शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत कोण?

By admin | Updated: May 15, 2014 22:24 IST

नाशिक : अवघ्या एक दिवसावर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आली यंदा प्रचंड अटीतटीची लढत झाल्याने दिल्ली कोण गाठणार.

नाशिक : अवघ्या एक दिवसावर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आली असताना, अद्याप नाशिककरांचा कौल कोणाला हे स्पष्ट झालेले नाही. यंदा प्रचंड अटीतटीची लढत झाल्याने दिल्ली कोण गाठणार, याचे उत्तर देणे पंडितांनाही कठीण झाले आहे. तथापि, प्रत्येक जण आपापल्या सोयीने अर्थ काढीत असून, त्यावर पैजाही लागत आहेत. राष्टÑवादीचे वजनदार नेते छगन भुजबळ नाशिक लोकसभा निवडणूक लढवित असल्याने राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागून आहे. त्यातच हेमंत गोडसे यांची उमेदवारी भुजबळ यांना चांगलीच आव्हानात्मक ठरून गेली. मनसेचे प्रदीप पवार, माकपाचे तानाजी जायभावे, बसपाचे दिनकर पाटील आणि आम आदमी पार्टीचे विजय पांढरे यांच्या उमेदवारीमुळे सुरुवातीला ही निवडणूक बहुरंगी होईल असे वाटत होते; परंतु प्रत्यक्षात मात्र चर्चा भुजबळ आणि गोडसे यांच्या उमेदवारीचीच होत राहिली. त्यातच मतदानाचा वाढता टक्का हाही उत्सुकता वाढविणारा ठरला. मतदानाचा टक्का वाढताना इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच ६८ टक्के मतदान झाले. हे मतदान भुजबळ यांच्या पथ्यावर पडेल असे मानले जात असताना, इगतपुरी खालोखाल सिन्नरमध्ये आणि देवळाली विधानसभा मतदारसंघातदेखील प्रत्येकी ६३ टक्के मतदान झाले असून, हे गोडसे यांना फायदेशीर असेल असे आडाखे मांडले जात आहेत. भुजबळ हे मध्य नाशिक मतदारसंघात आघाडीवर असतील असे गणित मांडले जात असताना, पूर्व आणि पश्चिम नाशिक मतदारसंघात कोण आघाडी घेईल याविषयी कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. दुसरीकडे महापालिका निवडणुकीप्रमाणेच मनसेला अंडर करंट जाणवत असल्याचा दावा त्या पक्षाचे कार्यकर्ते करीत असल्याने त्याबाबत मनसेही मुसंडी मारेल असे या पक्षाचे गणित आहे. माकपाचे जायभावे आणि बसपाचे दिनकर पाटील कोणाची मते खेचणार यावरदेखील निकालाचा कौल ठरेल, असा अंदाज कार्यकर्ते मांडत आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचीदेखील अशीच अवस्था असून, भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण की राष्टÑवादीच्या डॉ. भारती पवार यांच्याविषयीदेखील अशीच चर्चा रंगली आहे. नाशिकपेक्षा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अधिक विक्रमी म्हणजे ७० टक्के मतदान नोंदवले गेले आहे. येथे मोदी लाट आणि हरिश्चंद्र चव्हाण यांच्या सर्वपक्षीय संबंधांची चर्चा असली, तरी कळवण म्हणजे भारती पवार यांच्या होमग्राऊंड असलेल्या विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ७२.३६ टक्के मतदान नोंदवले गेले आहे. कळवणचे मतदार भारती पवार यांच्या दृष्टीने अनुकूल मानले जात असले, तरी अन्य तालुक्यांत चव्हाण भरपाई करतील अशी चर्चा आहे. साहजिकच निकालाविषयी थेट खात्रीपूर्ण निकाल कोणीही वर्तवित नसून त्यामुळेच दिल्ली कोण गाठणार हे स्पष्ट होण्यासाठी शुक्रवारच्या मतमोजणीपर्यंत थांबावे लागणार आहे. (प्रतिनिधी)