ताटकळत राहावे लागत आहे. मात्र, समस्या सोडविण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही.
यावर्षी कापसाचे उत्पादन कमी असले तरी तुलनेत भाव वाढले नाही. त्यातच खासगी व्यापारी कापूस खरेदीसंदर्भात कमालीचे उदासीन असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजास्तव सीसीआयच्या (कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया) कापूस संकलन केंद्रावर कापूस विक्रीसाठी न्यावा लागत आहे. यासाठी शासनाने सीसीआयच्या माध्यमातून जिल्ह्यात नागपूर, हिंंगणा, काटोल-नरखेड, पारशिवनी, सावनेर, रामटेक, कळमेश्वर व उमरेड या ठिकाणी संकलन केंद्र सुरू करून कापूस खरेदीला सुरुवात केली.
यंदा प्रतिकूल वातावरणामुळे शेतातील कापूस घरी यायला विलंब झाला. त्यामुळे कापूस बाजारातही उशिरा पोहोचला. सीसीआयने सुरुवातीला प्रति क्विंंटल ४ हजार ५०० रुपये भावाप्रमाणे केवळ १० दिवस कापसाची खरेदी केली. त्यानंतर भाव कोसळल्याने मध्यंतरी काही केंद्र बंदही करण्यात आले होते. नंतर ते पूर्ववत सुरू करण्यात आले. हल्ली बाजारात कापसाची आवक वाढली आहे.
पारशिवनी येथील कापूस संकलन केंद्र दी नरेंद्र जिनिंंग-प्रेसिंंगच्या आवारात सुरू करण्यात आले. तिथे २८ हजार ८६५ क्विंंटल कापसाची खरेदी करण्यात आली. यात शेतकऱ्यांना वेगवेगळा भाव दिला जातो. कापसाचा दर हा कापूस पणन महासंघाचे ग्रेडर ठरवित असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कापसाची प्रत पाहून ४ हजार २०० रुपये, ३ हजार ९५०, ३ हजार ९१० आणि ३ हजार ८५१ रुपये प्रति क्विंंटलप्रमाणे कापूस खरेदी केला जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या ठिकाणी रोज १ हजार ते १ हजार २०० क्विंंटल कापसाची खरेदी केली जात असल्याचे संबंधितांनी सांगितले. (प्रतिनिधी)