शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

१२ हजार केळी उत्पादक विम्यापासून वंचित सरकारविरोधात जाणार न्यायालयात : विविध कार्यकारी सोसायट्यांचीही तक्रार

By admin | Updated: October 25, 2015 00:12 IST

जळगाव- उन्हाळ्यात वादळांमुळे केळीला मार बसला. गारपीट झाली. त्यानंतर दुष्काळ सोसावा लागतोय. केळी उत्पादकांनी बिकट स्थितीत आपल्या केळीला संरक्षण म्हणून हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेतून विमा काढला. परंतु विमा देण्यास कंपनी टाळाटाळ करीत आहे. सरकारच्या कचखाऊ धोरणामुळे जिल्‘ातील सुमारे १२ हजार केळी उत्पादक विम्याच्या रकमेपासून वंचित राहीले आहेत.

जळगाव- उन्हाळ्यात वादळांमुळे केळीला मार बसला. गारपीट झाली. त्यानंतर दुष्काळ सोसावा लागतोय. केळी उत्पादकांनी बिकट स्थितीत आपल्या केळीला संरक्षण म्हणून हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेतून विमा काढला. परंतु विमा देण्यास कंपनी टाळाटाळ करीत आहे. सरकारच्या कचखाऊ धोरणामुळे जिल्‘ातील सुमारे १२ हजार केळी उत्पादक विम्याच्या रकमेपासून वंचित राहीले आहेत. कंपनीची टाळाटाळ आणि सरकारची चालढकल वृत्ती यामुळे कंटाळलेले केळी उत्पादक आणि काही विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या राज्य सरकार आणि टाटा कन्सलटन्सी या विमा कंपनीविरोधात न्यायालयात जाणार आहेत. जिल्‘ात २०१४-१५ या वर्षासाठी १२ हजार शेतकर्‍यांनी केळीसाठी विमा काढला. पाच कोटी ८१ हजार विमा रक्कम शेतकर्‍यांनी भरली. राष्ट्रीयकृत बँका व विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांनी या रकमा शेतकर्‍यांकडून कर्ज भरणा करताना व कर्ज काढताना परस्पर घेतल्या. आता वादळ, गारपीट, थंडी अशा कारणांमुळे बाधित झालेल्या केळी क्षेत्रासाठी संबंधित विमाधारक शेतकर्‍यांना विमा मिळत नसल्याचे समोर आले आहे. राज्य शासनाने आपली रक्कम भरलीच नाहीविम्याची रक्कम देताना केंद्र सरकारचा २५, राज्य सरकारचा २५ आणि संबंधित विमा कंपनीचा ५० टक्के वाटा असतो. यातील राज्य शासनाला विमा देण्यासंबंधी १६ कोटी रुपये भरायचे आहेत. परंतु ही रक्कम न भरल्याने नुकसान होऊन विमा घेण्यास पात्र आलेल्या केळी उत्पादकांना विम्याची रक्कम मिळू शकत नाही. ३१ जुलै रोजी पात्र शेतकर्‍यांची नावे जाहीर झाली नाहीसरकारने आपल्या वाट्याची रक्कम विमा देण्यासंबंधी न भरल्याने संबंधित विमा कंपनीने विमा घेण्यासाठी पात्र असलेल्या केळी उत्पादकांची नावे जाहीर केलेली नाहीत. ही नावे मागील काळात ३१ जुलैपूर्वीच जाहीर केली जायची. चोपडा, जळगावच्या सोसायट्या जाणार न्यायालयातबाधित शेतकर्‍यांना केळी विम्याची रक्कम मिळावी यासाठी चोपडा तालुक्यातील विटनेर, वढोदा, मोहिदे, अजंतीसीम, वाळकी, चहार्डी, मामलदे, खर्डी, धानोरा, यावलमधील किनगाव, साकळी, वनोली, म्हैसवाडी, रावेरातील तांदलवाडी, केर्‍हाळे, निंबोल, ऐनपूर, खिर्डी, जळगाव तालुक्यातील कठोरा, किनोद, फुपनगरी, वडनगरी, खेडी खुर्द, आव्हाणे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या व केळी उत्पादक न्यायालयात जाणार आहेत. विमा कंपनी व राज्य सरकार यांना या प्रकरणात प्रतिवादी केले जाईल, अशी माहिती विविध सोसायट्या व शेतकर्‍यांच्यावतीने डॉ.सत्वशील जाधव पाटील यांनी दिली.