शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

१२वीच्या ‘टॉपर’ची होणार फेरपरीक्षा

By admin | Updated: June 3, 2016 02:47 IST

बिहार शालेय परीक्षा मंडळाने (बीएसईबी) गुणवत्ता यादीतील सर्व विद्यार्थी या मानास पात्र आहेत का याची पडताळणी करण्यासाठी त्यांची पुन्हा छोटी परीक्षा घेण्याचे ठरवले आहे.

पाटणा : बिहारमध्ये १२वी कला शाखेच्या परीक्षेत पहिल्या आलेल्या मुलीने कॅमेऱ्यासमोर राज्यशास्त्र हा विषय पाककलेशी संबंधित असल्याचे सांगितले, तर तिच्याच कॉलेजमधील आणि विज्ञान शाखेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्याला पाणी व एचटूओ यांचा संबंध काय, यांसारख्या प्राथमिक प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. या पार्श्वभूमीवर बिहार शालेय परीक्षा मंडळाने (बीएसईबी) गुणवत्ता यादीतील सर्व विद्यार्थी या मानास पात्र आहेत का याची पडताळणी करण्यासाठी त्यांची पुन्हा छोटी परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. बिहारमध्ये १२ वीच्या तिन्ही शाखांचा निकाल गेल्या आठवड्यात जाहीर झाल्यानंतर स्थानिक वाहिन्यांनी गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यात त्यांच्या गुणवत्तेचा भंडाफोड झाला. बीएसईबीने कला, वाणिज्य व विज्ञान शाखांतील सर्व १४ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना छोटेखानी फेरपरीक्षेसाठी ३ जून रोजी पाचारण केले आहे. कला शाखेतील विद्यार्थिनी रुबी रॉय हिने पॉलिटिकल सायन्स (राज्यशास्त्र) विषयाचा ‘प्रोडिगल सायन्स’ असा उच्चार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मंडळाने तातडीने गुणवत्ताधारकांच्या फेरपरीक्षेचा निर्णय घेतला. सोबतच या प्रकरणाच्या चौकशीचेही आदेश दिले. रुबीला राज्यशास्त्रात १००पैकी ९१ गुण मिळाले असून, एकूण ५०० गुणांच्या परीक्षेत तिने ४४४ गुण संपादित केले आहेत. मात्र, परीक्षा एकूण किती गुणांची होती असे विचारले तेव्हा तिने उत्तर दिले ६०० गुणांची. विशेष म्हणजे रुबी टी.व्ही. चॅनलशी बोलत असताना तिचा एक नातेवाईक तिला पाठीमागून प्रश्नांची उत्तरे सांगण्याचा प्रयत्न करीत होता. विज्ञान शाखेचा टॉपर सौरव श्रेष्ठा यालाही मूलभूत प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. त्याने अ‍ॅल्युमिनियम हा सक्रिय धातू असल्याचे सांगितले. एवढेच नाहीतर, सोडियम आणि इलेक्ट्रॉन्सचीही त्याला माहिती नव्हती. बीएसईबीचे चेअरमन लालकेश्वर प्रसाद सिंग म्हणाले की, गुणवत्ता यादीत आलेल्या सर्वांची एक छोटी लेखी परीक्षा घेण्यात येणार असून, त्यासोबत आपण प्रत्येकाची मुलाखत घेणार आहोत. यात विद्यार्थी अपयशी ठरला, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.बिहारमध्ये १५ लाख विद्यार्थ्यांनी १२वीची परीक्षा दिली होती. त्यातील १४ जण गुणवत्ता यादीत आले असून, गुणवत्ता यादीतील बहुतांश विद्यार्थी पाटणा शहरापासून २० कि.मी. अंतरावर असलेल्या हाजीपूर येथील व्ही.एन. रॉय कॉलेजचे आहेत.गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना साध्या प्रश्नांची उत्तरे न येणे हा प्रकार धक्कादायक आहे. या प्रकरणात एकाच्या नावावर दुसऱ्याने परीक्षा दिली असेल किंवा परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका बदलल्या असाव्यात, असा संशय असल्याचे राज्याचे शिक्षणमंत्री अशोक चौधरी यांनी सांगितले.