शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मोसम खोऱ्याला पाणीटंचाईची झळ

By admin | Updated: May 13, 2017 00:10 IST

नामपूर : मोसम खोऱ्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून, पाण्यासाठी महिलांना तासन्तास तिष्ठावे लागत आहे. अनेक ठिकाणी पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनामपूर : मोसम खोऱ्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून, पाण्यासाठी महिलांना तासन्तास तिष्ठावे लागत आहे. अनेक ठिकाणी पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे. सुजलाम सुफलाम गावांपैकी एक असलेल्या नामपूर गावात आता पाणीटंचाईची ओरड सातत्याने होत असते. हरणबारी धरणाचे आवर्तन सोडा ही मागणी म्हणजे तात्पुरती मलमपट्टीच असून त्याऐवजी मोसम नदीकाठच्या गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ठोस उपायांची मागणी नागरिकांनी केली आहे. मोसम नदीवरच ठिकठिकाणी केटीवेअर बांधलेत तर मोसम नदीकाठावरील गावांचा पाणीप्रश्न बऱ्याच प्रमाणावर सुटण्यास मदत होणार आहे. म्हणून मोसम नदीवर केटीवेअर बांधण्यास तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी होत आहे.  हरणबारी धरणाचे आवर्तन येते. मोसम नदीतून ते पाणी वाहून जाते. आठ-पंधरा दिवस पाणीप्रश्नाची तीव्रता कमी होते. पुन्हा पाणीप्रश्न तीव्र होतो. मोसम नदीतील वाळू उपसा प्रचंड वेगात आहे. सरकारी अधिकारी, पोलीस यांच्या आशीर्वादामुळे तो कुणीही थांबवू शकत नाही. वाळू संपल्यावर पाणीप्रश्नाची तीव्रता आजपेक्षाही पुढे गंभीर होईल. हरणबारीचे शेवटचे आवर्तन लवकरात लवकर सोडण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दगाजी बच्छाव, अशोक सावंत, किरण सावंत, रूपेश शहा, संभाजी सावंत यांनी केली आहे़हरणबारी उजवा व डावा कालवा हे प्रलंबित प्रश्न आहेत. या दृष्टीने डावा व उजव्या कालव्यातून कायमस्वरूपी पाणी खेळते झाले तर मोसम खोऱ्याचा पाणीप्रश्न सुटून मोठ्या प्रमाणावर जलसिंचनाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. मोसमचे पूर पाणी जर तळवाडे टॅँकमधून टाकले तर या पाण्याचा फायदा शेती सिंचनाला मोठ्या प्रमाणावर होणार आहे. तळवाडे टँक जर पूरपाण्याने भरून घेतला तर टेंभे, तळवाडे, खामलोण, नामपूर शिवार, मोराणे व बिजोरसे या भागातल्या विहिरींना याचा फायदा होणार आहे. तळवाडे टँकमध्ये जाणाऱ्या चाऱ्यांचे काम जलद गतीने व समजदारीने करून घेतल्यास मोठ्या प्रमाणावर जलसिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.नामपूरला पाणीप्रश्नाची तीव्रता कमी व्हावी म्हणून मोठ्या महादेवाच्या मंदिरालगत एक केटी वेअर बांधल्यास पाणीपुरवठा तर सुरळीत होईलच मात्र गावातले बोअर (जलपरी) व्यवस्थित सुरू राहतील. इंदिरानगरजवळील बंधाऱ्याची उंची वाढवल्यास येथे जलसंचय झाल्यास आजूबाजूच्या विहिरींचाही पाणीसाठा टिकून राहील म्हणून उपाय करणे गरजेचे आहे. हरणबारी धरण बांधून बरेच दिवस झालेत. धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साठला आहे. या गाळामुळे धरणातील साठवण क्षमताही कमी झाली आहे.