शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

...तर महापूर आल्यास जबाबदार कोण?

By admin | Updated: June 26, 2014 00:49 IST

...तर महापूर आल्यास जबाबदार कोण?

 

नाशिक : महापालिकेने गोदापात्रात टाकलेली माती, बांधलेले पूल आणि होळकर पुलाजवळील बंधारे यामुळे २००८ मध्ये नदीस महापूर आला, असे सांगणाऱ्या पाटबंधारे खात्याने महापालिकेला प्रवाहाचे अवरोध हडविण्याचा सल्ला दिला. परंतु आता त्याच पाटबंधारे खात्याने गोदापात्रात घाट बांधण्याचा घाट घातला असून, त्याला सर्वच स्तरातून विरोध होत आहे. माजी महापौर दशरथ पाटील यांनी यापुढे महापूर आलाच तर जिल्हाधिकारीच जबाबदार राहतील, असा लघुसंदेश जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला आहे.कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे खात्याच्या वतीने नदीत घाट बांधण्याचे काम सुरू आहे. परंतु नदीपात्रात थेट बांधकाम सुरू होत असल्याने नदीपात्राचा संकोच होण्याची आणि परिणामी पावसाळ्यात महापूर येण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. यापूर्वी शहरात २००८ मध्ये गोदावरी नदीला महापूर आला होता. त्यानंतर त्याचे विश्लेषण करणाऱ्या पाटबंधारे खात्याने नदीपात्रात झालेल्या बांधकामांचा उल्लेख करीत त्यामुळेच हे पात्र संकोचले गेल्याचा निष्कर्ष काढला होता. पालिकेने होळकर पूल येथे बांधलेला बंधारा हटविण्याच्या सूचनाही करण्यात आल्या होत्या; परंतु आता पाटबंधारे खातेच नदीपात्रात घाटाचे बांधकाम करीत असल्याने महापूर आल्यास त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. माजी महापौर दशरथ पाटील यांनी जिल्हाधिकारी विलास पाटील यांना भ्रमणध्वनीवर लघुसंदेश पाठविला आणि घाटामुळे शहरात महापूर आल्यास जिल्हाधिकारीच जबाबदार राहतील, असे म्हटले आहे. कुंभमेळ्याचा पैसा अक्षरश: पाण्यात घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, पर्यावरणप्रेमी शेखर गायकवाड यांनी महापौरांची भेट घेतली आणि टाळकुटे पूल ते गोदा-कपिला संगमापर्यंत घाट बांधल्याने होणारे दुष्परिणाम सांगितले. सदरचे बांधकाम महापालिका करीत नसल्याचे स्पष्टीकरण महापौर वाघ यांनी दिले.