शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

हंडाभर पाण्यासाठी दिवसभर पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2016 21:40 IST

वटारला टंचाई : चार दिवसाआड पाणी; टॅँकरची व्यवस्था करण्याची नागरिकांची मागणी

वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील वटार, चौंधाणे, कंधाणे, डोंगरेज आदि गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. वटार येथे ग्रामपंचायत प्रशासनाने पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे काम करूनही गावाला चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असल्याने टॅँकरची व्यवस्था प्रशासनाने करावी, अशी मागणी सरपंच प्रशांत बागुल यांनी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून सतत दुष्काळाला सामोरा जाणारा परिसरातील शेतकरीवर्ग यावर्षी तर दुष्काळाच्या छायेत आहे. विहिरींची पाण्याची पातळी खालावलेली असून, लावलेला कांदा पाण्याअभावी सोडण्याच्या बेतात बळीराजा आहे. या असमानी व सुलतानी संकटांनी पिचलेला बळीराजासमोर नवीन संकट निर्माण झाले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी नवीन विहिरी खोदण्याचा निर्णय घेतला असून, व्याजाने उसने पैसे घेऊन विहिरींचे काम केले; पण गाठीचा पैसाही गेला व उलट कर्जाचा बोजा अंगावर पडला. ग्रामपंचायतीने दखल घेत गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरीचे खोदकाम करूनही विहिरीला पाणी कमकुवत स्वरूपाचे लागले असून, ४० ते ४५ मिनिट विहीर चालते. त्यामुळे पाण्याची टाकी तीन ते चार दिवस भरत नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने निर्णय घेतला असून, चार दिवसाआड गावाला पाणीपुरवठा होत आहे. जर पाण्याची अशीच परिस्थिती राहिली तर मे व जूनमध्ये १० ते १५ दिवसात गावाला पाणीपुरवठा होईल, असे मत सरपंचानी व्यक्त केले आहे. यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना व्हायला हवी.शेतकऱ्यांच्या विहिरींचे तळ गाठल्याने सर्वात जास्त फटका कांदा पिकाला बसला असून, ऐन जांगडवर असलेला कांदा शेतकऱ्यांना सोडावा लागत आहे. न पेलवणारा खर्च करून लागवड केलेला कांदा शेवटी शेतकऱ्यांना डोळ्यात आसू आणत आहेत. जनावाऱ्यांच्या चाऱ्याचा तर फार मोठा प्रश्न उभा राहिला असून, चाऱ्याच्या प्रशासनाने छावण्या लावण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत. (वार्ताहर)