शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

मोसम खोऱ्याला पाणीटंचाईची झळ

By admin | Updated: May 13, 2017 00:10 IST

नामपूर : मोसम खोऱ्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून, पाण्यासाठी महिलांना तासन्तास तिष्ठावे लागत आहे. अनेक ठिकाणी पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनामपूर : मोसम खोऱ्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून, पाण्यासाठी महिलांना तासन्तास तिष्ठावे लागत आहे. अनेक ठिकाणी पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे. सुजलाम सुफलाम गावांपैकी एक असलेल्या नामपूर गावात आता पाणीटंचाईची ओरड सातत्याने होत असते. हरणबारी धरणाचे आवर्तन सोडा ही मागणी म्हणजे तात्पुरती मलमपट्टीच असून त्याऐवजी मोसम नदीकाठच्या गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ठोस उपायांची मागणी नागरिकांनी केली आहे. मोसम नदीवरच ठिकठिकाणी केटीवेअर बांधलेत तर मोसम नदीकाठावरील गावांचा पाणीप्रश्न बऱ्याच प्रमाणावर सुटण्यास मदत होणार आहे. म्हणून मोसम नदीवर केटीवेअर बांधण्यास तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी होत आहे.  हरणबारी धरणाचे आवर्तन येते. मोसम नदीतून ते पाणी वाहून जाते. आठ-पंधरा दिवस पाणीप्रश्नाची तीव्रता कमी होते. पुन्हा पाणीप्रश्न तीव्र होतो. मोसम नदीतील वाळू उपसा प्रचंड वेगात आहे. सरकारी अधिकारी, पोलीस यांच्या आशीर्वादामुळे तो कुणीही थांबवू शकत नाही. वाळू संपल्यावर पाणीप्रश्नाची तीव्रता आजपेक्षाही पुढे गंभीर होईल. हरणबारीचे शेवटचे आवर्तन लवकरात लवकर सोडण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दगाजी बच्छाव, अशोक सावंत, किरण सावंत, रूपेश शहा, संभाजी सावंत यांनी केली आहे़हरणबारी उजवा व डावा कालवा हे प्रलंबित प्रश्न आहेत. या दृष्टीने डावा व उजव्या कालव्यातून कायमस्वरूपी पाणी खेळते झाले तर मोसम खोऱ्याचा पाणीप्रश्न सुटून मोठ्या प्रमाणावर जलसिंचनाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. मोसमचे पूर पाणी जर तळवाडे टॅँकमधून टाकले तर या पाण्याचा फायदा शेती सिंचनाला मोठ्या प्रमाणावर होणार आहे. तळवाडे टँक जर पूरपाण्याने भरून घेतला तर टेंभे, तळवाडे, खामलोण, नामपूर शिवार, मोराणे व बिजोरसे या भागातल्या विहिरींना याचा फायदा होणार आहे. तळवाडे टँकमध्ये जाणाऱ्या चाऱ्यांचे काम जलद गतीने व समजदारीने करून घेतल्यास मोठ्या प्रमाणावर जलसिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.नामपूरला पाणीप्रश्नाची तीव्रता कमी व्हावी म्हणून मोठ्या महादेवाच्या मंदिरालगत एक केटी वेअर बांधल्यास पाणीपुरवठा तर सुरळीत होईलच मात्र गावातले बोअर (जलपरी) व्यवस्थित सुरू राहतील. इंदिरानगरजवळील बंधाऱ्याची उंची वाढवल्यास येथे जलसंचय झाल्यास आजूबाजूच्या विहिरींचाही पाणीसाठा टिकून राहील म्हणून उपाय करणे गरजेचे आहे. हरणबारी धरण बांधून बरेच दिवस झालेत. धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साठला आहे. या गाळामुळे धरणातील साठवण क्षमताही कमी झाली आहे.