शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
6
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
7
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
8
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
9
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
10
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
11
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
12
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
13
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
14
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
15
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
16
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
17
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
20
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार

भर पावसाळ्यात महिलांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:18 IST

गोंदे दुमाला : राजकीय वारसा व वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथे गेल्या महिनाभरापासून नागरिक दैनंदिन ...

गोंदे दुमाला : राजकीय वारसा व वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथे गेल्या महिनाभरापासून नागरिक दैनंदिन खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. येथे एकाच महिन्यात जवळपास चार रोहित्र बदलूनदेखील विजेचा प्रश्न सुटत नसल्याने येथील महिलांना भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी घराबाहेर जाऊन भटकंती करावी लागत आहे. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

इगतपुरी तालुक्यातील २ हजार लोकसंख्या असलेल्या पाडळी देशमुख येथे दैनंदिन खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे येथील नागरिक मेटाकुटीस आले असून वीज वितरणच्या या सावळ्या गोंधळामुळे येथील महिलांनादेखील खंडित पुरवठ्याचा सामना करावा लागत असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी घराबाहेर जाऊन वणवण करावी लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर या दैनंदिन खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे वीज वितरण कंपनीने एकाच महिन्यात जवळपास चार रोहित्र बदलले असले तरी वीज पुरवठा खंडित होण्यापासून थांबत नसल्यामुळे नक्की काय प्रकार आहे हे वीज वितरण कंपनीने याचा शोध घेऊन लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. यामुळे पाडळी देशमुख येथे गेल्या काही दिवसांपासून भर पावसाळ्यात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे. या ठिकाणी वीजवाहक तारा लोंबकळत असून येथील विजेचे खांब अतिशय जीर्ण झाल्यामुळे ते कधी खाली कोसळतील याचा भरवसा नाही. तसेच येथे वीजपुरवठा नेहमीच खंडित होण्याचे प्रमाण अधिक होत असते. तरी वीज वितरण कंपनीने जीर्ण झालेले विजेचे खांब व जीर्ण झालेल्या वीज तारा बदलण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

-------------

दैनंदिन खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे आॅनलाईन शिक्षण, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, तसेच इतर महत्त्वाच्या कामांना अडथळा निर्माण होत आहे. गावातील विजेचे खांब अतिशय जीर्ण झाले असून वीज वाहक तारा लोंबकळत असल्याने त्या नव्याने बदलण्याची अत्यावश्यक गरज असून जर वीज वाहिन्या भूमिगत केल्यास विजेसंबंधी अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल.

- फकिरराव धांडे, अध्यक्ष, कर्मयोगी प्रतिष्ठान. पाडळी देशमुख.

पाडळी देशमुख येथे वीज वितरणच्या दैनंदिन खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे महिलांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे चित्र. (०३ गोंदे १)

030921\03nsk_13_03092021_13.jpg

०३ गोंदे १