शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

वडील किंवा आई गमावलेल्या ३८२ बालकांसाठीचा निधी केव्हा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:14 IST

नाशिक : जिल्ह्यातील दोन पालक गमावलेल्या २४ बालकांच्या नावावर ५ लाख रुपयांच्या सहाय्य मुदत ठेवींचा निधी काळजी व संरक्षण ...

नाशिक : जिल्ह्यातील दोन पालक गमावलेल्या २४ बालकांच्या नावावर ५ लाख रुपयांच्या सहाय्य मुदत ठेवींचा निधी काळजी व संरक्षण कृतीदलाच्या आढावा बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यातून त्या बालकांच्या भविष्यासाठी काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र, एक पालक गमावलेल्या जिल्ह्यातील अधिकृत नोंद असलेल्या ७७८ बालकांपैकी केवळ ३९६ बालकांना बालसंगोपन निधीचा लाभ मंजूर झाला आहे. मात्र, अद्यापही ३८२ नोंद झालेल्या तसेच नोंद न झालेल्या शेकडो बालकांच्या दुसऱ्या जीवित पालकांना बालसंगोपन निधीचा प्रती बालकासाठीचा ११०० रुपयांचा दिलासा मिळण्याची अद्यापही प्रतीक्षाच आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे एक किंवा दोन्ही पालक गमावल्याने जी बालके अनाथ झाली आहेत, अशा बालकांच्या पुनर्वसन व सर्वांगिण विकासासाठी संबंधित बालक व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या नावे सामायिक बँक खात्यावर एकरकमी पाच लाख रुपये मुदत ठेवीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. मात्र, एक आणि विशेषत्वे कमावता पालक गमावलेल्या बालकांच्या दुसऱ्या पालकांची स्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. त्यांच्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या बालसंगोपन योजनांचा लाभ या बालकांना होण्यासाठी तातडीने नियोजन करण्याची आवश्यकता आहे.

इन्फो

तातडीने निधी मिळण्याची गरज

जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे पालक गमावलेली एकूण ८६१ बालके असून त्यापैकी शून्य ते १८ वयोगटातील २४ बालकांनी दोन्ही पालक गमावले असून त्यांच्यासाठीच्या मुदत ठेवीचा निधी मंजूर झाला आहे. १८ पर्यंतच्या वयोगटातील ७७८ बालकांनी एक पालक गमावला आहे. त्याचप्रमाणे तर १८ वर्षांवरील वयोगटातील ५० युवांनीही त्यांचे एक पालक गमावले आहेत. त्यातील ३९६ बालकांना बाल संगोपन योजनांचा लाभ मंजूर करण्यात आला असून वारस नोंदणी व शिधापत्रिकांच्या लाभासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. मात्र, उर्वरित नोंदणी झालेल्या ३८२ एकल पालकांसह अद्यापही नोंदणी न झालेल्या शेकडो एकल पालकांची तातडीने नोंदणी होऊन त्यांना तातडीने निर्धारित मदतीची रक्कम मिळण्याची गरज आहे.

इन्फो

एक पालक गमावलेल्या बालकांबाबत आवाहन

दोन्ही पालक तसेच एक पालक गमावलेल्या सर्व बालकांचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे. मात्र, प्रशासनाच्या अनेक मर्यादा असतात. त्यामुळे जागरुक नागरिकांनी त्यांच्या आसपासच्या गरजू कुटुंबातील एक पालक गमावलेल्या बालकाबाबत काही माहिती असल्यास त्या कुटुंबातील दुसऱ्या पालकाने तातडीने नासर्डी पूलानजीकच्या जिल्हा समाज कल्याण विभागाच्या जिल्हा आणि महिला बाल विकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुरेखा पाटील यांनी केले आहे.