शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

परदेशातून पैसा घेणा-या ११३९९ स्वयंसेवी संस्थांची नोंदणी रद्द

By admin | Updated: November 5, 2016 07:59 IST

विदेशी अर्थसाह्य घेणाऱ्या ११,३९९ स्वयंसेवी संस्थांची नोंदणी केंद्र सरकारने रद्द केली आहे.

नवी दिल्ली : विदेशी अर्थसाह्य घेणाऱ्या ११,३९९ स्वयंसेवी संस्थांची नोंदणी केंद्र सरकारने रद्द केली आहे. विदेशी अर्थसाह्य नियमन कायद्यानुसार (एफसीआरए) आवश्यक असलेले नूतनीकरण न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. ३0 जूनला ज्यांची नुतनीकरणाची मुदत संपली होती, अशा संस्थांची नोंदणी १ नोव्हेंबरपासून रद्द समजण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे. नोंदणी रद्द करण्यात आलेल्या स्वयंसेवी संस्थांत ५0 अनाथालये, शेकडो शाळा, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट यांसारख्या शेकडो मान्यवर संस्था तसेच रस्त्यावरील मुलांसाठी काम करणाऱ्या एनजीओंचा समावेश आहे. या आधी २0१५ मध्ये गृहमंत्रालयाने अशीच कारवाई करून सलग ३ वर्षे वार्षिक विवरणपत्र न भरणाऱ्या १0 हजार स्वयंसेवी संस्थांची नोंदणी रद्द केली होती.

अनेक नामांकित संस्था ठरतील बाद?नव्या कायद्यानुसार नुतनीकरणाची मुदत सरकारने ३१ आॅक्टोबरपर्यंत वाढविली होती. त्यासाठी ३0 जूनपूर्वी अर्ज सादर करणे बंधनकारक केले होते. १,७३६ संस्थांचे नुतनीकरण अर्ज सरकारने अपूर्ण कागदपत्रांच्या कारणास्तव फेटाळून लावले आहेत. अर्ज फेटाळण्यात आलेल्या स्वयंसेवी संस्थांत रामकृष्ण मिशन, माता अमृतानंदमयी मठ, कृष्णमूर्ती फाउंडेशन आॅफ इंडिया यांसारख्या काही मान्यवर धार्मिक संस्थांचा समावेश आहे. त्यांना ८ नोव्हेंबरपर्यंत आपली बाजू मांडण्यास सांगण्यात आले आहे. नंतर त्यांची कोणतीही बाजू ऐकून घेतली जाणार नाही.

असे झाले कायद्यात बदलअर्थसाह्य नियमन कायदा-२0१0 (एफसीआरए-२0१0) नुसार नोंदणीकृत या संस्थांची नोंदणी आहे. एफसीआरए-२0१0 हा कायदा संपुआ सरकारने बनविलेला आहे.आधीच्या १९७६ च्या कायद्याची जागा त्याने घेतली आहे. १९७६ च्या कायद्यान्वये विदेशी निधी मिळण्यासाठी एकदा केलेली नोंदणी कायमस्वरूपी राहत असे. २0१0 च्या कायद्यानुसार यासंबंधीच्या परवान्याचे दर पाच वर्षांनी नुतनीकरण करणे आवश्यक आहे.

संस्थांची संख्या निम्म्यावरआणीबाणीच्या काळात विदेशी निधी मर्यादित करण्यासाठी मूळ कायदा करण्यात आला. २0१0 मध्ये नवा कायदा आला. त्याचा आधार घेऊन मोदी सरकारने २२ हजार संस्थांची नोंदणी रद्द केली.

मोठी वाढ

गेल्या ३ वर्षांत विदेशी अर्थसहाय्यामध्ये  ८३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर असा निधी घेणाऱ्या संस्थांची संख्या २०१४-१५ मध्ये ३३ टक्क्यांनी वाढली आहे.