शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

पाणीसाठा फक्त पिण्यासाठीच राखीव

By admin | Updated: December 12, 2015 22:30 IST

हरणबारी : पहिले आवर्तन १५ डिसेंबरला

सटाणा : बागलाण तालुक्यातील मध्यम आणि लघुप्रकल्पाचे जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी (दि. ११) जलनियोजन केले. या नियोजनात हरणबारी धरणाचे पाणी पूर्णपणे पिण्यासाठीच आरक्षित करण्यात आले आहे, तर केळझरमधून फक्त एक आवर्तन शेतीसाठी व उर्वरित दोन आवर्तने पिण्यासाठी सोडण्यात येणार आहे. हरणबारी धरणातून येत्या १५ डिसेंबरला पहिले आवर्तन, तर केळझरमधून २० ते २५ डिसेंबरला पहिले आवर्तन सोडण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जलसंपदा विभागाला दिले आहेत.यंदा अपुऱ्या पावसामुळे आॅक्टोबर महिन्यापासूनच टंचाईसदृश चित्र सर्वत्र बघायला मिळत आहे. हे जलसंकट लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाला जलनियोजन करताना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे. या नियोजनात हरणबारी धरण लाभक्षेत्रातील रब्बीचा पेरा करण्यासाठी पाणीच शिल्लक नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले असून, सुमारे ११६६ दलघफू उपलब्ध पाणीसाठा पूर्णपणे पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या राखीव पाण्यामध्ये दोन आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्यात आले असून, पहिले आवर्तन येत्या १५ डिसेंबरला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या आवर्तनाचे पाणी मालेगावपर्यंत पोहोचेल असे नियोजन करण्यात आले आहे. ५७२ दलघफू क्षमता असलेल्या केळझर धरणामध्ये ५७१ दलघफूच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यापैकी पूर्वीच्या सटाणा शहरासाठी आरक्षित असलेल्या साठ्यात वाढ करून तो २८० दलघफू करण्यात आला आहे. या नियोजनात तीन पाण्याचे आवर्तन ठेवण्यात आले असून, पहिले आवर्तन हे शेतीसाठी ठेवण्यात आले आहे. ते येत्या २० ते २५ डिसेंबरदरम्यान सोडण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काल जलसंपदा विभागाला दिले आहेत. (वार्ताहर)