शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

पाणीपुरवठा योजनेला विरोध कायम

By admin | Updated: September 16, 2015 22:00 IST

सटाणा : ३८ गावांमध्ये असंतोष; देवळा तालुक्यातही टंचाई

निकवेल : केळझर (गोपाळसागर) धरणातून सटाणा शहरासाठी पाइपलाइनद्वारे पाणी देण्यासाठी परिसरातील ३८ गावांचा विरोध असून, केळझर धरणावर अवलंबून असलेल्या ३८ गावांतील शेतकरी व सटाणा शहर यांच्यात यावरून राजकीय वातावरण तापणार असल्याचे चित्र दिसत आहे.सटाणा शहराचा पाण्याचा प्रश्न मिटावा म्हणून नगरपालिकेने युती शासनाच्या काळात शहरासाठी केळझर धरणामधून पाइपलाइनद्वारे पाणी आणण्याची योजना मंजूर करून योजनेला सुरुवातही झाली होती; मात्र केळझर धरणावर अवलंबून असलेल्या ३८ गावांतील शेतकऱ्यांनी या योजनेला तीव्र विरोध केला. यामुळे केळझर धरणाचे पाणी प्रकरण चांगलेच पेटले होते. ३८ गावांच्या पाठीमागे माजी आमदार ए. टी. पवार यांचे पाठबळ असल्याने ह्या योजनेला विरोध करून ही योजना यशस्वी होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका परिसरातील शेतकऱ्यांनी घेतली आहे, तर सटाणा नगरपालिकेत केळझर धरणातून पाणी आणण्याची योजना कायमस्वरूपी बंद करावी, असा ठराव पालिकामध्ये झाला; परंतु काही नगरसेवकांनी ही योजना रद्द करू नये. केळझर धरणातून शहरात पाणी आणण्याचा ठराव विशेष सभा घेऊन मंजूर करून घेतल्याने पुन्हा सटाणा शहरातील व ३८ गावांतील शेतकऱ्यांमध्ये पाणीप्रश्न पेटणार आहे. नगरपालिकेने केळझर धरणामधूनच सटाणा शहरपूरक पाणीपुरवठा योजना व्हावी, अशी ठाम भूमिका घेतल्याने केळझर धरणावर अवलंबून असलेल्या ३८ गावांतील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून पुढील दिशा ठरवण्यासाठी शुक्रवारी (दि. १८) डांगसौंदाणे येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.धरण परिसरात पाऊस नसल्याने धरणामध्ये पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. त्यातच सटाणा नगर परिषदेने दि. ५ तारखेपासून ट्रक, टँकर लावून केळझर धरणामधून उपसा करीत आहे. रोज २५ ते ३० ट्रक, टँकर पाणी शहरासाठी जात असल्याचे या भागातील शेतकरी सांगतात. पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने टँकरने पाणी नेण्यास अडचण नाही; मात्र मात्र केळझर धरणामधून पाइपलाइनद्वारे पाणी जाण्यास ह्या भागातील शेतकऱ्यांचा तसेच केळझर कृती समितीचा विरोधच राहील. तरी नगरपालिकेने त्यामुळे योजना कायमस्वरूपी बंदच करावी, अशी मागणी होत आहे.देवळा : येथील देवळा नगर पंचायतीचे प्रशासक व जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याने पाण्याची उपलब्धता असतानादेखील देवळा शहर पाण्यापासून वंचित असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. शहराची पाणीपुरवठा योजना पंधरा दिवसांपासून बंद असल्याने जनतेला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहराला नऊगाव सामुदायिक पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यासाठी लोहोणेर येथे गिरणा नदीपात्रात दोन उद्भव विहिरी आहेत. परंतु शासनाच्या धोरणानुसार नदीपात्रालगत ६० फुटांपेक्षा खोल विहीर घेता येत नाही. भूजल पातळी खोल गेल्याने या दोन्ही विहिरी कोरड्याठाक आहेत. सहा महिन्यांपूर्वी देवळा ग्रामपालिकेचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्याने ग्रामपालिका बरखास्त करण्यात आली. नगरपंचायतीवर प्रशासकपदी तहसीलदारांची नेमणूक करण्यात आली. भारत निर्माण योजनेंतर्गत देवळा शहराला स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली. ह्या योजनेचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. देवळा ९ गाव सामुदायिक पाणीपुरवठा योजनेच्या उद्भव विहिरीलगतच नवीन स्वतंत्र योजनेसाठी १०० फूट खोलीची विहीर खोदण्यात आली. सदर विहिरीत पाणी उपलब्ध आहे. परंतु विजेची उपलब्धता नसल्याने हे पाणी ९ गाव पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत टाकता येत नाही. नवीन विहिरीतील पाणी लगतच्या उद्भव विहिरीत टाकले तर गिरणा नदीला आवर्तन येईपर्यंत देवळा शहरासह ९ गावांचा पाणीप्रश्न सुटू शकतो. प्रशासक म्हणतात नवीन योजनेकडे पैशांची उपलब्धता आहे. परंतु ह्या योजनेवरील ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती बरखास्त झाल्याने स्वाक्षरीचा अधिकार नसल्याने आर्थिक समस्या निर्माण झाली असून, नवीन विहिरीवर वीज जोडणी घेता येत नाही, अशी माहिती मिळाली. नजीकच्या बागलाण तालुक्यात देवमामलेदारांनी दुष्काळावर मात करण्यासाठी शासकीय तिजोरी रिकामी करून जनतेला दिलासा दिला, असा इतिहास आहे, तर देवळा नगरपंचायतीच्या प्रशासकपदी असलेल्या तहसीलदारांनी नवीन स्वतंत्र योजनेच्या विहिरीतून पाण्याचा उपसा करून देवळा शहरवासीयांची तहान भागवावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)