शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली-मुंबई कॉरिडॉरसाठी सिन्नरला पाणी आरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:11 IST

नाशिक जिल्ह्यात पुरेसे पाणी नसल्याचा अहवाल देऊन काही वर्षांपूर्वी दिल्ली-मुंबई या इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमधून नाशिक जिल्ह्याला वगळण्यात आले होते. नाशिक ...

नाशिक जिल्ह्यात पुरेसे पाणी नसल्याचा अहवाल देऊन काही वर्षांपूर्वी दिल्ली-मुंबई या इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमधून नाशिक जिल्ह्याला वगळण्यात आले होते. नाशिक शहरातील दोन औद्योगिक वसाहतींबरोबरच सिन्नर, दिंडोरी या औद्योगिक वसाहतीला या कॉरिडॉरपासून दूर ठेवण्यात आले होते. औद्योगिक वसाहतीसाठी पुरेसे पाणी नसल्याचे महत्त्वाचे कारण देण्यात आले होते. या संदर्भात खासदार हेमंत गोडसे यांनी प्रयत्न सुरू केले असता, प्रस्तावित असलेल्या अप्पर-वैतरणा-कडवा-देवलिंक नदीजोड प्रकल्पामुळे जिल्ह्याला अधिकचे पाणी उपलब्ध होणार असल्याचे पत्र जलसंपदा विभागाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला दिले आहे. या नदीजोड प्रकल्पाच्या पाण्यातून २.६ टीएमसी पाणी मुंबई-दिल्ली कॉरिडाॅर प्रकल्पासाठी आरक्षित करण्यात आल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली आहे.

राज्यातील औरंगाबाद आणि नाशिक येथे दिल्ली-मुंबई कॉरिडाॅर करण्याचा निर्णय गेल्या चार वर्षांपूर्वी तत्कालीन राज्य सरकारने घेतला होता. औरंगाबाद येथे दिल्ली-मुंबई कॉरिडाॅरचे काम पूर्णत्वाच्या दिशेने आहे. मात्र प्रकल्पासाठी लागणारे पाणी उपलब्ध नसल्याने नाशिक जिल्ह्यात दिल्ली-मुंबई कॉरिडाॅर प्रकल्प होऊ शकला नाही. दिल्ली-मुंबई कॉरिडाॅरमुळे नाशिक जिल्ह्याचा विकास होणार असल्याने प्रकल्पासाठी पाणी कसे उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न सुरू केले होते. दरम्यान, प्रस्तावित अप्पर वैतरणा-कडवा-देवलिंक नदीजोड प्रकल्प या प्रकल्पातून दिल्ली-मुंबई कॉरिडाॅर २.६ टीएमसी पाणी आरक्षित करावे, यासाठी गोडसे यांनी शासनाकडे सततचा पाठपुरावा केला होता. अखेर जलसंपदा विभागाने दिल्ली-मुंबई कॉरिडॉर प्रकल्पासाठी प्रस्तावित अप्पर वैतरणा-कडवा-देवलिंक नदीजोड प्रकल्पातून २.६ टीएमसी पाणी आरक्षित करण्याचे मान्य केले आहे. याविषयीचे पत्र जलसंपदा विभागाने महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाला नुकतेच दिले आहे.

चाैकट

असे वळविणार पाणी

वैतरणा व दमणगंगा खोऱ्यातून एकूण २०२ दशलक्ष घनमीटर अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यातील देव नदी व देव नदीच्या उपनद्यांच्या खोऱ्यात सिन्नर तालुक्यात वळविणे प्रस्तावित आहे. सदर उपलब्ध पाण्यापैकी दिल्ली, मुंबई औद्योगिक कॉरिडॉरच्या वापरासाठी एकूण ७३.०० दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित ठेवण्यात आले असल्याचे जलसंपदा विभागाच्या पत्रात म्हटले आहे.