शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
FD करुन तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही? CA ने दिला इशारा, म्हणाले खऱ्या कमाईसाठी गुंतवणूक धोरण बदला
4
Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड
5
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
6
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
7
"प्यार मे सौदेबाजी...", अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट
8
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
9
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
10
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
11
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
12
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
13
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
14
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
15
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
16
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
17
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
18
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
19
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
20
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा

मोसम खोऱ्याला पाणीटंचाईची झळ

By admin | Updated: May 13, 2017 00:10 IST

नामपूर : मोसम खोऱ्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून, पाण्यासाठी महिलांना तासन्तास तिष्ठावे लागत आहे. अनेक ठिकाणी पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनामपूर : मोसम खोऱ्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून, पाण्यासाठी महिलांना तासन्तास तिष्ठावे लागत आहे. अनेक ठिकाणी पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे. सुजलाम सुफलाम गावांपैकी एक असलेल्या नामपूर गावात आता पाणीटंचाईची ओरड सातत्याने होत असते. हरणबारी धरणाचे आवर्तन सोडा ही मागणी म्हणजे तात्पुरती मलमपट्टीच असून त्याऐवजी मोसम नदीकाठच्या गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ठोस उपायांची मागणी नागरिकांनी केली आहे. मोसम नदीवरच ठिकठिकाणी केटीवेअर बांधलेत तर मोसम नदीकाठावरील गावांचा पाणीप्रश्न बऱ्याच प्रमाणावर सुटण्यास मदत होणार आहे. म्हणून मोसम नदीवर केटीवेअर बांधण्यास तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी होत आहे.  हरणबारी धरणाचे आवर्तन येते. मोसम नदीतून ते पाणी वाहून जाते. आठ-पंधरा दिवस पाणीप्रश्नाची तीव्रता कमी होते. पुन्हा पाणीप्रश्न तीव्र होतो. मोसम नदीतील वाळू उपसा प्रचंड वेगात आहे. सरकारी अधिकारी, पोलीस यांच्या आशीर्वादामुळे तो कुणीही थांबवू शकत नाही. वाळू संपल्यावर पाणीप्रश्नाची तीव्रता आजपेक्षाही पुढे गंभीर होईल. हरणबारीचे शेवटचे आवर्तन लवकरात लवकर सोडण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दगाजी बच्छाव, अशोक सावंत, किरण सावंत, रूपेश शहा, संभाजी सावंत यांनी केली आहे़हरणबारी उजवा व डावा कालवा हे प्रलंबित प्रश्न आहेत. या दृष्टीने डावा व उजव्या कालव्यातून कायमस्वरूपी पाणी खेळते झाले तर मोसम खोऱ्याचा पाणीप्रश्न सुटून मोठ्या प्रमाणावर जलसिंचनाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. मोसमचे पूर पाणी जर तळवाडे टॅँकमधून टाकले तर या पाण्याचा फायदा शेती सिंचनाला मोठ्या प्रमाणावर होणार आहे. तळवाडे टँक जर पूरपाण्याने भरून घेतला तर टेंभे, तळवाडे, खामलोण, नामपूर शिवार, मोराणे व बिजोरसे या भागातल्या विहिरींना याचा फायदा होणार आहे. तळवाडे टँकमध्ये जाणाऱ्या चाऱ्यांचे काम जलद गतीने व समजदारीने करून घेतल्यास मोठ्या प्रमाणावर जलसिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.नामपूरला पाणीप्रश्नाची तीव्रता कमी व्हावी म्हणून मोठ्या महादेवाच्या मंदिरालगत एक केटी वेअर बांधल्यास पाणीपुरवठा तर सुरळीत होईलच मात्र गावातले बोअर (जलपरी) व्यवस्थित सुरू राहतील. इंदिरानगरजवळील बंधाऱ्याची उंची वाढवल्यास येथे जलसंचय झाल्यास आजूबाजूच्या विहिरींचाही पाणीसाठा टिकून राहील म्हणून उपाय करणे गरजेचे आहे. हरणबारी धरण बांधून बरेच दिवस झालेत. धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साठला आहे. या गाळामुळे धरणातील साठवण क्षमताही कमी झाली आहे.