शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

हंडाभर पाण्यासाठी दिवसभर पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2016 21:40 IST

वटारला टंचाई : चार दिवसाआड पाणी; टॅँकरची व्यवस्था करण्याची नागरिकांची मागणी

वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील वटार, चौंधाणे, कंधाणे, डोंगरेज आदि गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. वटार येथे ग्रामपंचायत प्रशासनाने पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे काम करूनही गावाला चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असल्याने टॅँकरची व्यवस्था प्रशासनाने करावी, अशी मागणी सरपंच प्रशांत बागुल यांनी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून सतत दुष्काळाला सामोरा जाणारा परिसरातील शेतकरीवर्ग यावर्षी तर दुष्काळाच्या छायेत आहे. विहिरींची पाण्याची पातळी खालावलेली असून, लावलेला कांदा पाण्याअभावी सोडण्याच्या बेतात बळीराजा आहे. या असमानी व सुलतानी संकटांनी पिचलेला बळीराजासमोर नवीन संकट निर्माण झाले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी नवीन विहिरी खोदण्याचा निर्णय घेतला असून, व्याजाने उसने पैसे घेऊन विहिरींचे काम केले; पण गाठीचा पैसाही गेला व उलट कर्जाचा बोजा अंगावर पडला. ग्रामपंचायतीने दखल घेत गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरीचे खोदकाम करूनही विहिरीला पाणी कमकुवत स्वरूपाचे लागले असून, ४० ते ४५ मिनिट विहीर चालते. त्यामुळे पाण्याची टाकी तीन ते चार दिवस भरत नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने निर्णय घेतला असून, चार दिवसाआड गावाला पाणीपुरवठा होत आहे. जर पाण्याची अशीच परिस्थिती राहिली तर मे व जूनमध्ये १० ते १५ दिवसात गावाला पाणीपुरवठा होईल, असे मत सरपंचानी व्यक्त केले आहे. यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना व्हायला हवी.शेतकऱ्यांच्या विहिरींचे तळ गाठल्याने सर्वात जास्त फटका कांदा पिकाला बसला असून, ऐन जांगडवर असलेला कांदा शेतकऱ्यांना सोडावा लागत आहे. न पेलवणारा खर्च करून लागवड केलेला कांदा शेवटी शेतकऱ्यांना डोळ्यात आसू आणत आहेत. जनावाऱ्यांच्या चाऱ्याचा तर फार मोठा प्रश्न उभा राहिला असून, चाऱ्याच्या प्रशासनाने छावण्या लावण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत. (वार्ताहर)