शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

हंडाभर पाण्यासाठी दिवसभर पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2016 21:40 IST

वटारला टंचाई : चार दिवसाआड पाणी; टॅँकरची व्यवस्था करण्याची नागरिकांची मागणी

वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील वटार, चौंधाणे, कंधाणे, डोंगरेज आदि गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. वटार येथे ग्रामपंचायत प्रशासनाने पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे काम करूनही गावाला चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असल्याने टॅँकरची व्यवस्था प्रशासनाने करावी, अशी मागणी सरपंच प्रशांत बागुल यांनी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून सतत दुष्काळाला सामोरा जाणारा परिसरातील शेतकरीवर्ग यावर्षी तर दुष्काळाच्या छायेत आहे. विहिरींची पाण्याची पातळी खालावलेली असून, लावलेला कांदा पाण्याअभावी सोडण्याच्या बेतात बळीराजा आहे. या असमानी व सुलतानी संकटांनी पिचलेला बळीराजासमोर नवीन संकट निर्माण झाले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी नवीन विहिरी खोदण्याचा निर्णय घेतला असून, व्याजाने उसने पैसे घेऊन विहिरींचे काम केले; पण गाठीचा पैसाही गेला व उलट कर्जाचा बोजा अंगावर पडला. ग्रामपंचायतीने दखल घेत गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरीचे खोदकाम करूनही विहिरीला पाणी कमकुवत स्वरूपाचे लागले असून, ४० ते ४५ मिनिट विहीर चालते. त्यामुळे पाण्याची टाकी तीन ते चार दिवस भरत नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने निर्णय घेतला असून, चार दिवसाआड गावाला पाणीपुरवठा होत आहे. जर पाण्याची अशीच परिस्थिती राहिली तर मे व जूनमध्ये १० ते १५ दिवसात गावाला पाणीपुरवठा होईल, असे मत सरपंचानी व्यक्त केले आहे. यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना व्हायला हवी.शेतकऱ्यांच्या विहिरींचे तळ गाठल्याने सर्वात जास्त फटका कांदा पिकाला बसला असून, ऐन जांगडवर असलेला कांदा शेतकऱ्यांना सोडावा लागत आहे. न पेलवणारा खर्च करून लागवड केलेला कांदा शेवटी शेतकऱ्यांना डोळ्यात आसू आणत आहेत. जनावाऱ्यांच्या चाऱ्याचा तर फार मोठा प्रश्न उभा राहिला असून, चाऱ्याच्या प्रशासनाने छावण्या लावण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत. (वार्ताहर)