शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
5
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
6
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
7
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
8
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
9
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
10
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
11
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
12
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
13
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
14
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
15
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
16
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
17
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
18
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
19
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
20
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'

दिल्लीत कोण?

By admin | Updated: May 15, 2014 22:24 IST

नाशिक : अवघ्या एक दिवसावर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आली यंदा प्रचंड अटीतटीची लढत झाल्याने दिल्ली कोण गाठणार.

नाशिक : अवघ्या एक दिवसावर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आली असताना, अद्याप नाशिककरांचा कौल कोणाला हे स्पष्ट झालेले नाही. यंदा प्रचंड अटीतटीची लढत झाल्याने दिल्ली कोण गाठणार, याचे उत्तर देणे पंडितांनाही कठीण झाले आहे. तथापि, प्रत्येक जण आपापल्या सोयीने अर्थ काढीत असून, त्यावर पैजाही लागत आहेत. राष्टÑवादीचे वजनदार नेते छगन भुजबळ नाशिक लोकसभा निवडणूक लढवित असल्याने राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागून आहे. त्यातच हेमंत गोडसे यांची उमेदवारी भुजबळ यांना चांगलीच आव्हानात्मक ठरून गेली. मनसेचे प्रदीप पवार, माकपाचे तानाजी जायभावे, बसपाचे दिनकर पाटील आणि आम आदमी पार्टीचे विजय पांढरे यांच्या उमेदवारीमुळे सुरुवातीला ही निवडणूक बहुरंगी होईल असे वाटत होते; परंतु प्रत्यक्षात मात्र चर्चा भुजबळ आणि गोडसे यांच्या उमेदवारीचीच होत राहिली. त्यातच मतदानाचा वाढता टक्का हाही उत्सुकता वाढविणारा ठरला. मतदानाचा टक्का वाढताना इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच ६८ टक्के मतदान झाले. हे मतदान भुजबळ यांच्या पथ्यावर पडेल असे मानले जात असताना, इगतपुरी खालोखाल सिन्नरमध्ये आणि देवळाली विधानसभा मतदारसंघातदेखील प्रत्येकी ६३ टक्के मतदान झाले असून, हे गोडसे यांना फायदेशीर असेल असे आडाखे मांडले जात आहेत. भुजबळ हे मध्य नाशिक मतदारसंघात आघाडीवर असतील असे गणित मांडले जात असताना, पूर्व आणि पश्चिम नाशिक मतदारसंघात कोण आघाडी घेईल याविषयी कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. दुसरीकडे महापालिका निवडणुकीप्रमाणेच मनसेला अंडर करंट जाणवत असल्याचा दावा त्या पक्षाचे कार्यकर्ते करीत असल्याने त्याबाबत मनसेही मुसंडी मारेल असे या पक्षाचे गणित आहे. माकपाचे जायभावे आणि बसपाचे दिनकर पाटील कोणाची मते खेचणार यावरदेखील निकालाचा कौल ठरेल, असा अंदाज कार्यकर्ते मांडत आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचीदेखील अशीच अवस्था असून, भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण की राष्टÑवादीच्या डॉ. भारती पवार यांच्याविषयीदेखील अशीच चर्चा रंगली आहे. नाशिकपेक्षा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अधिक विक्रमी म्हणजे ७० टक्के मतदान नोंदवले गेले आहे. येथे मोदी लाट आणि हरिश्चंद्र चव्हाण यांच्या सर्वपक्षीय संबंधांची चर्चा असली, तरी कळवण म्हणजे भारती पवार यांच्या होमग्राऊंड असलेल्या विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ७२.३६ टक्के मतदान नोंदवले गेले आहे. कळवणचे मतदार भारती पवार यांच्या दृष्टीने अनुकूल मानले जात असले, तरी अन्य तालुक्यांत चव्हाण भरपाई करतील अशी चर्चा आहे. साहजिकच निकालाविषयी थेट खात्रीपूर्ण निकाल कोणीही वर्तवित नसून त्यामुळेच दिल्ली कोण गाठणार हे स्पष्ट होण्यासाठी शुक्रवारच्या मतमोजणीपर्यंत थांबावे लागणार आहे. (प्रतिनिधी)