शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

दोन दिवसाआड पाणीपुरवठा

By admin | Updated: September 5, 2015 21:38 IST

मालेगाव : लोकप्रतिनिधी-प्रशासनाचा शिक्कामोर्तब

आझादनगर : मालेगाव शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रातील कमी झालेला पाणीसाठा आणि पावसाने फिरवलेली पाठ या पार्श्वभूमीवर शहरास शनिवारपासून एक दिवसाऐवजी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील पाणीटंचाईसंदर्भात मनपा महासभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी महापौर हाजी मोहंमद इब्राहिम होते. शहरास चणकापूर धरणातून तळवाडे साठवण तलावाद्वारे तसेच गिरणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र चणकापूर धरणक्षेत्रात यंदा कमी पर्जन्यवृष्टी झाली आहे. तळवाडे साठवण तलावातील पाणीसाठाही कमी झालेला आहे. मालेगाव-शहर - तालुक्यासह जळगाव जिल्ह्यास पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरणातील पाणीसाठा आता तीन टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर नवनियुक्त मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांनी गेल्या गुरुवारी मनपा गटनेत्यांची बैठक बोलावली होती. मात्र त्याकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली. त्यानंतर महापौर हाजी मोहंमद, उपमहापौर हाजी युनूस ईसा व मनपा आयुक्त बोर्डे यांनी संयुक्तरीत्या गिरणा धरणातील पाणीसाठ्याची पाहणी केल्यानंतर तातडीने शनिवारी पाणीपुरवठा आढावा बैठक बोलावली. या बैठकीत शहराच्या पाणीटंचाईसंदर्भात विशेष महासभा बोलावण्याची मागणी पुढे आली. मात्र मालेगाव विकास आघाडीचे गटनेते सुनील गायकवाड यांनी सध्याची पाणीटंचाई ‘न भूतो’ अशी असल्यामुळे त्याविषयी आजच निर्णय घेण्याची मागणी केली. तिसरा महाजचे नेते एजाज उमर यांनी विशेष महासभेचा कोरम पूर्ण न झाल्यास विषय पुन्हा लांबणीवर पडण्याची आशंका व्यक्त केली. तसेच सध्याचे शहराचे पाणी आरक्षण हे १९७१च्या लोकसंख्येनुसार आहे. आज शहराच्या लोकसंख्येत तीनपट वाढ झाली आहे. शिवाय हद्दवाढ झाल्यामुळे पाणीआरक्षणात वाढ होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावर उपमहापौर युनूस ईसा यांनी यासंदर्भात मनपातर्फे ठराव करून राज्य सरकारकडे त्याचा पाठपुरावा करण्यात येईल. तसेच त्यासाठी येत्या ११ सप्टेंबरच्या महासभेत चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. सदर बैठकीस प्रा. रिजवान खान, शिवसेनेचे गटनेते मनोहर बच्छाव, सखाराम घोडके, मोहंमद आमीन, रफीक शेख, एजाज बेग आदि नगरसेवक व मनपा अधिकारी आदि उपस्थित होते. (वार्ताहर)