शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

मयतांनाच दाखविले साक्षीदार

By admin | Updated: February 10, 2016 23:24 IST

चमत्कार : मालेगाव तहसीलच्या जबाबपत्रात नोंद

प्रवीण साळुंके  मालेगावयेथील तहसील खाते भ्रष्टाचार व विविध कारणांनी मागील तीन ते चार वर्षात राज्यात चांगलेच बदनाम झाले आहे. या कार्यालयाचे अनेक चमत्कार असून, असाच प्रकार तालुक्यातील हाताने येथील स्वस्त धान्य दुकानाच्या जबाबात संबंधित अधिकाऱ्याने केला आहे. यात तहसीलच्या जबाबाच्या कागदपत्रात दोन व्यक्ती मयत असूनही त्यांचे प्रत्यक्षदर्शी जबाब असल्याचा आरोप करण्यात येत आहे.तालुक्यातील हाताने येथील स्वस्त धान्य दुकानाविषयी अनेक तक्रारी असल्याने परवाना रद्द करण्यात आला होता. यावर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिलेल्या फेरचौकशीच्या आदेशावर ४ डिसेंबर २०१५ला पंचनामा करण्यात आला. या पंचनाम्यात संशय घेण्यास अनेक जागा आहेत. मिळालेल्या पंचनाम्याच्या कागदपत्रात घेण्यात आलेल्या प्रत्यक्षदर्शींच्या जबाबातील व्यक्तींपैकी एक व्यक्ती ६ एप्रिल २००८ तर दुसरी व्यक्ती ८ मे २०१३ रोजी मयत झाल्याची ग्रामपंचायतीत नोंद आहे. तरीही त्यांनी प्रत्यक्ष जबाब दिलेल्यांमध्ये त्यांचे नाव आहे. या जबाब देणाऱ्यात एक व्यक्तीच्या नावापुढे ग्रामपंचायत सदस्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्यांमध्ये त्याचे नाव नाही. यातील एका जबाबावर स्वाक्षरी नाही, तसेच एकात प्रत्यक्षदर्शीचे नाव व स्वाक्षरी यांच्यात मोठी तफावत आहे. एका जबाबात मनुष्याच्या नावापुढे महिलेची सही असून, दोन जबाबावर एकाच व्यक्तीच्या स्वाक्षऱ्या आहेत तर एका जबाबात नाव व शिधापत्रिका क्रमांक यात तफावत आहे. हा पंचनामा घाईघाईत करण्यात आल्याचे कागदपत्रावरून दिसून येते. या अधिकाऱ्याने दिलेल्या अहवालात एक हजार रुपये दंडाची शिफारस केली आहे. या अहवालात किरकोळ तक्रारींचा उल्लेख करण्यात आला आहे.सदर दुकानदारांविषयी अनेक तक्रारी असल्याने ग्रामपंचायतीने याविषयी चर्चा करण्यासाठी ग्रामसभेत ठेवला. त्यावर १९ आॅगस्ट २०१५ च्या ग्रामसभेत चार क्रमांकाच्या विषयात धान्य वाटपाच्या तक्रारीवर चर्चा करण्यात येऊन परवाना रद्द करण्याचा ठराव करण्यात आला. सदर ठरावावर तहसीलदारांनी यावर ४ सप्टेंबर २०१५ रोजी पुरवठा निरीक्षकांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यांनी १५ सप्टेंबर २०१५ रोजी पंचनामा करून दिलेल्या अहवालात परवाना रद्द करण्याची शिफारस केली होती. त्यावर २ नोव्हेंबर २०१५ रोजी तहसीलदारांनी सदर दुकानाचा परवाना रद्द करण्यात येऊन गावाचे धान्य वाटप खडकीच्या दुकानदाराला तात्पुरत्या स्वरूपात दिले होते.