शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

अशी वेळच का यावी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 01:46 IST

आपल्या अधिकाराबद्दल जागरूक असणारी व्यक्ती कर्तव्याबद्दलही सजग असतेच असे नाही. त्यातही सरकारी कामाबद्दल म्हणायचे तर, नोकरशाहीच्या दिरंगाईचा किंवा कामातील कुचराईचा अनुभव न घेतलेली व्यक्ती शोधून सापडू नये ही वस्तुस्थिती आहे.

साराशआपल्या अधिकाराबद्दल जागरूक असणारी व्यक्ती कर्तव्याबद्दलही सजग असतेच असे नाही. त्यातही सरकारी कामाबद्दल म्हणायचे तर, नोकरशाहीच्या दिरंगाईचा किंवा कामातील कुचराईचा अनुभव न घेतलेली व्यक्ती शोधून सापडू नये ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ही दप्तर दिरंगाई सोडून कामकाज न सुधारल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्याची वेळ विभागीय आयुक्तांवर आली. यातून आयुक्तांची संवेदनशीलता दिसून येतानाच यंत्रणांमधील संवेदनशून्यताही अधिकृतरीत्या अधोरेखित व्हावी.सरकारी यंत्रणांमधील बेफिकिरीची अथवा बेजबाबदारीची मानसिकता हा अनादी अनंतकाळापासून चालत आलेला विषय आहे. त्याबद्दल वेळोवेळी टीका होते, त्यामुळे प्रासंगिक स्वरूपात नोकरशाहीला धारेवर धरले जाते. पण कालांतराने परिस्थिती ‘जैसे थे’च झाल्याचा अनुभव येतो. बरे, एवढे सारे होत असताना व नागरिकांची याबाबतची ओरड कायम असताना कोणत्याही सरकारी आस्थापनातील वरिष्ठ अधिकारी मात्र आपल्या हाताखालील यंत्रणेच्या कुचराईपणाबद्दल आपल्या सहकाºयांची शक्यतो पाठराखण करण्याचीच भूमिका घेताना दिसून येतो. पण, विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी अधिकाºयांची बैठक घेऊन त्यात याबद्दलचे खडे बोल सुनावल्याने या व्यवस्थेत नाडले गेलेल्यांना काहीसा समाधानाचा सुस्कारा सोडता यावा. अर्थात, या त्यांच्या तंबीने फार फरक पडेल अशाही भ्रमात राहण्याचे कारण नाही, मात्र झगडे यांनी यासंदर्भातील अव्यवस्थेशी व दप्तर दिरंगाईशी ‘झगडा’ पुकारण्याचे धाडस दाखविले ते महत्त्वाचे ठरावे. हल्ली अशी संवेदनशीलता लयास गेलेली असल्याने अपवाद वगळता कोणी अधिकारी असे धाडसही दाखवेनासे झाले आहे. त्यातून जिल्हाधिकाºयांचा तहसीलदारांवर, तहसीलदारांचा तलाठी व मंडल अधिकाºयांवर धाक वा नियंत्रणच राहिले नसल्याचे निरीक्षण खुद्द झगडे यांनी प्रांजळपणे नोंदविले आहे. कसे राहील ते, कारण महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय असो की अन्य कोणतेही कार्यालय; तेथील वरिष्ठाधिकारी बदलून आले की, सर्वप्रथम लेटलतिफांना हुडकण्याचे काम केले जाते. उशिरा उगवणाºयांना किंवा जागेवर न सापडणाºयांना कारणे दाखवा नोटिसींचा दणका दिला जातो; परंतु अधिकतर लोक कार्यालयीन कामासाठी साइटवर गेल्याचे दाखवून सुटका करून घेताना दिसून येतात. त्यामुळे धाक निर्माण होण्याचा किंवा नियंत्रणाचा प्रश्नच निकाली निघतो. दप्तर दिरंगाई वाढीस लागण्यामागे अशी अनेक कारणे देता येणारी आहेत. जन्म-मृत्यूसह कोणतेही दाखले असो की, ७/१२ उतारे; ते ठरावीक वेळेत देण्याचे निश्चित करण्यात आले आहे; पण तसे होत नाही म्हणूनच सेवा कायदा लागू करण्यात आला आहे. तरी दिरंगाईच्या अनुभवास सामोरे जावे लागते. विविध सरकारी कार्यालयात काम करणाºया अधिकारी कर्मचाºयांच्या अनेकविध कर्मचारी संघटना आहेत त्या आपापल्या सदस्यांच्या अधिकारांबद्दल नेहमी आग्रही असतात, पण सदस्यांना कर्तव्याबद्दलची जाणीव करून देताना फारशा दिसत नाहीत. म्हणूनच विभागीय आयुक्तांनी खास बैठक घेऊन अधिकाºयांना त्यांचे काम चोख बजावण्याचे जे सुनावले ते महत्त्वाचे ठरावे.