शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

पुणेगाव कालव्यास पाणी सोडले

By admin | Updated: August 27, 2016 00:32 IST

शुभ वर्तमान : चाळीस वर्षांची प्रतीक्षा संपली

गोरख घुसळे पाटोदागेल्या ४४ वर्षांपासून पाण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या पुणेगाव- दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्यास कडवा कालवा विभागाने आश्वासन दिल्याप्रमाणे शुक्रवारी (दि. २६) दुपारी ४.३० वाजता चाचणीसाठी ५० क्यूसेक पाणी सोडले आहे. कालव्यास पाणी सुटल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ओव्हरफ्लोच्या पाण्याने येवला तालुक्यातील बाळापूरपर्यंत डोंगरगाव पोहोच कालव्याची चाचणी घ्यावी यासाठी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष मोहन शेलार यांच्या नेतृत्वाखाली कातरणी येथे कालव्यावरच सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी २३ आॅगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले होते. यावेळी सात ते आठ उपोषकर्त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेऊन उपोषणार्थीची भेट घेऊन चाचणीसाठी पाणी सोडण्याचे लेखीपत्र देऊन आंदोलन मागे घेण्याची विनती केली होती.येवला-चांदवड तालुक्यांना संजीवनी ठरणाऱ्या या दरसवाडी डोंगरगाव कालव्याचे काम येवला तालुक्यातील बाळापूरपर्यंत पूर्ण झाले असून, पुढे किरकोळ अपवाद वगळता डोंगरगावपर्यंत कालव्याचे काम पूर्ण झालेले आहे. पुणेगावच्या वाहून जाणाऱ्या पाण्याने कालव्याची चाचणी घेण्यास योग्य वेळ असल्याचे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या बाबत शेलार व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पाटबंधारे विभागास १८ आॅगस्टरोजी पत्र देवून कालव्याची ओव्हरफ्लोच्या पाण्याने चाचणी घ्यावी अशी मागणी केली होती. मात्र संबधित विभागाने चाचणीसाठी ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यास असमर्थता दाखिवली होती. त्यामुळे लाभक्षेत्रातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकरी २३ आॅगस्टपासून कातरणी कालवा परिसरात उपोषणास बसले होते.त्यांच्या या आंदोलनास यश आले असुन या भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या ४४ वर्षापासून अपूर्ण असलेले स्वप्न पूर्ण होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.