शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

वडील किंवा आई गमावलेल्या ३८२ बालकांसाठीचा निधी केव्हा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:14 IST

नाशिक : जिल्ह्यातील दोन पालक गमावलेल्या २४ बालकांच्या नावावर ५ लाख रुपयांच्या सहाय्य मुदत ठेवींचा निधी काळजी व संरक्षण ...

नाशिक : जिल्ह्यातील दोन पालक गमावलेल्या २४ बालकांच्या नावावर ५ लाख रुपयांच्या सहाय्य मुदत ठेवींचा निधी काळजी व संरक्षण कृतीदलाच्या आढावा बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यातून त्या बालकांच्या भविष्यासाठी काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र, एक पालक गमावलेल्या जिल्ह्यातील अधिकृत नोंद असलेल्या ७७८ बालकांपैकी केवळ ३९६ बालकांना बालसंगोपन निधीचा लाभ मंजूर झाला आहे. मात्र, अद्यापही ३८२ नोंद झालेल्या तसेच नोंद न झालेल्या शेकडो बालकांच्या दुसऱ्या जीवित पालकांना बालसंगोपन निधीचा प्रती बालकासाठीचा ११०० रुपयांचा दिलासा मिळण्याची अद्यापही प्रतीक्षाच आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे एक किंवा दोन्ही पालक गमावल्याने जी बालके अनाथ झाली आहेत, अशा बालकांच्या पुनर्वसन व सर्वांगिण विकासासाठी संबंधित बालक व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या नावे सामायिक बँक खात्यावर एकरकमी पाच लाख रुपये मुदत ठेवीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. मात्र, एक आणि विशेषत्वे कमावता पालक गमावलेल्या बालकांच्या दुसऱ्या पालकांची स्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. त्यांच्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या बालसंगोपन योजनांचा लाभ या बालकांना होण्यासाठी तातडीने नियोजन करण्याची आवश्यकता आहे.

इन्फो

तातडीने निधी मिळण्याची गरज

जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे पालक गमावलेली एकूण ८६१ बालके असून त्यापैकी शून्य ते १८ वयोगटातील २४ बालकांनी दोन्ही पालक गमावले असून त्यांच्यासाठीच्या मुदत ठेवीचा निधी मंजूर झाला आहे. १८ पर्यंतच्या वयोगटातील ७७८ बालकांनी एक पालक गमावला आहे. त्याचप्रमाणे तर १८ वर्षांवरील वयोगटातील ५० युवांनीही त्यांचे एक पालक गमावले आहेत. त्यातील ३९६ बालकांना बाल संगोपन योजनांचा लाभ मंजूर करण्यात आला असून वारस नोंदणी व शिधापत्रिकांच्या लाभासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. मात्र, उर्वरित नोंदणी झालेल्या ३८२ एकल पालकांसह अद्यापही नोंदणी न झालेल्या शेकडो एकल पालकांची तातडीने नोंदणी होऊन त्यांना तातडीने निर्धारित मदतीची रक्कम मिळण्याची गरज आहे.

इन्फो

एक पालक गमावलेल्या बालकांबाबत आवाहन

दोन्ही पालक तसेच एक पालक गमावलेल्या सर्व बालकांचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे. मात्र, प्रशासनाच्या अनेक मर्यादा असतात. त्यामुळे जागरुक नागरिकांनी त्यांच्या आसपासच्या गरजू कुटुंबातील एक पालक गमावलेल्या बालकाबाबत काही माहिती असल्यास त्या कुटुंबातील दुसऱ्या पालकाने तातडीने नासर्डी पूलानजीकच्या जिल्हा समाज कल्याण विभागाच्या जिल्हा आणि महिला बाल विकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुरेखा पाटील यांनी केले आहे.