शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

पाणवेली काढण्याचे काम सुरु

By admin | Updated: July 16, 2017 00:45 IST

सायखेडा : गंगापूर व दारणा धरणातून सुरू असलेला गोदावरी नदीतील पाण्याचा विसर्ग आणि गोदाकाठ परिसरात सुरू असलेल्या संततधारेमुळे सायखेडा येथे पुलाला पाणी लागले होते

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : गंगापूर व दारणा धरणातून सुरू असलेला गोदावरी नदीतील पाण्याचा विसर्ग आणि गोदाकाठ परिसरात सुरू असलेल्या संततधारेमुळे सायखेडा येथे पुलाला पाणी लागले होते; मात्र पाणी पुलाखालून वाहून जाण्यास पुलाला अडकलेल्या पाणवेलींमुळे अडचण येत होती. पाणी वाहून न जाता पाण्याचा जोर वाढत होता आणि कमकुवत पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. पुलाला अडकलेल्या पाणवेली तातडीने काढाव्यात, अशी मागणी माजी आमदार दिलीप बनकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती, तसे निर्देश दिले होते. संबंधित यंत्रणेने तातडीने पाणवेली काढण्यास सुरुवात केली आहे.धरण क्षेत्रातून सोडलेल्या पाण्यामुळे नदीपात्रातील मोठमोठ्या पाणवेली सायखेडा येथील गोदावरी नदीवरील पुलास अडकण्यास सुरु वात झाली होती. माजी आमदार दिलीप बनकर यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेत पुलाला अडकलेल्या पाणवेली काढण्याच्या सूचना केल्या होत्या.  पुलाला अडकलेल्या पाणवेलींमुळे नदीपात्रात वरून येणारे पाणी अडवले जाऊन शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी जाण्याचा धोका वाढला आहे. सर्वात मोठा धोका पुलास निर्माण झाल्याने तसेच अगोदरच हा पूल कमकुवत असताना पावसाळा सुरू होऊन एक ते दीड महिना झाला असताना प्रशासनाने पाणवेली काढलेल्या नव्हत्या. यासंदर्भात जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर, गंगापूर विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे आदींना फोनवरून तत्काळ पूर परिस्थितीवर उपाययोजना व सायखेडा, करंजगाव पुलाला अडकलेल्या पाणवेली काढण्याच्या सूचना आमदार दिलीप बनकर यांनी फोनद्वारे केल्या होत्या. याबाबत प्रसार माध्यमांत बातम्या आल्यावर संबंधित विभागाने या ठिकाणी अडकलेल्या पाणवेली काढण्यास सुरुवात केली आहे.पूरप्रश्नी तहसील कार्यालयात बैठकगोदावरी नदीच्या पुरामुळे सर्वाधिक तडाखा बसत असलेल्या सायखेडा, चांदोरी यासह गोदाकाठ गावांच्या तातडीच्या करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात तहसीलदार डॉ. विनोद भामरे यांनी सायखेडा तलाठी कार्यालयात तातडीची बैठक घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, पावसाळा सुरू असून, पूररेषेच्या आत व पूररेषेवर असणाऱ्या रहिवाशांनी घरात पाणी येण्याची आणि पूर येण्याची वाट पाहू नये त्यांनी आताच आपला रहिवास सोडावा व भविष्यात होणाऱ्या आपत्तीवर मात करावी.यावेळी पूररेषेवर असणाऱ्या व संभाव्य गंगानगर, मेनरोड परिसर, सायखेडा चौफुली, ग्रामपंचायत परिसर चांदोरीतील पूररेषेवरील नागरिकांना रहिवास सोडण्याच्या नोटिसा देण्यात आल्या. तसेच इतर माहिती घेण्यात आली. या बैठकीत पूरनियंत्रण कक्ष तैनात ठेवून त्यात पट्टीचे पोहणारे तज्ज्ञ उपलब्ध करून द्यावेत, पशुवैद्यकीय अधिकारी असावा, पाणबोटी लाइव्ह जॅकेट उपलब्ध करून द्यावे, बाधित क्षेत्रातील नागरिकांची व्यवस्था कॉलेज व शाळेमध्ये करण्यात यावी. पूर आल्यास किंवा आपत्ती काळात सायरन तसेच भोंगे लावून जागृती करावी आदींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.