शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
2
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
4
ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
5
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
6
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...
8
दिल्ली लाल किल्ला कार स्फोट: फरिदाबादमधून अटक केलेल्या डॉ. शाहीन शाहिदचा पहिला फोटो समोर
9
रंगावरुन प्रणित मोरेला हिणवायचे लोक, 'बिग बॉस'च्या घरात कॉमेडियनचा खुलासा, म्हणाला- "शाळेत आणि कॉलेजमध्ये..."
10
₹२००० नं महाग झालं सोनं, चांदीच्या दरातही ३ हजारांपेक्षा अधिक वाढ; अजून किती वाढ होणार?
11
प्रेयसीला गोळी मारून प्रियकरानं स्वत:वरही झाडली गोळी; ७ वर्षात प्रेमात अचानक दुरावा का आला?
12
'या' सरकारी App द्वारे ऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज करता येणार! 'या' राज्यांमध्ये सुविधा सुरू
13
यूट्यूबरच्या कॅमेऱ्यात कैद झाली दिल्ली स्फोटाची ‘लाइव्ह’ घटना, पाहा धक्कादायक व्हिडिओ...
14
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; १२ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
15
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
16
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
17
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
18
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
19
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
20
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती

आम्हाला हवाय भष्ट्राचार मुक्त भारत

By admin | Updated: August 15, 2014 00:38 IST

आम्हाला हवाय भष्ट्राचार मुक्त भारत

ंनाशिक, दि. १४ : स्वातंत्र्य मिळूनही काही गोष्टी पाय रोवून असल्याने देशाच्या प्रगतीत मोठा अडसर निर्माण होत आहे. त्यामध्ये भ्रष्टाचार ही देशाला लागलेली किड असून, जोपर्यंत देश भ्रष्टाचारमुक्त होणार नाही, तोपर्यंत भारताला विकसित देशांच्या रांगेत स्थान मिळणार नसल्याच्या प्रतिक्रिया तरुणांनी व्यक्त केल्या. स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभुमीवर विविध महाविद्यालयातील तरुणांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता त्यांनी ‘आम्हाला भ्रष्टाचारमुक्त भारत हवाय’ अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर पायाभूत सुविधा, रोजगार व दर्जेदार शिक्षणास प्राधान्य दिल्यास भारताला महासत्तेचे स्वप्न साकार होणे सहज शक्य होईल. भ्रष्टाचार देशाच्या प्रगतीतील अडथळाभ्रष्टाचार हाच देशाच्या प्रगतीतील महत्त्वाचा अडथळा असल्याचे तरुणांनी नमुद केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पूर्ण स्वातंत्र्य, प्रत्येकाला सर्व पायाभूत सुविधांची उपलब्धता, खंडणीमुक्त समाज ही काळाची गरज बनली आहे. भ्रष्टाचारामुळे संबंध देशाला पोखरले जात असल्याने मायभूमीवर उत्कट प्रेम व निष्ठा असूनही तरु णांना कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी योग्य दिशा सापडत नाही. त्याचबरोबर देशाच्या प्रगतीला देखील अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारमुक्त भारत झाल्यास देशाच्या प्रगतीतील अडथळे दुर होतील. त्याचबरोबर जगाच्या नकाशावर भारताची स्वच्छ व सुंदर प्रतिमा होईल यात काहीच दुमत नसल्याचे तरुणांनी सांगितले. चला संकल्प करूया...देशाला विकसित देशांच्या रांगेत स्थान मिळवून देण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी प्रयत्न करायला हवे. देशात या सुधारणा व्हाव्यात असे उपदेश न देता आपणच एक उत्तम नागरिक बनण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असेही तरुणांनी सांगितले. याबाबत संदीप तायडे यांने, भ्रष्टाचार मुक्त भारत व्हायला हवा, देशात पायाभूत सुविधा असायला हव्यात तसेच रोजगारांच्या पुरेशा संधी उपलब्ध व्हाव्यात असे संगळ्यांकडूनच सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात आपण देशाचा उत्तम नागरिक बनण्यासाठी प्रयत्न करतो काय? याबाबत आत्मपरिक्षण करायला हवे. इतरांना उपदेश न देता आपल्यापासूनच देशाच्या उन्नतीसाठी हातभार लावण्यासाठी प्रयत्न केल्यास आपणास २०२० च्या अगोदरच महासत्ता देशांच्या रांगेत स्थान मिळेल. त्यामुळे स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर देशातील तमाम तरुणांनी संकल्प करून चांगल्या कामासाठी प्राधान्य द्यायला हवे. नुसतेच उपदेश देऊन चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून आपण देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावायला हवा असेही संदीपने सांगितले.