शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

येवल्याच्या उत्तर पूर्व भागात पाणीटंचाई;

By admin | Updated: December 5, 2014 00:08 IST

वीज उपकेंद्रही अडचणीत

नगरसूल : सतत तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून असणारा दुष्काळ अन् भीषण पाणीटंचाईने सध्या येवला तालुक्याचा उत्तर-पूर्व भागातील मनुष्य प्राण्यासह पशु-पक्ष्यांना हैराण केलेच आहे, पण आर्थिंगसाठी केवळ ‘पाणी’ नाही म्हणून राजापूर (ता. येवला) येथील वीज उपकेंद्राला चांगलाच ‘शॉक’ बसला आहे.दुष्काळातून उद्भवणाऱ्या भीषण पाणीटंचाईमुळे कोणीच सुटत नाही. याचाच ज्वलंत प्रत्यय येवला तालुक्यातील राजापूर येथील वीज वितरण कंपनीचे वीज उपकेंद्र सध्या घेत आहे. येथील उपकेंद्र आवारात कर्मचाऱ्यांसाठी लाखो रुपये खर्च करून कर्मचारी वसाहत उभी आहे, पण पाणीटंचाईमुळे एकही कर्मचारी राहत नाही अन् अशातच गेल्या काही दिवसांपासून उपकेंद्राच्या आर्थिंगसाठीच पाण्याची वानवा निर्माण झाल्याने परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे महावितरणला विकतचे पाणी घेऊन आर्थिंगसाठी टाकावे लागत असल्यामुळे चांगलाच आर्थिक ‘शॉक’ बसत आहे.राजापूर वीज उपकेंद्रातून परिसरातील ३२ गावांना वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे या उपकेंद्रातील यंत्रणाही अद्यावत केल्या आहेत. पण गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून असणारा दुष्काळ यंदाच्या वर्षी जास्तच असल्याने, भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. रब्बी तर नाहीच, पण खरिपाचीही पिके पावसाअभावी वाया गेली आहेत. गेल्या आठवडाभरापासून विकतचे पाणी वीज कंपनीला घ्यावे लागत असून, चांगलाच आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.या उपकेंद्रात एक शाखा अभियंता, स्थानिक वायरमन, आॅपरेटर असे १२ कर्मचारी असून, त्यांच्यासाठी लाखो रुपये खर्चाच्या दोन कर्मचारी इमारती बांधल्या आहेत. परंतु या ठिकाणी कोणीच राहत नसल्याने, त्यांचीही चांगलीच दुरवस्था बघायला मिळत आहे.(वार्ताहर)