शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसाआड पाणीपुरवठा

By admin | Updated: September 5, 2015 21:38 IST

मालेगाव : लोकप्रतिनिधी-प्रशासनाचा शिक्कामोर्तब

आझादनगर : मालेगाव शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रातील कमी झालेला पाणीसाठा आणि पावसाने फिरवलेली पाठ या पार्श्वभूमीवर शहरास शनिवारपासून एक दिवसाऐवजी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील पाणीटंचाईसंदर्भात मनपा महासभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी महापौर हाजी मोहंमद इब्राहिम होते. शहरास चणकापूर धरणातून तळवाडे साठवण तलावाद्वारे तसेच गिरणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र चणकापूर धरणक्षेत्रात यंदा कमी पर्जन्यवृष्टी झाली आहे. तळवाडे साठवण तलावातील पाणीसाठाही कमी झालेला आहे. मालेगाव-शहर - तालुक्यासह जळगाव जिल्ह्यास पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरणातील पाणीसाठा आता तीन टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर नवनियुक्त मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांनी गेल्या गुरुवारी मनपा गटनेत्यांची बैठक बोलावली होती. मात्र त्याकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली. त्यानंतर महापौर हाजी मोहंमद, उपमहापौर हाजी युनूस ईसा व मनपा आयुक्त बोर्डे यांनी संयुक्तरीत्या गिरणा धरणातील पाणीसाठ्याची पाहणी केल्यानंतर तातडीने शनिवारी पाणीपुरवठा आढावा बैठक बोलावली. या बैठकीत शहराच्या पाणीटंचाईसंदर्भात विशेष महासभा बोलावण्याची मागणी पुढे आली. मात्र मालेगाव विकास आघाडीचे गटनेते सुनील गायकवाड यांनी सध्याची पाणीटंचाई ‘न भूतो’ अशी असल्यामुळे त्याविषयी आजच निर्णय घेण्याची मागणी केली. तिसरा महाजचे नेते एजाज उमर यांनी विशेष महासभेचा कोरम पूर्ण न झाल्यास विषय पुन्हा लांबणीवर पडण्याची आशंका व्यक्त केली. तसेच सध्याचे शहराचे पाणी आरक्षण हे १९७१च्या लोकसंख्येनुसार आहे. आज शहराच्या लोकसंख्येत तीनपट वाढ झाली आहे. शिवाय हद्दवाढ झाल्यामुळे पाणीआरक्षणात वाढ होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावर उपमहापौर युनूस ईसा यांनी यासंदर्भात मनपातर्फे ठराव करून राज्य सरकारकडे त्याचा पाठपुरावा करण्यात येईल. तसेच त्यासाठी येत्या ११ सप्टेंबरच्या महासभेत चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. सदर बैठकीस प्रा. रिजवान खान, शिवसेनेचे गटनेते मनोहर बच्छाव, सखाराम घोडके, मोहंमद आमीन, रफीक शेख, एजाज बेग आदि नगरसेवक व मनपा अधिकारी आदि उपस्थित होते. (वार्ताहर)