शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

...तर महापूर आल्यास जबाबदार कोण?

By admin | Updated: June 26, 2014 00:49 IST

...तर महापूर आल्यास जबाबदार कोण?

 

नाशिक : महापालिकेने गोदापात्रात टाकलेली माती, बांधलेले पूल आणि होळकर पुलाजवळील बंधारे यामुळे २००८ मध्ये नदीस महापूर आला, असे सांगणाऱ्या पाटबंधारे खात्याने महापालिकेला प्रवाहाचे अवरोध हडविण्याचा सल्ला दिला. परंतु आता त्याच पाटबंधारे खात्याने गोदापात्रात घाट बांधण्याचा घाट घातला असून, त्याला सर्वच स्तरातून विरोध होत आहे. माजी महापौर दशरथ पाटील यांनी यापुढे महापूर आलाच तर जिल्हाधिकारीच जबाबदार राहतील, असा लघुसंदेश जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला आहे.कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे खात्याच्या वतीने नदीत घाट बांधण्याचे काम सुरू आहे. परंतु नदीपात्रात थेट बांधकाम सुरू होत असल्याने नदीपात्राचा संकोच होण्याची आणि परिणामी पावसाळ्यात महापूर येण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. यापूर्वी शहरात २००८ मध्ये गोदावरी नदीला महापूर आला होता. त्यानंतर त्याचे विश्लेषण करणाऱ्या पाटबंधारे खात्याने नदीपात्रात झालेल्या बांधकामांचा उल्लेख करीत त्यामुळेच हे पात्र संकोचले गेल्याचा निष्कर्ष काढला होता. पालिकेने होळकर पूल येथे बांधलेला बंधारा हटविण्याच्या सूचनाही करण्यात आल्या होत्या; परंतु आता पाटबंधारे खातेच नदीपात्रात घाटाचे बांधकाम करीत असल्याने महापूर आल्यास त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. माजी महापौर दशरथ पाटील यांनी जिल्हाधिकारी विलास पाटील यांना भ्रमणध्वनीवर लघुसंदेश पाठविला आणि घाटामुळे शहरात महापूर आल्यास जिल्हाधिकारीच जबाबदार राहतील, असे म्हटले आहे. कुंभमेळ्याचा पैसा अक्षरश: पाण्यात घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, पर्यावरणप्रेमी शेखर गायकवाड यांनी महापौरांची भेट घेतली आणि टाळकुटे पूल ते गोदा-कपिला संगमापर्यंत घाट बांधल्याने होणारे दुष्परिणाम सांगितले. सदरचे बांधकाम महापालिका करीत नसल्याचे स्पष्टीकरण महापौर वाघ यांनी दिले.