शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वेडिंग इंडस्ट्रीजलाही सवलतीच्या पॅकेजची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:14 IST

नाशिक : गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे लग्न सोहळे ठप्प आहेत. नोव्हेंबरनंतर कुठेतरी हंगाम मदतीला आल्याचे वाटत असताना, पुन्हा एकदा ...

नाशिक : गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे लग्न सोहळे ठप्प आहेत. नोव्हेंबरनंतर कुठेतरी हंगाम मदतीला आल्याचे वाटत असताना, पुन्हा एकदा आधी जिल्हा प्रशासन आणि नंतर शासनाने निर्बंध घातल्याने लग्नसोहळे बंद झाले आहे. राज्य सरकारने कष्टकरी वर्गाला आर्थिक मदत दिली, तशी नाही तरी किमान सवलतीचे पॅकेज देण्याची मागणी होऊ लागली आहे.

लग्नसोहोळे केवळ मंगल कार्यालय, तसेच लॉन्स चालकांपुरता विषय राहिला नसून, जिल्हाभरात शेकडो लॉन्स आणि मंगल कार्यालये आहेत, तसेच लग्नासाठी आवश्यक विधींचे साहित्य, मंडप डेकोरेटर्स, इव्हेंट मॅनेजमेंट, फोटोग्राफी आणि व्हिडीओ शूटिंगपासून थेट वाजंत्री आणि घोडे आणणाऱ्या घटकांशी हा सोहळा मर्यादीत झाला आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोेरोनाचे संकट आले.

लॉकडाऊन सुरू करण्यात आल्याने लग्न सोहळे बंद करण्यात आले. नोव्हेंबरनंतर शंभर वऱ्हाडींना परवानगी देण्यात आल्यानंतर ती पन्नासवर आणण्यात आली. नंतर तर १५ मार्चपासून जिल्हा प्रशासनाने घरगुती स्वरूपात लग्नसोहळे करण्यास मान्यता दिली. त्यामुळे अन्य घटकांची अडचण झाली. राज्य शासनाने ५ एप्रिलपासून कडक निर्बंध घातल्याचे जाहीर केले. यावेळी लग्नसोहळ्यासाठी केवळ २५ जणांना वऱ्हाडींना परवानगी देण्यात आली. मात्र, त्यासाठीही सर्वांच्या आरटीपीसीआर चाचण्या करून ते कोरोनामुक्त झाल्याचे प्रमाणपत्र बाळगायचे, तसेच लग्नसोहळा कितीही लहान स्वरूपात असला, तरी मंगल कार्यालये आणि लॉन्स चालकांकडून मात्र सर्वच मनुष्यबळ आणि यंत्रणा राबविण्याची अपेक्षा असते. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता, नाशिकमधील विवाह उद्योग सध्या बंद अवस्थेत आहे. लग्न सोहोळे प्रासंगिक असले, तरी त्यावर अनेक घटक अवलंबून आहेत. त्यामुळे या सवलतील आर्थिक सवलत नसली, तरी शासनाच्या वतीने लागू असलेले कर माफ करावे, अशी मागणी नाशिकमध्ये अलीकडेच स्थापन झालेल्या फेडरेशन ऑफ वेडिंग इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संदीप काकड यांनी केली आहे. विवाह उद्योग सोहळ्याशी संबंधित लॉन्स व मंगल कार्यालय चालक, तसेच मंडप डेकोरेटर्स, फोटोग्राफर्स अशा वेगवेगळ्या व्यावसायिक घटकांच्या संघटना असून, त्यांचे प्रत्येकी चार प्रतिनिधींना एकत्र घेऊन फेडरेशन स्थापन करण्यात आले आहे. या संघटनेने तशी मागणी केली आहे.

कोट...

मंगल कार्यालय, तसेच लॉन्स चालकांना तर सरकार थेट मदत देतील असे वाटत नाही. मात्र, अनेकांनी व्यवसायासाठी कर्ज काढले आहे, तसेच विवाह सोहळे बंद असले, तरी घरपट्टी, पाणीपट्टी आणि किमान वीजबिल तर भरावेच लागते. त्यामुळे किमान कर्जावरील व्याज माफ करावे, घरपट्टी, पाणीपट्टीत सवलत द्यावी, अशी मागणी आहे.

संदीप काकड, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ वेडिंग इंडस्ट्रीज

छायाचित्र आर फोटोवर १० संदीप काकड नावाने सेव्ह...

===Photopath===

100521\10nsk_1_10052021_13.jpg

===Caption===

संदीप काकड