शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाणवेली काढण्याचे काम सुरु

By admin | Updated: July 16, 2017 00:45 IST

सायखेडा : गंगापूर व दारणा धरणातून सुरू असलेला गोदावरी नदीतील पाण्याचा विसर्ग आणि गोदाकाठ परिसरात सुरू असलेल्या संततधारेमुळे सायखेडा येथे पुलाला पाणी लागले होते

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : गंगापूर व दारणा धरणातून सुरू असलेला गोदावरी नदीतील पाण्याचा विसर्ग आणि गोदाकाठ परिसरात सुरू असलेल्या संततधारेमुळे सायखेडा येथे पुलाला पाणी लागले होते; मात्र पाणी पुलाखालून वाहून जाण्यास पुलाला अडकलेल्या पाणवेलींमुळे अडचण येत होती. पाणी वाहून न जाता पाण्याचा जोर वाढत होता आणि कमकुवत पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. पुलाला अडकलेल्या पाणवेली तातडीने काढाव्यात, अशी मागणी माजी आमदार दिलीप बनकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती, तसे निर्देश दिले होते. संबंधित यंत्रणेने तातडीने पाणवेली काढण्यास सुरुवात केली आहे.धरण क्षेत्रातून सोडलेल्या पाण्यामुळे नदीपात्रातील मोठमोठ्या पाणवेली सायखेडा येथील गोदावरी नदीवरील पुलास अडकण्यास सुरु वात झाली होती. माजी आमदार दिलीप बनकर यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेत पुलाला अडकलेल्या पाणवेली काढण्याच्या सूचना केल्या होत्या.  पुलाला अडकलेल्या पाणवेलींमुळे नदीपात्रात वरून येणारे पाणी अडवले जाऊन शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी जाण्याचा धोका वाढला आहे. सर्वात मोठा धोका पुलास निर्माण झाल्याने तसेच अगोदरच हा पूल कमकुवत असताना पावसाळा सुरू होऊन एक ते दीड महिना झाला असताना प्रशासनाने पाणवेली काढलेल्या नव्हत्या. यासंदर्भात जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर, गंगापूर विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे आदींना फोनवरून तत्काळ पूर परिस्थितीवर उपाययोजना व सायखेडा, करंजगाव पुलाला अडकलेल्या पाणवेली काढण्याच्या सूचना आमदार दिलीप बनकर यांनी फोनद्वारे केल्या होत्या. याबाबत प्रसार माध्यमांत बातम्या आल्यावर संबंधित विभागाने या ठिकाणी अडकलेल्या पाणवेली काढण्यास सुरुवात केली आहे.पूरप्रश्नी तहसील कार्यालयात बैठकगोदावरी नदीच्या पुरामुळे सर्वाधिक तडाखा बसत असलेल्या सायखेडा, चांदोरी यासह गोदाकाठ गावांच्या तातडीच्या करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात तहसीलदार डॉ. विनोद भामरे यांनी सायखेडा तलाठी कार्यालयात तातडीची बैठक घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, पावसाळा सुरू असून, पूररेषेच्या आत व पूररेषेवर असणाऱ्या रहिवाशांनी घरात पाणी येण्याची आणि पूर येण्याची वाट पाहू नये त्यांनी आताच आपला रहिवास सोडावा व भविष्यात होणाऱ्या आपत्तीवर मात करावी.यावेळी पूररेषेवर असणाऱ्या व संभाव्य गंगानगर, मेनरोड परिसर, सायखेडा चौफुली, ग्रामपंचायत परिसर चांदोरीतील पूररेषेवरील नागरिकांना रहिवास सोडण्याच्या नोटिसा देण्यात आल्या. तसेच इतर माहिती घेण्यात आली. या बैठकीत पूरनियंत्रण कक्ष तैनात ठेवून त्यात पट्टीचे पोहणारे तज्ज्ञ उपलब्ध करून द्यावेत, पशुवैद्यकीय अधिकारी असावा, पाणबोटी लाइव्ह जॅकेट उपलब्ध करून द्यावे, बाधित क्षेत्रातील नागरिकांची व्यवस्था कॉलेज व शाळेमध्ये करण्यात यावी. पूर आल्यास किंवा आपत्ती काळात सायरन तसेच भोंगे लावून जागृती करावी आदींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.