शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

वडाळा परिसरातील गोठे केव्हा हटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:41 IST

इंदिरानगर - शहरातील सर्वात जास्त वडाळा गाव परिसरात जनावरांचे गोठे आहेत त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न तीस वर्षापासून ...

इंदिरानगर - शहरातील सर्वात जास्त वडाळा गाव परिसरात जनावरांचे गोठे आहेत त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न तीस वर्षापासून गंभीर बनत चालला आहे. एक वर्षापूर्वी डिसेंबर महिन्यात जनावरांचे गोठे स्थलांतर करण्याच्या आदेश देण्यात आला होता. परंतु तेव्हाही नोटीस वाटप करण्याचा सोपस्कार करण्यात आला होता. जनावरांचे गोठे हलविण्यास तेव्हाही मुहूर्त लागला नाही. आताही स्थायी समितीत या विषयावर चर्चा झाली आणि सभापतींनी आदेशही दिले मात्र गोठे खरोखरच हटतील काय या विषयावर शंका आहे.

जनावरांच्या गोठ्यातील मलमूत्र नागरिकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे वडाळा गाव रस्ता व वडाळा गावातील लोकवस्तीत जनावरांची गोठे हाेते. महापालिकेच्या कारवाईच्या इशाऱ्यावर काही प्रमाणात गोठे हटवण्यात आले, मात्र बहुतांश गोठे जैसे थे आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाला माणसापेक्षा जनावरे महत्त्वाचे असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे महापालिकेच्या वतीने गोठेधारकांना फक्त नोटिसा बजावून फक्त सोपस्कार केला जातो

वडाळागावात जिनत नगर ,मेहबूबनगर, अण्णाभाऊ साठे नगर , मुमताज नगर ,गुलशन नगर,यासह रहिवासी परिसर असून सुमारे बारा हजार लोकवस्ती असलेले वडाळा गाव आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी एक ते दोन जनावरांचे गोठे होते आता त्यांची संख्या चाळीस ते पंचेचाळीसपर्यंत आहे. जनावरांच्या मलमूत्राचा प्रश्न निर्माण होत असल्याने बहुतेक गोठेधारकांना सर्रासपणे जनावर मलमूत्र गोठ्याबाहेर खड्डा करून किंवा बाहेर सोडून दिले आहे त्यामुळे पिंगुळ बाग परिसरातील काही नागरिकांच्या घरात मलमूत्र शिरत आहे तसेच मलमूत्र नाल्यांमध्ये सोडून दिल्याने सदर नाला विविध कॉलनी आणि सोसायट्यामधून जात असल्याने घाण आणि दुर्गंधी पसरली आहे. तसेच सध्या पावसाळा सुरू असल्याने पावसाचे पाणी जाऊन मलमूत्र दुतर्फा रस्त्यावर वाहत असते. अनेक वेळेस समक्ष भेटून आणि निवेदन देऊन सुद्धा अद्यापी जनावरांचे गोठे हटवली जातानाही नाही.

इन्फो..

आयुक्तांचे दौरे की रोड शो?

सुमारे दोन वर्षापूर्वी तत्कालीन आयुक्त यांनी वडाळा गावातील जनावरांच्या गोठ्याचे मलमूत्रामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने या भागाची पाहणी केली हेाती. त्यानंतर अद्यापी परिस्थिती जैसे थेच असल्याने दौरे फक्त रोड शाे ठरत आहे.

इन्फो..

राजकीय विरोध

नाशिक शहरातील बहुतांश ठिकाणी गोठ्यांचा प्रश्न गंभीर आहे. परंतु काही राजकीय नेत्यांचे गोठे असल्याने दरवेळी याबाबत केवळ घोषणाच होते आणि गोठे हटवण्याचा विषय मागे पडतो. त्यामुळे आता तरी कार्यवाही होईल की नाही, याबाबत सांशकता आहे.