शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

निधी पळवापळवीतून काय साध्य होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:12 IST

चालू आर्थिक वर्षात बांधकाम विभागाकडे रस्ते दुरूस्ती व देखभालीसाठी बिगर आदिवासी व आदिवासी विभागाला जो काही निधी मिळाला आहे. ...

चालू आर्थिक वर्षात बांधकाम विभागाकडे रस्ते दुरूस्ती व देखभालीसाठी बिगर आदिवासी व आदिवासी विभागाला जो काही निधी मिळाला आहे. त्याला खर्ची पाडण्यावरूनच हा वाद उभा राहिला आहे. आदिवासी क्षेत्रासाठी मिळालेला निधी अन्यत्र खर्च करता येत नसला तरी, बिगर आदिवासी क्षेत्राचा निधी आदिवासी क्षेत्रावर खर्च करण्याची तरतूद आहे. हे खरे असले तरी, गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी बांधकाम समितीने आदिवासी क्षेत्रातील कामांना निधीची तरतूद नसताना दिलेली मंजुरी व नंतर शासनाकडून अपेक्षित निधी प्राप्त न झाल्याने त्याचे जिल्हा परिषदेवर वाढलेल्या दायित्त्वाची बाब अजूनही बिगर आदिवासी क्षेत्रातील सदस्य व पदाधिकाऱ्यांना सलत आहे. जवळपास २० ते २२ कोटी रुपयांचे दायित्व देताना बिगर आदिवासी क्षेत्रातील नवीन कामांना निधीच शिल्लक राहू शकला नाही. परिणामी सदस्यांच्या गटात कामे होऊ शकली नाहीत. परंतु त्यावेळी राज्यातील सत्तेवर आजचे विरोधी पक्षाचे सदस्य व पदाधिकारी होते. त्यांना जाब विचारण्याची हिंमत कोणी दाखवू शकले नाही. आता मात्र फासे पलटले. विरोधक सत्ताधारी व सत्ताधारी विरोधात बसले व पुन्हा आदिवासी क्षेत्रातील रस्त्यांसाठी बिगर आदिवासी क्षेत्राचा निधी देण्यास विरोध होऊ लागला आहे.

मुळातच जिल्हा परिषदेला प्राप्त होणारा निधी हा विकासासाठीच असतो. फक्त त्याच्या खर्चाचे नियोजन करतांना लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेने डोळसपणे करणे गरजेचे असते. हाती पैसा नसूनही उगीचच खळखळाट करण्यात तसा अर्थही नसतो. परंतु लोकप्रतिनिधी दबाव टाकतात व प्रशासकीय यंत्रणाही त्यापुढे मान तुकवत असतील, तर अशा संस्थांचा आर्थिक डोलारा कोसळण्यास वेळ लागत नाही. जिल्हा परिषदेच्या विद्यमान लोकप्रतिनिधींसाठी हे आर्थिक वर्ष त्याच अर्थाने महत्त्वाचे आहे. त्यामुळे पदाधिकारी, सदस्यांनी ‘येरे माझ्या मागल्या’सारखाच कारभार सुरू ठेवला तर त्याचे परिणाम पुढच्या वर्षी नव्याने निवडून येणाऱ्या सदस्यांना भोगावे लागतील, हे निश्चित.

- श्याम बागुल