शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

येवल्याच्या उत्तर पूर्व भागात पाणीटंचाई;

By admin | Updated: December 5, 2014 00:08 IST

वीज उपकेंद्रही अडचणीत

नगरसूल : सतत तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून असणारा दुष्काळ अन् भीषण पाणीटंचाईने सध्या येवला तालुक्याचा उत्तर-पूर्व भागातील मनुष्य प्राण्यासह पशु-पक्ष्यांना हैराण केलेच आहे, पण आर्थिंगसाठी केवळ ‘पाणी’ नाही म्हणून राजापूर (ता. येवला) येथील वीज उपकेंद्राला चांगलाच ‘शॉक’ बसला आहे.दुष्काळातून उद्भवणाऱ्या भीषण पाणीटंचाईमुळे कोणीच सुटत नाही. याचाच ज्वलंत प्रत्यय येवला तालुक्यातील राजापूर येथील वीज वितरण कंपनीचे वीज उपकेंद्र सध्या घेत आहे. येथील उपकेंद्र आवारात कर्मचाऱ्यांसाठी लाखो रुपये खर्च करून कर्मचारी वसाहत उभी आहे, पण पाणीटंचाईमुळे एकही कर्मचारी राहत नाही अन् अशातच गेल्या काही दिवसांपासून उपकेंद्राच्या आर्थिंगसाठीच पाण्याची वानवा निर्माण झाल्याने परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे महावितरणला विकतचे पाणी घेऊन आर्थिंगसाठी टाकावे लागत असल्यामुळे चांगलाच आर्थिक ‘शॉक’ बसत आहे.राजापूर वीज उपकेंद्रातून परिसरातील ३२ गावांना वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे या उपकेंद्रातील यंत्रणाही अद्यावत केल्या आहेत. पण गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून असणारा दुष्काळ यंदाच्या वर्षी जास्तच असल्याने, भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. रब्बी तर नाहीच, पण खरिपाचीही पिके पावसाअभावी वाया गेली आहेत. गेल्या आठवडाभरापासून विकतचे पाणी वीज कंपनीला घ्यावे लागत असून, चांगलाच आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.या उपकेंद्रात एक शाखा अभियंता, स्थानिक वायरमन, आॅपरेटर असे १२ कर्मचारी असून, त्यांच्यासाठी लाखो रुपये खर्चाच्या दोन कर्मचारी इमारती बांधल्या आहेत. परंतु या ठिकाणी कोणीच राहत नसल्याने, त्यांचीही चांगलीच दुरवस्था बघायला मिळत आहे.(वार्ताहर)