शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयला प्रवेश मिळेल का रे भाऊ; साडेसहा हजार जागांसाठी ४७ हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:13 IST

आयटीआयला प्रवेश घेतला म्हणजे नोकरीची संधी पक्की अशी एकेकाळी समजूत होती. ती आजही काही प्रमाणात कायम आहे, आयटीआयसोबतच ॲप्रेंटीसशीपच्या ...

आयटीआयला प्रवेश घेतला म्हणजे नोकरीची संधी पक्की अशी एकेकाळी समजूत होती. ती आजही काही प्रमाणात कायम आहे, आयटीआयसोबतच ॲप्रेंटीसशीपच्या निमित्ताने कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव मिळतो. या अनुभवासोबतच संबंधित कंपनी अनुभवी कर्मचारी म्हणून नियुक्ती देते अथवा दुसऱ्या कंपनीत नोकरीची संधी मिळते अशीच काहीशी परिस्थिती आजही दिसून येते. त्यामुळे आयटीआय प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात कल दिसून येत आहे. कोरोना संकटामुळे गेल्या वर्षी काही प्रमाणात आयटीआय प्रवेश घल्याचाचे दिसून आले मात्र गेल्यावर्षी प्रवेशाचे समीकरण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के व बाहेरील विद्यार्थ्यांसाठी ३० टक्के होते. त्यात यावर्षी बदल करण्यात आला असून यावर्षी जिल्ह्यातील ९० टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहे. त्यामुळे यावर्षी प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

अर्ज स्थिती

एकूण जागा -६६२४

आतापर्यंत आलेले अर्ज -४७,२५७

---

उपलब्ध जागा-

शासकीय जागा -४,९३२

खासगी जागा -१,६९२

---

संस्था

शासकीय संस्था - १५

खासगी संस्था -१६

---

सर्वांनाच हवा ‘फिटर’ ट्रेड

१) आयटीआय प्रवेशासाठी सर्वच विद्यार्थ्यांकडून फिटर ट्रेडला सर्वाधिक पसंती दिली जाते.

२) टर्नर ट्रेडची मागणी करणारे विद्यार्थीही मोठ्या प्रमामात आहेत.

३) बदलत्या काळानुसार, इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स ट्रेडकडेही विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.

४ विविध पर्याय उपलब्ध असले तरी पहिली पसंती ही फिटर ट्रेडलाच असल्याचे मागील प्रवेश प्रक्रियांमधून दिसते.

विद्यार्थी म्हणातात...

आयटीआय केलेल्या विद्यार्थ्यांना ॲप्रेंटीसशीपच्या माध्यमातून तत्काळ नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने आटीआयला प्रवेश घेण्याचे ठरविले आहे. शिवाय हाताशी कौशल्य असले तरी कोणताही व्यावसाय करणेही शक्य होते.

- विशाल जाधव, विद्यार्थी

---

शासकीय आआटीआयच्या माध्यमातून किमान खर्चात कौशल्य शिक्षण मिळते, शिवाय नोकरीच्या संधीही प्राप्त होतात. तुलनेत अन्य संस्थांमध्ये कौशल्य शिक्षण घेण्यासाठी अधिक खर्च व कालावधी लागत असल्याने आयटीआयचा पर्याय निवडला.

- हर्षल यादव, विद्यार्थी

गतवर्षी १५ टक्के जागा रिक्त

- गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे सर्वच विद्या शाखांमधील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली होती. त्याचा परिणाम आयटीआय प्रवेशांवरही झाल्याने सुमारे १५ टक्के जागा रिक्त दिसून आल्या होत्या.

- गतवर्षी आयटीआय प्रवेशासाठी जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थ्यांना तर जिल्ह्याबाहेरील ३० टक्के विद्यार्थ्यांना प्रवेशाचा नियम होता. परंतु, बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये घट झाल्याने जागा रिक्त राहिल्याचे दिसून आले.

- विविध अभियांत्रिकी विद्या शाखेच्या वाढलेल्या जागा आणि वेवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे पर्याय उपलब्ध झाल्याने आयटीआय प्रवेशाच्या रिक्त जागांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले.