शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

वडील किंवा आई गमावलेल्या ३८२ बालकांसाठीचा निधी केव्हा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:14 IST

नाशिक : जिल्ह्यातील दोन पालक गमावलेल्या २४ बालकांच्या नावावर ५ लाख रुपयांच्या सहाय्य मुदत ठेवींचा निधी काळजी व संरक्षण ...

नाशिक : जिल्ह्यातील दोन पालक गमावलेल्या २४ बालकांच्या नावावर ५ लाख रुपयांच्या सहाय्य मुदत ठेवींचा निधी काळजी व संरक्षण कृतीदलाच्या आढावा बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यातून त्या बालकांच्या भविष्यासाठी काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र, एक पालक गमावलेल्या जिल्ह्यातील अधिकृत नोंद असलेल्या ७७८ बालकांपैकी केवळ ३९६ बालकांना बालसंगोपन निधीचा लाभ मंजूर झाला आहे. मात्र, अद्यापही ३८२ नोंद झालेल्या तसेच नोंद न झालेल्या शेकडो बालकांच्या दुसऱ्या जीवित पालकांना बालसंगोपन निधीचा प्रती बालकासाठीचा ११०० रुपयांचा दिलासा मिळण्याची अद्यापही प्रतीक्षाच आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे एक किंवा दोन्ही पालक गमावल्याने जी बालके अनाथ झाली आहेत, अशा बालकांच्या पुनर्वसन व सर्वांगिण विकासासाठी संबंधित बालक व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या नावे सामायिक बँक खात्यावर एकरकमी पाच लाख रुपये मुदत ठेवीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. मात्र, एक आणि विशेषत्वे कमावता पालक गमावलेल्या बालकांच्या दुसऱ्या पालकांची स्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. त्यांच्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या बालसंगोपन योजनांचा लाभ या बालकांना होण्यासाठी तातडीने नियोजन करण्याची आवश्यकता आहे.

इन्फो

तातडीने निधी मिळण्याची गरज

जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे पालक गमावलेली एकूण ८६१ बालके असून त्यापैकी शून्य ते १८ वयोगटातील २४ बालकांनी दोन्ही पालक गमावले असून त्यांच्यासाठीच्या मुदत ठेवीचा निधी मंजूर झाला आहे. १८ पर्यंतच्या वयोगटातील ७७८ बालकांनी एक पालक गमावला आहे. त्याचप्रमाणे तर १८ वर्षांवरील वयोगटातील ५० युवांनीही त्यांचे एक पालक गमावले आहेत. त्यातील ३९६ बालकांना बाल संगोपन योजनांचा लाभ मंजूर करण्यात आला असून वारस नोंदणी व शिधापत्रिकांच्या लाभासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. मात्र, उर्वरित नोंदणी झालेल्या ३८२ एकल पालकांसह अद्यापही नोंदणी न झालेल्या शेकडो एकल पालकांची तातडीने नोंदणी होऊन त्यांना तातडीने निर्धारित मदतीची रक्कम मिळण्याची गरज आहे.

इन्फो

एक पालक गमावलेल्या बालकांबाबत आवाहन

दोन्ही पालक तसेच एक पालक गमावलेल्या सर्व बालकांचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे. मात्र, प्रशासनाच्या अनेक मर्यादा असतात. त्यामुळे जागरुक नागरिकांनी त्यांच्या आसपासच्या गरजू कुटुंबातील एक पालक गमावलेल्या बालकाबाबत काही माहिती असल्यास त्या कुटुंबातील दुसऱ्या पालकाने तातडीने नासर्डी पूलानजीकच्या जिल्हा समाज कल्याण विभागाच्या जिल्हा आणि महिला बाल विकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुरेखा पाटील यांनी केले आहे.