शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

...पण संमेलनास ज्येष्ठ साहित्यिक येणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:14 IST

नाशिकचे साहित्य संमेलन तीन आठवड्यांवर येऊनही कोरोनाचे वाढते प्रमाण गत महिन्यापासून कायम आहे. स्वत: स्वागताध्यक्षांना कोरोना झाला. अशा परिस्थितीत ...

नाशिकचे साहित्य संमेलन तीन आठवड्यांवर येऊनही कोरोनाचे वाढते प्रमाण गत महिन्यापासून कायम आहे. स्वत: स्वागताध्यक्षांना कोरोना झाला. अशा परिस्थितीत ज्याला मराठी साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ मानले जाते, असा ‘जनस्थान’ पुरस्कारदेखील स्थगित करण्यात आला. ज्या जनस्थान पुरस्कार सोहळ्यासाठी केवळ ७०० ते ८०० नागरिकांची उपस्थिती असते, तो १० मार्चचा पुरस्कार सोहळा रद्द केल्याचे बघूनदेखील अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांना उपरती झालेली नाही. केवळ यंदाच्या आर्थिक वर्षात मिळालेला संमेलनाचा निधी हातातून जाऊ नये, हेच त्यामागील कारण असण्याची शक्यता असल्याच्या चर्चेने जोर पकडला आहे. अन्यथा संमेलनाला येणाऱ्या साहित्यिकांमधील बहुतांश जण हे ज्येष्ठ नागरिक आहेत. संमेलनाला दिवसभर हजेरी लावणाऱ्यांतही ज्येष्ठांचे प्रमाण अधिक असल्याचे माहीत असूनही महामंडळाचे अध्यक्ष संमेलन आयोजनाबाबत फेरविचार करायचादेखील विचार करीत नाहीत, हे निर्ढावलेपणाचेच लक्षण मानले जात आहे. जानेवारी, फेब्रुवारीत झालेल्या पाचशे-हजार उपस्थितीच्या विवाह सोहळ्यांमुळे कोरोना पुन्हा फैलावल्याचा आरोग्य विभागाचा दावा आहे. अशा परिस्थितीत जिथे दहा हजारांवर नागरिक येण्याची शक्यता आहे, अशा संमेलनामुळे कोरोना फैलावणार नाही का? हा विचारदेखील महामंडळ का?

?

करीत नाही, हाच प्रश्न आहे.

इन्फो

तर ठपका कुणावर?

अजूनही संमेलन पुढे- मागे सरकवता येऊ शकते; मात्र संमेलनामुळे कुणा ज्येष्ठ साहित्यिकाला कोरोनाची लागण झाली किंवा तीन दिवसांच्या गर्दीमुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला तर त्याची जबाबदारी महामंडळ घेणार आहे का? असा सवालदेखील साहित्य वर्तुळात चर्चिला जाऊ लागला आहे. संमेलनामुळे कुणा मान्यवराचे किंवा सामान्य रसिकांचे बरे-वाईट घडल्यास त्याचा ठपका महामंडळ, शासन की आयोजक संस्था स्वीकारणार ? तसेच जिथे प्रचंड सुरक्षेत वावरणारे, चेकींगसह सर्व सुविधा चोवीस तास उपलब्ध असणारे संमेलन आयोजनाच्या कामातील थोड्याशा गर्दीमुळे स्वागताध्यक्षच जर बाधित होतात, तिथे इतर ज्येष्ठांची काय अवस्था होईल, त्याचा विचार करूनच संमेलन आयोजनाचा विचार व्हावा, अशीच चर्चा साहित्य वर्तुळात आहे.

लोगो

साहित्य संमेलनाचा लोगो वापरावा.