शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

तुम्ही वापरत असलेले वाहन भंगारात निघणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:19 IST

नाशिक : केंद्र सरकारने वाहन स्क्रॅप पॉलिसी जाहीर केली आहे. त्यानुसार १५ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटलेली जुनी खासगी वाहने ...

नाशिक : केंद्र सरकारने वाहन स्क्रॅप पॉलिसी जाहीर केली आहे. त्यानुसार १५ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटलेली जुनी खासगी वाहने आणि १० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटलेली जुनी व्यावसायिक वाहने भंगारात निघणार आहेत. नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून या धोरणाच्या अंमलबजावणीची तयारी सुरू केली असून, ज्या वाहनांच्या मालकांनाच पत्ता मिळून येत नाही अशी वाहने प्रथम भंगारात काढण्यात येणार आहे. १५ वर्षांपासून अधिक काळ रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांमधून अधिक प्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडण्याची भीती आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने अशी वाहने ताब्यात घेऊन भंगारात काढण्याचे निर्देशन दिले आहेत. त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत दिसून येत आहे.

जिल्ह्यातील जुन्या वाहनांची स्थिती-

१५ वर्षांपेक्षा जास्त जुनी खासगी वाहने - १,३५,०००

१० वर्षांपेक्षा जास्त जुनी व्यावसायिक वाहने - ८५,३१५

गाडी चांगली असल्यास मिळणार फिटनेस सर्टिफिकेट

रस्त्यावर धावणारे वाहन हे सुस्थितीत सुरुवातीपासून असल्यास प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट दिले जाणार आहे. ते पाच वर्षांसाठी असणार आहे. यासह कमाल तीन वेळा मिळेल अशी तरतूद आहे.

भंगारात दिल्यास मिळणार १५ टक्के लाभ

जिल्ह्यात भंगारात निघणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. भंगारात निघणाऱ्या वाहनांना १५ टक्के लाभ देणारी घोषणाही शासनाने केली आहे. त्यामुळे अशी वाहने भंगारात काढताना प्रादेशिक परिवहन विभागाला अशा वाहनांसाठी १५ टक्के लाभ देणारी यंत्रणा व ती स्क्रॅप करण्याची यंत्रणा याविषयी पूर्व तयारीही करावी लागणार आहे.

भंगारातील हजारो वाहने धावतात रस्त्यावर

नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास ६० ते ६५ लाख असून, जिल्ह्यात वाहनांची संख्याही लाखोंच्या घरात आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाहने भंगारात निघणार आहेत. जिल्ह्यात १५ वर्षांपेक्षा अधिक काळ झालेली हजारो वाहने रस्त्यावर धावत आहेत. त्यातील बहूतांश वाहनांची नोंदणीही झालेली नाही. त्यामुळे अशी वाहने जप्त करून भंगारात काढण्याचे मोठे आव्हान प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयासमोर आहे.

जिल्ह्यात अंमलबजावणी कधीपासून

नाशिक जिल्ह्यातील १५ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटलेली जुनी खासगी वाहने आणि १० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटलेली जुनी व्यावसायिक वाहने भंगारात काढण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. परंतु, जिल्ह्यातील अशा वाहनांची संख्या बघता परिवहन विभागाला त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करून वाहनधारकांचे नुकसान होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागणार आहे.